शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

दहा भारतीयांपैकी एकाला आयुष्यात कर्करोगाचा धोका; जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 06:19 IST

पंधरापैकी एक दगावण्याची शक्यता; पाच वर्षांपासून २२ लाख लोक कर्करोगाशी देत आहेत झुंज

जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) अहवालानुसार दहा भारतीयांपैकी एकाला आयुष्यात कर्करोग होण्याचा धोका असून, तसेच पंधरापैकी एकाचा कर्करोगाने मृत्यू होऊ शकतो. जागतिक कर्करोग अहवालानुसार २०१८ मध्ये भारतात कर्करोगाचे नवीन ११.६ लाख रुग्ण आढळले. या अवधीत ७८४,८०० जणांचा कर्करोगाने मृत्यू झाला, तर गेल्या पाच वर्षांपासून २२ लाखांहून अधिक लोक कर्करोगाशी झुंज देत आहेत. एकूण भारताच्या १३५ कोटी लोकसंख्येभोवती कर्करोगाचा जीवघेणा विळखा घट्ट होत असल्याचे दिसते.

जागतिक आरोग्य संघटनेने कर्करोग दिन आणि कर्करोग विशेष संसोधन आंतरराष्ट्र्रीय संस्थेने (आयएआरसी) मंगळवारी दोन अहवाल जारी केले आहेत. एका अहवालाचा उद्देश कर्करोगासाठी जागतिक कार्यक्रम ठरविणे आहे, दुसरा अहवाल संशोधन आणि प्रतिबंध यावर भर देणारा आहे. या अहवालानुसार दहा भारतीयांपैकी एकाला कर्करोग होण्याचा धोका असून, पंधरा भारतीयांपैकी एकाचा कर्करोगाने मृत्यू होऊ शकतो.

भारतात मुख्यत्वे सहा प्रकारच्या कर्करोगाचे रुग्ण आढळतात. १ लाख ६२ हजार ५०० जणांना स्तनाचा कर्करोग असल्याचे आढळले. मुख कर्करोगाचे रुग्ण १ लाख २० हजार, तर ९७ हजार जण मणक्याचा कर्करोगाचे नवीन रुग्ण आढळले. पोटाच्या कर्करोगाचे ५७ हजार रुग्ण आढळले असून, आतडे-मलमार्ग कर्करोग्रस्तांची संख्या ५७ हजार आहे. फुफ्फु साचा कर्करोग झालेल्या नवीन रुग्णांची संख्या ६८ हजार आहे. एकूण कर्करोगाच्या नवीन रुग्णांच्या संख्येचे प्रमाण ४९ टक्के आहे.गुंतवणुकीचे प्रमाण वाढविण्यासह सर्वसंबंधितांनी एकत्र काम केल्यास येत्या एका दशकात ७० लाख लोकांना कर्करोगापासून वाचविता येऊ शकते, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालक ट्रेडॉम अ‍ॅडहनम गेब्रायसेस यांनी सांगितले.

अहवालानुसार जगात धूम्रपान करणाऱ्यांपैकी ८० टक्के धूम्रपान करणारे अल्प आणि मध्यम उत्पन्न देशांतील आहेत.पुरुषांत एकूण ५ लाख ७० हजार कर्करोगाचे नवीन रुग्ण आहेत. यात ९२ हजार मुखकर्करोग, ४९ हजार (फुफ्फु साचा कॅन्सर), ३९ हजार (पोटाचा कॅन्सर) आणि आतडे-मलमार्ग कॅन्सरच्या नवीन कर्करुग्णांची संख्या ३७ हजार आहे. भारतातील विकसित राज्यात आणि शहरी भागात आतडे-मलमार्ग कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे, तसेच स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाणही वाढत असल्याचे दिसते.

महिलांमध्ये ५ लाख ८७ हजार नवीन कॅन्सरचे रुग्ण आढळले आहेत. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये कॅन्सरचे १७ नवीन रुग्ण आहेत. तंबाखूमुळे भारतात कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. याचा संबंध सामजिक आणि आर्थिक स्थितीशी आहे. पुरुषांत प्रामुख्याने मुख कर्करोग आणि महिलांमध्ये मानेच्या मणक्याच्या कर्करोगाचे अधिक प्रमाण आहे.अल्प आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांत कर्करोग प्रतिबंध आणि नियंत्रण सेवा क्षेत्रातील कमी गुंतवणुकीमुळे २०४० पर्यंत कर्करुग्णांची संख्या ८१ टक्के वाढण्याची शक्यता आहे.जगभर धूम्रपान करणाऱ्यांपैकी ६४ टक्के लोक फक्त देशातील आहेत, तर जगभरात धूम्रपान करणाºया पुरुषांपैकी ५० टक्के लोक चीन, भारत, इंडोनेशियात आहेत.

टॅग्स :cancerकर्करोगIndiaभारतdocterडॉक्टर