शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

'विज्ञानाचे नियम समजून घेण्याचा प्रयत्न करावे लागतील'; किरेन रिजिजू यांची मंत्रिपदावरुन बदली होताच कपिल सिब्बल यांचं ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 11:51 IST

किरेन रिजिजू यांच्याकडून कायदा मंत्रालय काढून पृथ्वी विज्ञान मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

नवी दिल्ली: केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांना पदावरुन तडकाफडकी हटवण्यात आलं आहे. आता कायदा मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. तर किरेन रिजिजू यांच्याकडून कायदा मंत्रालय काढून पृथ्वी विज्ञान मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

मोदी सरकारच्या या निर्णयावरुन विविध चर्चांना उधाण आले आहे. तसेच विरोधकांकडूनही विविध सवाल उपस्थित करण्यात येत आहे. ज्येष्ठ वकील आणि राजकारणी कपिल सिब्बल यांनी या फेरबदलावर टोला लगावला आहे. कपिल सिब्बल ट्विट करत म्हणाले की, कायदा नव्हे, आता पृथ्वी विज्ञान मंत्री. कायद्यांमागील विज्ञान समजून घेणं सोपं नाही. आता विज्ञानाचे नियम समजून घेण्याचा प्रयत्न करावे लागतील. शुभेच्छा मित्रा, असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे. कपिल सिब्बल यांनी देशभरात चर्चेत असणारा महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा खटला ठाकरे गटाकडून लढवला होता. 

दरम्यान, किरेन रिजिजू हे अरुणाचल पश्चिम लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे खासदार आहेत. किरेन रिजिजू यांचा जन्म १९ नोव्हेंबर १९७१ रोजी अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कामेंग जिल्ह्यात झाला. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली आहे. त्यांनी २००४ मध्ये (अरुणाचल पश्चिम मतदारसंघ) पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवली आणि जिंकली. पण २००९च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. २०१४च्या निवडणुकीत रिजिजू पुन्हा विजयी झाले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात त्यांना गृहराज्यमंत्री बनवण्यात आले. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात म्हणजेच २०१९मध्ये त्यांना क्रीडा मंत्री (स्वतंत्र प्रभार) बनवण्यात आले. जुलै २०२१मध्ये, त्यांना मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान कायदा मंत्री करण्यात आले. रविशंकर प्रसाद यांच्या जागी त्यांना ही जबाबदारी देण्यात आली होती.

कोण आहे अर्जुन राम मेघवाल?

अर्जुन राम मेघवाल हे २००९पासून बिकानेरचे खासदार आहेत. मेघवाल यांचा जन्म बिकानेरच्या किसमिदेसर गावात झाला. बिकानेरच्या डुंगर कॉलेजमधून बीए आणि एलएलबी केले. यानंतर त्यांनी त्याच महाविद्यालयातून पदव्युत्तर पदवी (M.A) केली. यानंतर त्यांनी फिलिपाइन्स विद्यापीठातून एमबीएही केले. ते राजस्थान केडरचे आयएएस अधिकारी आहेत आणि राजस्थानमधील अनुसूचित जातीचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. मेघवाल २००९, २०१४ आणि २०१९च्या लोकसभा निवडणुकीत बिकानेरमधून भाजपच्या तिकीटावर खासदार म्हणून निवडून आले होते. २०१३मध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट संसदपटू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात ते लोकसभेतील भारतीय जनता पक्षाचे मुख्य व्हीप होते. मे २०१९मध्ये मेघवाल संसदीय कामकाज आणि अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम राज्यमंत्री बनले. आता त्यांच्याकडे कायदा मंत्रालयाची जबाबदारीही देण्यात आली आहे.

टॅग्स :kapil sibalकपिल सिब्बलNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकार