शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानने दहशतवाद्यांना पाठिंबा देणं बंद केलं तरच चर्चा होणार - लष्करप्रमुख बिपीन रावत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2017 16:33 IST

पाकिस्तान जेव्हा जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांना पाठिंबा देणं बंद करेल, तेव्हाच शांततेची चर्चा सुरु होईल अशा थेट इशारा लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी दिला आहे

जयपूर - पाकिस्तान जेव्हा जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांना पाठिंबा देणं बंद करेल, तेव्हाच शांततेची चर्चा सुरु होईल अशा थेट इशारा लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी दिला आहे. पाकिस्तानचं वागणं पाहता त्यांना खरंच शांतता नांदावी असं वाटत असेल असं मला तरी वाटत नाही असंही ते म्हणाले आहेत. भारत-पाकिस्तान सीमारेषेवर आयोजित 'हमेशा विजयी' कार्यक्रमासाठी ते उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. 

पाकिस्तानने दहशतवाद्यांना समर्थन देणं बंद केलं पाहिजे असं बिपीन रावत म्हणाले आहेत. 'त्यानंतरच आपण शांतता चर्चा सुरु होऊ शकते', असं बिपीन रावत यांनी ठणकावून सांगितलं. 'आम्हालाही दोन्ही देशामधील संबंध सुधारावेत असं वाटत आहे. पण सीमारेषेलीकडे सुरु असलेल्या कुरापती आणि जम्मू काश्मीरमधील दहशतवादाला मिळणारं समर्थन पाहता त्यांना खरंच शांतता हवी आहे असं वाटत नाही', असं बिपीन रावत यांनी सांगितलं. 

'जम्मू काश्मीर पोलीस, लष्कर आणि निमलष्करी दल जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांविरोधात यशस्वीपणे कारवाई करत असून, ही कारवाई सुरु राहणार आहे', असं त्यांनी सांगितलं. लष्करप्रमुख बिपीन रावत यांचं वक्तव्य परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांच्या वक्तव्यानंतर आलं आहे, ज्यामध्ये त्यांनी इस्लामाबादने दहशतवादी संघटनांविरोधात कारवाई केली तर भारत संबंध सुधारण्यासाठी पुढाकार घेईल असं म्हटलं होतं. 

'पाकिस्तानने आमची दहशतवादविरोधी भूमिका समजून घ्यावी अशी अपेक्षा आहे. आपल्याकडे अजूनही वेळ आहे. त्यांच्या भूमीवरुन सक्रीय असणा-या दहशतवादी संघटनांविरोधात कारवाई करण्यासाठई आम्ही सांगितलं आहे. मैत्रीपुर्ण संबंध व्हावेत असं खरंच वाटत असेल तर पाकिस्तानने यावर विचार  केला पाहिजे', असं रवीश कुमार म्हणाले होते. 

 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानPakistanपाकिस्तान