शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य; हत्येची अपील करणाऱ्या काँग्रेस नेत्याविरोधात FIR दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 17:47 IST

पटेरिया यांची अडचण वाढली आहे. त्याच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. मात्र, आपले म्हणणे चुकीच्या पद्धतीने माडण्यात आले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मध्य प्रदेशातीलकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी राज्यमंत्री राजा पटेरिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी, एफआयआर दाखल करण्यात आला आहे. संविधान, अल्पसंख्याक, दलित आणि आदिवासींचे भविष्य वाचवायचे असेल तर पंतप्रधान मोदींची हत्या करण्यासाठी तयार रहा. असे वादग्रस्त विधान पटेरिया यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला आहे. यामुळे पटेरिया यांची अडचण वाढली आहे. त्याच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. मात्र, आपले म्हणणे चुकीच्या पद्धतीने माडण्यात आले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. काँग्रेस नेते राजा पटेरिया यांच्या वक्तव्यावर बोलताना, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले, ‘काँग्रेसचे लोक मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा  सामना करू शकत नाही. यामुळेच, काँग्रेसचे एक नेते हत्येसंदर्भात बोलतात. हे अत्यंत घृनास्पद आहे. काँग्रेसची खरी भावना आता प्रकट होऊ लागली आहे.’

ते ट्विट करत म्हणाले, ‘भारत जोडो यात्रेचे ढोंग करणाऱ्यांचे वास्तव आता समोर येत आहे. पंतप्रधान नरेद्र मोदी जनतेच्या हृदयात आहेत. सम्पूर्ण देशात श्रद्धा आणि आस्थेचे केंद्र आहेत. काँग्रेसचे लोक मैदानात त्यांचा सामना करू शकत नाहीत. यामुळेच त्यांच्या हत्येच्या गोष्टी करतात.’

पटेरिया यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल -पटेरिया यांच्या वक्तव्यानंतर, मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले, 'ही महात्मा गांधींची काँग्रेस नाही. ही इटलीची काँग्रेस आहे आणि इटलीची मानसिकता मुसोलिनीची मानसिकता राहिली आहे. ज्या पद्धतीने स्वरा भास्कर, कन्हैया कुमार त्यांच्या यात्रेत चालत आहेत, त्यावरूनही हे स्पष्ट होते. पटेरिया यांनी पीएम मोदींविरोधात केलेल्या अत्यंत आक्षेपार्ह विधानासाठी मी त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे आदेश देत आहे. नरोत्तम मिश्रा यांच्या सूचनेनंतर मध्य प्रदेशातील पन्ना येथे पटेरिया यांच्या विरोधात शांतता बिघडवणे आणि असंतोष पसरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय म्हमाले होते राजा पटेरिया -राजा पटेरिया यांचा जो कथित व्हिडीओ व्हायरल होत आहे त्यामध्ये ते काही कार्यकर्त्यांना संबोधित करत आहेत. ते सांगतात की, मोदी निवडणुका संपुष्टात  आणतील. मोदी धर्म, जात, भाषा यांच्या आधारावर फूट पाडतील. दलित आणि आदिवासींचं आणि अल्पसंख्याकांचं जीवन संकटात आहे. जर संविधानाचं रक्षण करायचं असेल तर मोदींची हत्या करण्यासाठी तयार राहा.  मात्र नंतर त्यांनी या विधानावर सारवासारव केली. तसेच हत्येचा अर्थ पराभव असा सांगितला.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपाMadhya Pradeshमध्य प्रदेश