शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

'ते देश तोडताहेत, काँग्रेसचा हातच हा देश जोडू शकतो': राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2018 11:02 IST

केंद्रातील मोदी सरकार देशाला तोडण्याचं काम करतंय. पण काँग्रेसच्या 'हाता'त या देशाला पुन्हा जोडण्याची शक्ती आहे.

नवी दिल्लीः केंद्रातील मोदी सरकार देशाला तोडण्याचं काम करतंय. पण काँग्रेसच्या 'हाता'त या देशाला पुन्हा जोडण्याची शक्ती आहे आणि ते काम आपल्याला सगळ्यांना मिळून करायचंय, अशी साद काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पक्षाच्या महाअधिवेशनात घातली. 

देशातील तरुण आज हतबल दिसताहेत. ते मोदींकडे पाहतात, तेव्हा त्यांना कुठलाच मार्ग दिसत नाही. रोजगार कुठून मिळेल, शेतकऱ्यांच्या पिकाला भाव कसा मिळेल, हे गंभीर प्रश्न आहेत. त्यातून काँग्रेस पक्षच दिशा दाखवू शकतो, असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला. काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून राहुल यांनी पहिल्यांदाच पक्षाच्या महाअधिवेशनात भाषण केलं. ते काय बोलतात, याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता होती. परंतु, आपली सगळ्यांची मतं ऐकून समारोपाचं भाषण मी मोठं करेन, त्यात पक्षाची पुढची दिशा ठरवली जाईल, असं सांगून राहुल यांनी उद्घाटनाचं भाषण छोटेखानीच केलं.

राहुल गांधी यांच्या भाषणातील ठळक मुद्देः 

>> आज देशात द्वेष पसरवण्याचं काम सुरू आहे. एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीशी लढवून देशाचं विभाजन केलं जातंय. अशावेळी आपलं काम देश जोडण्याचं आहे. 

>> हात हे काँग्रेसचं चिन्हं भारत जोडण्याचं काम करू शकतं, देशाला प्रगतीपथावर नेऊ शकतं.

>> काँग्रेस पक्षाला आणि देशाला दिशा दाखवण्याचं काम आपल्याला एकत्र मिळून करायचं आहे. त्यासाठी पक्षातील ज्येष्ठ आणि तरुण यांची फळी उभी करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. 

>> देश हताश, हतबल झालाय. त्याला दिशाच सापडत नाहीए. ती दिशा आपण दाखवू. आजचे सत्ताधारी हे राग, तिरस्कार करताहेत. आपण प्रेमाने आणि बंधुभावाने देशातील प्रत्येक व्यक्तीसाठी काम करू. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी