शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

एम्पलॉयमेंट एक्सचेंजची ऑनलाईन नोंदणी सुविधा

By admin | Updated: June 12, 2015 17:38 IST

नोंदणी करणा-यांच्या संख्येत दरवर्षी एक लाखाने वाढ पुणे : जिल्हा व रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयाने (एम्पलॉयमेंट एक्सचेंज)नोंदणीसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिल्याने विद्यार्थ्यांना घरबसल्या नोंदणी करता येते. ऑनलाईन सुविधेमुळे रोजगार कार्यालयामध्ये नोंदणी करणार्या विद्यार्थांची संख्या वाढली आहे. २०१२ मध्ये १ लाख ५८ हजार, २०१३ मध्ये २लाख ६६ हजार आणि २०१४ ...



नोंदणी करणा-यांच्या संख्येत दरवर्षी एक लाखाने वाढ
पुणे : जिल्हा व रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयाने (एम्पलॉयमेंट एक्सचेंज)नोंदणीसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिल्याने विद्यार्थ्यांना घरबसल्या नोंदणी करता येते. ऑनलाईन सुविधेमुळे रोजगार कार्यालयामध्ये नोंदणी करणार्या विद्यार्थांची संख्या वाढली आहे. २०१२ मध्ये १ लाख ५८ हजार, २०१३ मध्ये २लाख ६६ हजार आणि २०१४ मध्ये ३लाख १३ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या आकडेवारीवरून नोंदणी करणा-या विद्यार्थ्यांच्या संख्येत दरवर्षी एक लाखाने वाढ होत आहे.
ऑनलाईनमुळे नोंदणी करण्याचे प्रमाण वाढले असल्याचे सहाय्यक संचालक राजेंद्र गोडबोले यांनी सांगितले. ते म्हणाले दहावी आणि बारावीचा निकाल लागल्यानंतर यापुर्वी जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयात नोंदणीसाठी विद्यार्थ्यांची मोठी प्रमाणावर गर्दी होत असे. आता दहावी आणि बारावीचा निकाल लागल्यानंतर दरवर्षी पुण्यातील रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयात नोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होते. नोंदणीसाठी लागणा-या लांबच-लांब रांगांमुळे विद्यार्थ्यांना अनेकदा नोंदणी न करताच परतावे लागत होते. परंतु, रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयाने मागील तीन वर्षांपासून आधुनिकतेची कास धरली आहे.
रोजगार कार्यालयात नोंदणी करण्यासाठी ६६६.ेंँं१ङ्म्नॅं१.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाईन सुविधा उपलब्ध केल्याने विद्यार्थांना घरबसल्या नोंदणी करणे शक्य झाले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शहरी तसेच ग्रामीण भागातील महा-ई-सेवा केंद्रात नोंदणी करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे कार्यालयात येणा-या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली. ग्रामीण भागातून येणा-या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असते. परंतु, आता तालुक्याच्या ठिकाणी तसेच मोठ्या लोकसंख्या असलेल्या गावांत महा-ई-सेवा केंद्र सुरू केली आहेत. याचा लाभ विद्यार्थ्यांना होत आहे. तालुक्याच्या ठिकाणाहून ऑनलाइनच्या माध्यमातून नोंदणी करता येत आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा वेळ आणि पैशांची बचत होत आहे. या सर्व सुविधेमुळे दरवर्षी रोजगार कार्यालयात होणारी गर्दी कमी झाली आहे.
राजेंद्र गोडबोले यांनी सांगितले की, यापूर्वी विद्यार्थांना नोंदणी करण्यासाठी कार्यालयातच यावे लागत होते. त्यामुळे या कार्यालयात ग्रामीण भागातील विद्यार्थांनांही शहरात यावे लागत असे. पण आता ऑनलाईन सुविधेमुळे विद्यार्थ्यांना घरबसल्याही नोंदणी करता येते. ६६६.ेंँं१ङ्म्नॅं१.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळाच्या माध्यमातूनही नूतनीकरणाची सुविधा उपलब्ध आहे. तसेच तरुणांनी नोकरीसाठी संकेतस्थळ पहावे, असे आवाहनही गोडबोले यांनी केले आहे.