शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

कोर्टाने सांगितले, तरच सीबीआय चौकशी

By admin | Updated: July 6, 2015 23:34 IST

तपास सीबीआयकडे सोपविण्याचा आदेश न्यायालयाला दिला जाऊ शकत नाही, असे सांगत केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी मागणी फेटाळून लावली.

झाबुआ : व्यापमं घोटाळ्याचा तपास मध्य प्रदेशच्या उच्च न्यायालयाच्या निगराणीत एसआयटीकडून केला जात आहे. तपास सीबीआयकडे सोपविण्याचा आदेश न्यायालयाला दिला जाऊ शकत नाही, असे सांगत केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी मागणी फेटाळून लावली.मध्य प्रदेशतील व्यावसायिक परीक्षा मंडळातील प्रवेशपरीक्षा आणि भरतीत झालेल्या घोटाळ््याची सर्वोच्च न्यायालयाच्या निगराणीखाली सीबीआय चौकशीची मागणी करीत काँग्रेसने राज्य सरकारवर दबाव वाढविला आहे. निष्पक्ष तपास होण्यासाठी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना हटविले जावे. ४५ जणांच्या मृत्यूच्या जबाबदारीतून त्यांची सुटका नाही, असे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सूर्जेवाला यांनी नवी दिल्लीत म्हटले. चौहान यांच्या कुटुंबीयांसह त्यांच्या निकटस्थांवर गंभीर आरोप केले जात आहे. चौहान यांना आपण स्वच्छ आहोत असे वाटत असेल तर त्यांनी सीबीआय चौकशी होऊ द्यावी, असे काँग्रेसचे अन्य प्रवक्ते पी.सी. चाको यांनी म्हटले. गृहमंत्र्यांना चिंता असल्यामुळेच मी मुख्यमंत्री चौहान यांच्याशी बोललो आहे. मला चौकशीच्या स्थितीबाबत माहिती नाही. लवकरच तपशील कळेल, असे केंद्रीय गृह राज्यमंत्री किरण रीजीजू म्हणाले.

राजकारण्यापर्यंत पाळेमुळे व्यापमं घोटाळ्याशी संबंधितांची मृत्युसंख्या अधिकृतरीत्या ४७ असल्याचे सांगण्यात येत आहे. नोकर भरतीत पैसे घेऊन मोठा घोटाळा घडविणारे मोठे रॅकेट असल्याचा त्यात नोकरशहापासून तर राजकारण्यापर्यंत अनेक बड्या धेंडांचा समावेश असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अनेक आरोपी आणि साक्षीदारांची लागोपाठ मृत्यूची मालिका अखंडितपणे सुरू आहे.मोदींनी जबाबदारी स्वीकारावी... >  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही जबाबदारी झटकता येणार नाही. त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत देशात काय सुरू आहे, ते स्पष्ट करावे, असे चाको यांनी काँग्रेसच्या मुख्यालयात बोलावलेल्या पत्रपरिषदेत म्हटले. या घोटाळ्याशी संबंध असलेल्या आणखी एखाद्याचा अनैसर्गिक मृत्यू होण्यापूर्वी मध्य प्रदेश सरकारने सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी केली. अनामिका हिचा मृत्यू व्यापमं घोटाळ्याशी संबंध असल्यामुळेच झाला असून हा मृत्यू ४६ वा की ४७ वा असा सवाल काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंग यांनी टिष्ट्वटरवर केला आहे.