शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

Odisha Train Accident : चमत्कार! वरून पडत होती बोगी अन् आईला सुचला एकमेव मार्ग; अशी वाचवली पोटची 3 मुलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2023 17:14 IST

...तेवढ्यात आईचे प्रेझेन्स ऑफ माइंड कामी आले आणि चमत्कार घडला!

बालासोर - ओडिशातील बालासोर येथे झालेल्या तीन रेल्वे गाड्यांच्या अपघातात तब्बल 270 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यातच, एका महिलेने ज्या पद्धतीने आपल्या मुलांना वाचविले, त्याचीही जबरदस्त चर्चा होत आहे. खरे तर ही आई आपल्या सदसद् विवेकबुद्धीने मुलं आणि मृत्यूमध्ये ढालीसारखी उभी राहिली. या अपघातात अनेक बोग्यांचा पूर्णपणे चक्काचूर झाला. दरम्यान एका चक्काचूर झालेल्या बोगीचा काही भाग त्यांच्यावर कोसळणार होता. तेवढ्यात आईचे प्रेझेन्स ऑफ माइंड कामी आले आणि चमत्कार घडला.

मला वाटले होते आता वाचणार नाही...-जेव्हा ट्रेन एकमेकांवर आदळल्या तेव्हा अक्षरश: बहिरा करणारा आवाज झाला आणि प्रचंड धूर उठला. ही परिस्थिती समजायला 45 वर्षीय सीता दास यांना वेळ लागला नाही. सीता दास यांनी आपल्या दोन मुलींना आणि एका मुलाला खिडकीतून बाहेर फेकले. रेल्वे रुळाच्या दोन्ही बाजूला शेतं होती. मुलांना वाचवण्यासाठी हीच योग्य जागा आहे असे त्यांना वाटले. सीता सांगतात, 'पहिल्या काही मिनिटांसाठी मला वाटले, मी जगले नाही तर लोक माझ्या मुलांचा जीव वाचवतील. माझे पती जेथे अडकले होते. त्या ठिकाणापासून मी फार दूर नव्हते.

अपघातानंतर संपूर्ण कुटुंब सुरक्षित -सीता आणि त्यांचे पती किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघातातून हे दाम्पत्य आणि त्यांच्या मुलांचा जीव वाचणे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. हे कुटुंब चेन्नईला जात होते. तेथे सीता दास यांचे पती नंदू दास प्लंबर म्हणून काम करतात. ओडिशातील बालासोरजवळ कोरोमंडल, शालीमार आणि मालगाडी यांच्यात झालेल्या या भीषण रेल्वे अपघातात आतापर्यंत २७० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :Odishaओदिशाrailwayरेल्वेAccidentअपघात