शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अपघाताचं टायमिंग संशयास्पद, हा घातपात असण्याची शक्यता, माजी रेल्वेमंत्र्यांनी केली चौकशीची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2023 16:19 IST

Odisha Train Accident: ओदिशामध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघातामुळे देशभरात शोकाचं वातावरण आहे. या अपघातात आतापर्यंत २८० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, माजी रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांनी या अपघाताबाबत संशय व्यक्त केला आहे.

ओदिशामध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघातामुळे देशभरात शोकाचं वातावरण आहे. या अपघातात आतापर्यंत २८० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, माजी रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांनी या अपघाताबाबत संशय व्यक्त केला आहे. हा अपघात म्हजणे कटकारस्थान असू शकतो, त्यामुळे या अपघाताची सखोल चौकशी झाली पाहिजे, या अपघाताचं टायमिंग विचित्र आहे. या अपघाताचं विश्लेषण करण्याची गरज आहे, असे दिनेश त्रिवेदी म्हणाले.

माजी रेल्वेमंत्री त्रिवेदी यांनी सांगितले की, मी जे दृष्य पाहिलं, त्यातून आपण भूकंपानंतरचं दृश्य पाहतोय, असं वाटत होतं. जपानप्रमाणे दुर्घटनांमध्ये एकही मृत्यू होता कामा नये, हे आमचं लक्ष्य असलं पाहिजे. नवं तंत्रज्ञान येत आहे. त्याला रेल्वेच्या सिस्टिममध्ये दाखल करून घेतलं जात आहे.

त्रिवेदी यांनी पुढे सांगितले की, पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे २०१० मध्य एक मोठा रेल्वे अपघात झाला होता. या अपघातानंतर दहा वर्षांपर्यंत तिथे रेल्वे चालली नव्हती. या घटनेमध्ये गीतांजली एक्स्प्रेस आणि एका मालगाडीचा अपघात झाला होता. त्यात सुमारे १५० ते १८० जणांचा मृत्यू झाला होता. २०१० मध्य एका तपास आयोगाने या अपघाताचा उल्लेख मोठी दुर्घटना म्हणून केला होता.

ओदिशामधील बालासोर येथे झालेल्या या अपघातामध्ये आतापर्यंत २८० जणांचा मृत्यू झाला आहे. लष्कर, हवाई दलासह अनेक पथके बचाव मोहिमेत गुंतलेली आहे. ट्रेनच्या डब्यांमध्ये अजूनही काही लोक अडकलेले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ट्रेनच्या डब्यांमध्ये खाण्यापिण्याच्या वस्तू, बाटल्या, चपला आदी वस्तू विखुरलेल्या होत्या. मदत कार्यामध्ये लष्करालाही पाचारण करण्यात आले आहे. तक दुसरीकडे मृतांच्या संख्येमध्येही सातत्याने वाढ होत आहे. अपघातग्रस्त डब्यांमध्ये एमर्जंन्सी अलार्म अजूनही वाजत आहे. तसेच अपघातग्रस्त डब्यांमध्ये अनेक लोक अडकलेले असल्याची शक्यता आहे. 

टॅग्स :AccidentअपघातIndian Railwayभारतीय रेल्वेOdishaओदिशा