शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

मोदींच्या शंभर दिवसांत जुलूमशाही, अनागोंदी;  शून्य विकासाचा राहुल गांधी यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2019 3:03 AM

विरोधी पक्षांतील नेत्यांना अटक करून मोदी सरकार स्वत:चे अपयश झाकण्याचा प्रयत्न करीत आहे

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या शंभर दिवसांत अराजक, अनागोंदी, जुलूमशाहीचे दर्शन साºया देशाला झाले, असा आरोप काँग्रेसने केला आहे. या शंभर दिवसांत देशात काहीच विकास झाला नसून त्यानिमित्त काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी या सरकारचे उपरोधिक शैलीत अभिनंदन केले आहे.

काँग्रेसने म्हटले आहे की, विरोधी पक्षांतील नेत्यांना अटक करून मोदी सरकार स्वत:चे अपयश झाकण्याचा प्रयत्न करीत आहे. मोदी सरकारच्या शंभर दिवसांत देशाला आर्थिक मंदीची चाहूल लागली आहे. अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे ही वस्तुस्थिती मोदी सरकारने आतातरी मान्य करावी.

वाहननिर्मिती उद्योग कधी नव्हे इतका संकटात सापडला आहे. असे प्रश्न उभे राहूनही भारताची अर्थव्यवस्था चीन, अमेरिकेपेक्षा उत्तम कामगिरी करीत असल्याचे ढोल मोदी सरकार बडवत आहे. गेल्या वर्षीपासून देशाच्या राष्ट्रीय ठोकळ उत्पन्नात मोठी घसरण झाली आहे. सरकारच्या आर्थिक गैरव्यवस्थापन व दुर्लक्षामुळेच ही स्थिती ओढवली आहे. उद्योजक, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी अर्थव्यवस्थेच्या स्थितीबाबत केलेल्या विश्लेषणाची भाजपने खिल्ली उडवली. देशातील आठ क्षेत्रांचा विकासदर २ टक्क्यांहून कमी आहे. अशीच स्थिती कायम राहिल्यास देशात आर्थिक मंदी नक्की येईल, असा इशाराही काँग्रेसने दिला आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, डळमळीत झालेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी सक्षम नेतृत्वाचा अभाव सध्या देशाला जाणवत आहे. आपल्यावर टीका करणाºया प्रसारमाध्यमांवर जरब बसविणे, लोकशाहीचे खच्चीकरण करणे ही मोदी सरकारची दुसºया कार्यकाळातील शंभर दिवसांची कामगिरी आहे.

हा तर कामगारांचा अपमान : प्रियांकामोदींच्या सरकारला शंभर दिवस पूर्ण झाल्याचे साजरे होणारे सोहळे हा सध्या बिकट स्थितीत सापडलेल्या वाहननिर्मिती, वाहतूक, खाणक्षेत्रातील कामगारांचा अपमान आहे, अशी टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केली आहे. त्यांनी म्हटले आहे, आपले भवितव्य अंध:कारमय होत असल्याचे कामगारांना उघड्या डोळ्यांनी पाहावे लागत आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी