शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
2
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
3
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
4
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
5
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
6
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
7
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
8
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
9
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
10
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
11
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
12
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
13
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
14
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
15
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
16
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
17
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
18
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
19
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
20
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?

कोर्टाने सांगितले, तरच सीबीआय चौकशी

By admin | Updated: July 6, 2015 23:34 IST

तपास सीबीआयकडे सोपविण्याचा आदेश न्यायालयाला दिला जाऊ शकत नाही, असे सांगत केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी मागणी फेटाळून लावली.

झाबुआ : व्यापमं घोटाळ्याचा तपास मध्य प्रदेशच्या उच्च न्यायालयाच्या निगराणीत एसआयटीकडून केला जात आहे. तपास सीबीआयकडे सोपविण्याचा आदेश न्यायालयाला दिला जाऊ शकत नाही, असे सांगत केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी मागणी फेटाळून लावली.मध्य प्रदेशतील व्यावसायिक परीक्षा मंडळातील प्रवेशपरीक्षा आणि भरतीत झालेल्या घोटाळ््याची सर्वोच्च न्यायालयाच्या निगराणीखाली सीबीआय चौकशीची मागणी करीत काँग्रेसने राज्य सरकारवर दबाव वाढविला आहे. निष्पक्ष तपास होण्यासाठी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना हटविले जावे. ४५ जणांच्या मृत्यूच्या जबाबदारीतून त्यांची सुटका नाही, असे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सूर्जेवाला यांनी नवी दिल्लीत म्हटले. चौहान यांच्या कुटुंबीयांसह त्यांच्या निकटस्थांवर गंभीर आरोप केले जात आहे. चौहान यांना आपण स्वच्छ आहोत असे वाटत असेल तर त्यांनी सीबीआय चौकशी होऊ द्यावी, असे काँग्रेसचे अन्य प्रवक्ते पी.सी. चाको यांनी म्हटले. गृहमंत्र्यांना चिंता असल्यामुळेच मी मुख्यमंत्री चौहान यांच्याशी बोललो आहे. मला चौकशीच्या स्थितीबाबत माहिती नाही. लवकरच तपशील कळेल, असे केंद्रीय गृह राज्यमंत्री किरण रीजीजू म्हणाले.

राजकारण्यापर्यंत पाळेमुळे व्यापमं घोटाळ्याशी संबंधितांची मृत्युसंख्या अधिकृतरीत्या ४७ असल्याचे सांगण्यात येत आहे. नोकर भरतीत पैसे घेऊन मोठा घोटाळा घडविणारे मोठे रॅकेट असल्याचा त्यात नोकरशहापासून तर राजकारण्यापर्यंत अनेक बड्या धेंडांचा समावेश असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अनेक आरोपी आणि साक्षीदारांची लागोपाठ मृत्यूची मालिका अखंडितपणे सुरू आहे.मोदींनी जबाबदारी स्वीकारावी... >  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही जबाबदारी झटकता येणार नाही. त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत देशात काय सुरू आहे, ते स्पष्ट करावे, असे चाको यांनी काँग्रेसच्या मुख्यालयात बोलावलेल्या पत्रपरिषदेत म्हटले. या घोटाळ्याशी संबंध असलेल्या आणखी एखाद्याचा अनैसर्गिक मृत्यू होण्यापूर्वी मध्य प्रदेश सरकारने सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी केली. अनामिका हिचा मृत्यू व्यापमं घोटाळ्याशी संबंध असल्यामुळेच झाला असून हा मृत्यू ४६ वा की ४७ वा असा सवाल काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंग यांनी टिष्ट्वटरवर केला आहे.