शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

Odisha Train Accident : चमत्कार! वरून पडत होती बोगी अन् आईला सुचला एकमेव मार्ग; अशी वाचवली पोटची 3 मुलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2023 17:14 IST

...तेवढ्यात आईचे प्रेझेन्स ऑफ माइंड कामी आले आणि चमत्कार घडला!

बालासोर - ओडिशातील बालासोर येथे झालेल्या तीन रेल्वे गाड्यांच्या अपघातात तब्बल 270 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यातच, एका महिलेने ज्या पद्धतीने आपल्या मुलांना वाचविले, त्याचीही जबरदस्त चर्चा होत आहे. खरे तर ही आई आपल्या सदसद् विवेकबुद्धीने मुलं आणि मृत्यूमध्ये ढालीसारखी उभी राहिली. या अपघातात अनेक बोग्यांचा पूर्णपणे चक्काचूर झाला. दरम्यान एका चक्काचूर झालेल्या बोगीचा काही भाग त्यांच्यावर कोसळणार होता. तेवढ्यात आईचे प्रेझेन्स ऑफ माइंड कामी आले आणि चमत्कार घडला.

मला वाटले होते आता वाचणार नाही...-जेव्हा ट्रेन एकमेकांवर आदळल्या तेव्हा अक्षरश: बहिरा करणारा आवाज झाला आणि प्रचंड धूर उठला. ही परिस्थिती समजायला 45 वर्षीय सीता दास यांना वेळ लागला नाही. सीता दास यांनी आपल्या दोन मुलींना आणि एका मुलाला खिडकीतून बाहेर फेकले. रेल्वे रुळाच्या दोन्ही बाजूला शेतं होती. मुलांना वाचवण्यासाठी हीच योग्य जागा आहे असे त्यांना वाटले. सीता सांगतात, 'पहिल्या काही मिनिटांसाठी मला वाटले, मी जगले नाही तर लोक माझ्या मुलांचा जीव वाचवतील. माझे पती जेथे अडकले होते. त्या ठिकाणापासून मी फार दूर नव्हते.

अपघातानंतर संपूर्ण कुटुंब सुरक्षित -सीता आणि त्यांचे पती किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघातातून हे दाम्पत्य आणि त्यांच्या मुलांचा जीव वाचणे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. हे कुटुंब चेन्नईला जात होते. तेथे सीता दास यांचे पती नंदू दास प्लंबर म्हणून काम करतात. ओडिशातील बालासोरजवळ कोरोमंडल, शालीमार आणि मालगाडी यांच्यात झालेल्या या भीषण रेल्वे अपघातात आतापर्यंत २७० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :Odishaओदिशाrailwayरेल्वेAccidentअपघात