शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

Sharad Pawar: "एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर?", शरद पवारांनी सांगितली राष्ट्रवादीची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 14:50 IST

महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेपूर्वीही बंड करण्यात आला होता. त्यावेळी, आमदारांना हरयाणा आणि गुजरातमध्ये ठेवण्यात आले होते

मुंबई - राज्यात विधान परिषद निकालात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसल्यानंतर शिवसेनेतील नाराजी आता उघड झाली आहे. निकाल लागल्यानंतर सोमवार संध्याकाळपासूनच शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे नॉट रिचेबल होते. त्यांच्यासह शिवसेनेचे अनेक आमदार गुजरातला थांबल्याचे आता समोर आले आहे. या शिवसेनेतील बंडावर आता शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार सध्या राष्ट्रपती निवडणुकीसाठी दिल्लीत आहेत. तेथूनच त्यांनी राष्ट्रवादीची भूमिका जाहीर केली. तसेच, आपण आजच मुंबईला जाणार असल्याचेही त्यांनी म्हटले. 

महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेपूर्वीही बंड करण्यात आला होता. त्यावेळी, आमदारांना हरयाणा आणि गुजरातमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र, आता 2.5 वर्षांपासून सरकार व्यवस्थित चालत आहे. विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार निवडून आले आहेत. राष्ट्रवादीची मतं ठरल्याप्रमाणे उमेदवारांना देण्यात आली आहेत. आमच्या महाविकास आघाडीचा एक उमेदवार विजयी झाला नाही हे खरंय, याची आम्ही माहिती घेऊ, असे शरद पवार यांनी म्हटले. तसेच, एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली आहे, असा प्रश्न शरद पवारांना विचारला होता. त्यावर, राज्यातील शिवसेनेच्या बंडावर बोलताना, मला सद्यस्थिती पाहून असं वाटतंय की नक्कीच मार्ग निघेल. शिवसेना पक्षाकडे मुख्यमंत्रीपद आहे, उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीकडे आहे, ते मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे राहिल. शिवसेना नेते जे ठरवतील त्यासोबत आम्ही आहोत. पण, मला विश्वास आहे की, सर्वकाही व्यवस्थीत होईल, असे शरद पवार यांनी म्हटले. 

एकनाथ शिंदे हे अमित शहांना भेटणार आहेत, यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर, कोणी कोणाची भेट घ्यावी, हा त्यांचा विषय आहे, मला याबाबत माहिती नाही. माझी कुणाशीही चर्चा झाली नाही, मी मुख्यमंत्र्यांसोबतही याबाबत बोललो नाही. पण, मी आज मुंबईला जात आहे, तिथे गेल्यानंतर परिस्थिती पाहून पुढील पाऊले उचलली जातील, असेही पवार यांनी सांगितले. 

आम्ही महाराष्ट्राचे निष्ठावंत

''पवार निष्ठावंत हा काय प्रकार आहे? पवार निष्ठावंत वगैरे प्रकार नसतो. सगळे महाराष्ट्राचे निष्ठावंत आहेत. बाळासाहेबांचे निष्ठावंत आम्ही आहोतच ना, हे आम्हाला तुम्ही शिकवू नका बाळासाहेबांची निष्ठा काय ते. तुम्हाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेण्याचा अधिकार नाही, बाळासाहेब आज असते तर त्यांनीही या सरकारला आशीर्वाद दिला असता,'' असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर पलटवार केला.  

शिवसेना आमदारांना घेराव

शिवसेनेच्या आमदारांना घेराव घातला आहे. घेराव घातल्यामुळे त्यांना परत येता येत नाही. हा घेराव फक्त गुजरातमध्येच घातला जाऊ शकतो. या आमदारांना मुख्य रस्त्यावरचे रस्ते बंद केले आहेत. महाराष्ट्राला अस्थीर करण्याची योजना गुजरातच्या भूमिवर रचली जात असून हे दुर्दैवी आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले. तसेच, सर्वच आमदार परत येतील, कारण ते निष्ठावंत शिवसैनिक आहेत. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMumbaiमुंबईShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे