शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

Odisha Train Accident: '26/11 वेळी NSG ला मुंबईत यायला 10 तास लागले', हरदीप सिंग पुरींचा काँग्रेसवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2023 19:52 IST

Coromandel Express Derail: कोरोमंडल ट्रेन अपघातानंतर काँग्रेसकडून रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.

Hardeep Singh Puri : ओडिशातील बालासोरमध्ये कोरोमंडल ट्रेनचा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर विरोधकांकडून रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. यावरुन केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. जम्मू-काश्मीर दौऱ्यावर असलेल्या पुरी यांनी 26/11 मुंबई हल्ल्याचा उल्लेख केला. 

सोमवारी(5 जून) माध्यमांशी बोलताना पुरी म्हणाले की, "26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर NSG ला मुंबईत पोहोचण्यासाठी 10 तासांपेक्षा जास्त वेळ लागला होता. ट्रेन दुर्घटनेनंतर पंतप्रधानांनी तात्काळ बालासोर ट्रेन अपघात स्थळाला भेट दिली. तीन केंद्रीय मंत्री देखील होते. अपघातानंतर 51 तासांत रेल्वे रुळ पूर्ववत करण्यात आला."

विरोधी पक्षांच्या बैठकीवरुन हरदीप सिंग पुरी यांनी टीका केली. ते म्हणाले, "आम्हाला एक जबाबदार विरोधी पक्ष हवा आहे, पण ही वेगळ्या प्रकारची विरोधी एकजूट होत आहे. यापैकी अर्धे ते आहेत, ज्यांना नेतृत्व हवंय आणि अर्धे ते आहेत जे कोणाच्यातरी विरोधात आहेत," अशी खोचक टीकाही त्यांनी यावेळी केली.

ओडिशा रेल्वे अपघातात 275 ठारओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात शुक्रवारी (2 जून) भीषण रेल्वे अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. या अपघातात आतापर्यंत 275 जणांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक जखमी झाले आहेत. जखमींवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर पीएम मोदींनी अपघातस्थळाची पाहणी केली आणि काही जखमींची रुग्णालयात जाऊनही भेट घेतली. यासोबतच अपघाताला जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देशही दिले. 

रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणीया अपघातानंतर काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या घटनेपासून भाजप पळू शकत नाही. भाजपने याची जबाबदारी घ्यावी, असे काँग्रेसने म्हटले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान मोदी ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात व्यस्त आहेत, पण रेल्वे सुरक्षेकडे लक्ष देत नसल्याचा आरोप केला.

टॅग्स :Odisha Coromandel Express Accidentओडिशा कोरोमंडल एक्सप्रेस अपघातcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपा