शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

Sharad Pawar: "एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर?", शरद पवारांनी सांगितली राष्ट्रवादीची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 14:50 IST

महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेपूर्वीही बंड करण्यात आला होता. त्यावेळी, आमदारांना हरयाणा आणि गुजरातमध्ये ठेवण्यात आले होते

मुंबई - राज्यात विधान परिषद निकालात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसल्यानंतर शिवसेनेतील नाराजी आता उघड झाली आहे. निकाल लागल्यानंतर सोमवार संध्याकाळपासूनच शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे नॉट रिचेबल होते. त्यांच्यासह शिवसेनेचे अनेक आमदार गुजरातला थांबल्याचे आता समोर आले आहे. या शिवसेनेतील बंडावर आता शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार सध्या राष्ट्रपती निवडणुकीसाठी दिल्लीत आहेत. तेथूनच त्यांनी राष्ट्रवादीची भूमिका जाहीर केली. तसेच, आपण आजच मुंबईला जाणार असल्याचेही त्यांनी म्हटले. 

महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेपूर्वीही बंड करण्यात आला होता. त्यावेळी, आमदारांना हरयाणा आणि गुजरातमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र, आता 2.5 वर्षांपासून सरकार व्यवस्थित चालत आहे. विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार निवडून आले आहेत. राष्ट्रवादीची मतं ठरल्याप्रमाणे उमेदवारांना देण्यात आली आहेत. आमच्या महाविकास आघाडीचा एक उमेदवार विजयी झाला नाही हे खरंय, याची आम्ही माहिती घेऊ, असे शरद पवार यांनी म्हटले. तसेच, एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली आहे, असा प्रश्न शरद पवारांना विचारला होता. त्यावर, राज्यातील शिवसेनेच्या बंडावर बोलताना, मला सद्यस्थिती पाहून असं वाटतंय की नक्कीच मार्ग निघेल. शिवसेना पक्षाकडे मुख्यमंत्रीपद आहे, उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीकडे आहे, ते मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे राहिल. शिवसेना नेते जे ठरवतील त्यासोबत आम्ही आहोत. पण, मला विश्वास आहे की, सर्वकाही व्यवस्थीत होईल, असे शरद पवार यांनी म्हटले. 

एकनाथ शिंदे हे अमित शहांना भेटणार आहेत, यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर, कोणी कोणाची भेट घ्यावी, हा त्यांचा विषय आहे, मला याबाबत माहिती नाही. माझी कुणाशीही चर्चा झाली नाही, मी मुख्यमंत्र्यांसोबतही याबाबत बोललो नाही. पण, मी आज मुंबईला जात आहे, तिथे गेल्यानंतर परिस्थिती पाहून पुढील पाऊले उचलली जातील, असेही पवार यांनी सांगितले. 

आम्ही महाराष्ट्राचे निष्ठावंत

''पवार निष्ठावंत हा काय प्रकार आहे? पवार निष्ठावंत वगैरे प्रकार नसतो. सगळे महाराष्ट्राचे निष्ठावंत आहेत. बाळासाहेबांचे निष्ठावंत आम्ही आहोतच ना, हे आम्हाला तुम्ही शिकवू नका बाळासाहेबांची निष्ठा काय ते. तुम्हाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेण्याचा अधिकार नाही, बाळासाहेब आज असते तर त्यांनीही या सरकारला आशीर्वाद दिला असता,'' असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर पलटवार केला.  

शिवसेना आमदारांना घेराव

शिवसेनेच्या आमदारांना घेराव घातला आहे. घेराव घातल्यामुळे त्यांना परत येता येत नाही. हा घेराव फक्त गुजरातमध्येच घातला जाऊ शकतो. या आमदारांना मुख्य रस्त्यावरचे रस्ते बंद केले आहेत. महाराष्ट्राला अस्थीर करण्याची योजना गुजरातच्या भूमिवर रचली जात असून हे दुर्दैवी आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले. तसेच, सर्वच आमदार परत येतील, कारण ते निष्ठावंत शिवसैनिक आहेत. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMumbaiमुंबईShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे