शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

Sharad Pawar: "एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर?", शरद पवारांनी सांगितली राष्ट्रवादीची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 14:50 IST

महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेपूर्वीही बंड करण्यात आला होता. त्यावेळी, आमदारांना हरयाणा आणि गुजरातमध्ये ठेवण्यात आले होते

मुंबई - राज्यात विधान परिषद निकालात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसल्यानंतर शिवसेनेतील नाराजी आता उघड झाली आहे. निकाल लागल्यानंतर सोमवार संध्याकाळपासूनच शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे नॉट रिचेबल होते. त्यांच्यासह शिवसेनेचे अनेक आमदार गुजरातला थांबल्याचे आता समोर आले आहे. या शिवसेनेतील बंडावर आता शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार सध्या राष्ट्रपती निवडणुकीसाठी दिल्लीत आहेत. तेथूनच त्यांनी राष्ट्रवादीची भूमिका जाहीर केली. तसेच, आपण आजच मुंबईला जाणार असल्याचेही त्यांनी म्हटले. 

महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेपूर्वीही बंड करण्यात आला होता. त्यावेळी, आमदारांना हरयाणा आणि गुजरातमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र, आता 2.5 वर्षांपासून सरकार व्यवस्थित चालत आहे. विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार निवडून आले आहेत. राष्ट्रवादीची मतं ठरल्याप्रमाणे उमेदवारांना देण्यात आली आहेत. आमच्या महाविकास आघाडीचा एक उमेदवार विजयी झाला नाही हे खरंय, याची आम्ही माहिती घेऊ, असे शरद पवार यांनी म्हटले. तसेच, एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली आहे, असा प्रश्न शरद पवारांना विचारला होता. त्यावर, राज्यातील शिवसेनेच्या बंडावर बोलताना, मला सद्यस्थिती पाहून असं वाटतंय की नक्कीच मार्ग निघेल. शिवसेना पक्षाकडे मुख्यमंत्रीपद आहे, उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीकडे आहे, ते मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे राहिल. शिवसेना नेते जे ठरवतील त्यासोबत आम्ही आहोत. पण, मला विश्वास आहे की, सर्वकाही व्यवस्थीत होईल, असे शरद पवार यांनी म्हटले. 

एकनाथ शिंदे हे अमित शहांना भेटणार आहेत, यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर, कोणी कोणाची भेट घ्यावी, हा त्यांचा विषय आहे, मला याबाबत माहिती नाही. माझी कुणाशीही चर्चा झाली नाही, मी मुख्यमंत्र्यांसोबतही याबाबत बोललो नाही. पण, मी आज मुंबईला जात आहे, तिथे गेल्यानंतर परिस्थिती पाहून पुढील पाऊले उचलली जातील, असेही पवार यांनी सांगितले. 

आम्ही महाराष्ट्राचे निष्ठावंत

''पवार निष्ठावंत हा काय प्रकार आहे? पवार निष्ठावंत वगैरे प्रकार नसतो. सगळे महाराष्ट्राचे निष्ठावंत आहेत. बाळासाहेबांचे निष्ठावंत आम्ही आहोतच ना, हे आम्हाला तुम्ही शिकवू नका बाळासाहेबांची निष्ठा काय ते. तुम्हाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेण्याचा अधिकार नाही, बाळासाहेब आज असते तर त्यांनीही या सरकारला आशीर्वाद दिला असता,'' असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर पलटवार केला.  

शिवसेना आमदारांना घेराव

शिवसेनेच्या आमदारांना घेराव घातला आहे. घेराव घातल्यामुळे त्यांना परत येता येत नाही. हा घेराव फक्त गुजरातमध्येच घातला जाऊ शकतो. या आमदारांना मुख्य रस्त्यावरचे रस्ते बंद केले आहेत. महाराष्ट्राला अस्थीर करण्याची योजना गुजरातच्या भूमिवर रचली जात असून हे दुर्दैवी आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले. तसेच, सर्वच आमदार परत येतील, कारण ते निष्ठावंत शिवसैनिक आहेत. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMumbaiमुंबईShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे