शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान झाला गोळीबार  
3
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
4
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
5
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
6
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
7
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
8
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
9
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
10
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
11
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
12
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
13
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
14
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
15
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
16
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
17
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
18
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
19
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
20
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता

पाकिस्तानने दहशतवाद्यांना पाठिंबा देणं बंद केलं तरच चर्चा होणार - लष्करप्रमुख बिपीन रावत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2017 16:33 IST

पाकिस्तान जेव्हा जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांना पाठिंबा देणं बंद करेल, तेव्हाच शांततेची चर्चा सुरु होईल अशा थेट इशारा लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी दिला आहे

जयपूर - पाकिस्तान जेव्हा जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांना पाठिंबा देणं बंद करेल, तेव्हाच शांततेची चर्चा सुरु होईल अशा थेट इशारा लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी दिला आहे. पाकिस्तानचं वागणं पाहता त्यांना खरंच शांतता नांदावी असं वाटत असेल असं मला तरी वाटत नाही असंही ते म्हणाले आहेत. भारत-पाकिस्तान सीमारेषेवर आयोजित 'हमेशा विजयी' कार्यक्रमासाठी ते उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. 

पाकिस्तानने दहशतवाद्यांना समर्थन देणं बंद केलं पाहिजे असं बिपीन रावत म्हणाले आहेत. 'त्यानंतरच आपण शांतता चर्चा सुरु होऊ शकते', असं बिपीन रावत यांनी ठणकावून सांगितलं. 'आम्हालाही दोन्ही देशामधील संबंध सुधारावेत असं वाटत आहे. पण सीमारेषेलीकडे सुरु असलेल्या कुरापती आणि जम्मू काश्मीरमधील दहशतवादाला मिळणारं समर्थन पाहता त्यांना खरंच शांतता हवी आहे असं वाटत नाही', असं बिपीन रावत यांनी सांगितलं. 

'जम्मू काश्मीर पोलीस, लष्कर आणि निमलष्करी दल जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांविरोधात यशस्वीपणे कारवाई करत असून, ही कारवाई सुरु राहणार आहे', असं त्यांनी सांगितलं. लष्करप्रमुख बिपीन रावत यांचं वक्तव्य परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांच्या वक्तव्यानंतर आलं आहे, ज्यामध्ये त्यांनी इस्लामाबादने दहशतवादी संघटनांविरोधात कारवाई केली तर भारत संबंध सुधारण्यासाठी पुढाकार घेईल असं म्हटलं होतं. 

'पाकिस्तानने आमची दहशतवादविरोधी भूमिका समजून घ्यावी अशी अपेक्षा आहे. आपल्याकडे अजूनही वेळ आहे. त्यांच्या भूमीवरुन सक्रीय असणा-या दहशतवादी संघटनांविरोधात कारवाई करण्यासाठई आम्ही सांगितलं आहे. मैत्रीपुर्ण संबंध व्हावेत असं खरंच वाटत असेल तर पाकिस्तानने यावर विचार  केला पाहिजे', असं रवीश कुमार म्हणाले होते. 

 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानPakistanपाकिस्तान