शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

Odisha Train Accident: '26/11 वेळी NSG ला मुंबईत यायला 10 तास लागले', हरदीप सिंग पुरींचा काँग्रेसवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2023 19:52 IST

Coromandel Express Derail: कोरोमंडल ट्रेन अपघातानंतर काँग्रेसकडून रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.

Hardeep Singh Puri : ओडिशातील बालासोरमध्ये कोरोमंडल ट्रेनचा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर विरोधकांकडून रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. यावरुन केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. जम्मू-काश्मीर दौऱ्यावर असलेल्या पुरी यांनी 26/11 मुंबई हल्ल्याचा उल्लेख केला. 

सोमवारी(5 जून) माध्यमांशी बोलताना पुरी म्हणाले की, "26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर NSG ला मुंबईत पोहोचण्यासाठी 10 तासांपेक्षा जास्त वेळ लागला होता. ट्रेन दुर्घटनेनंतर पंतप्रधानांनी तात्काळ बालासोर ट्रेन अपघात स्थळाला भेट दिली. तीन केंद्रीय मंत्री देखील होते. अपघातानंतर 51 तासांत रेल्वे रुळ पूर्ववत करण्यात आला."

विरोधी पक्षांच्या बैठकीवरुन हरदीप सिंग पुरी यांनी टीका केली. ते म्हणाले, "आम्हाला एक जबाबदार विरोधी पक्ष हवा आहे, पण ही वेगळ्या प्रकारची विरोधी एकजूट होत आहे. यापैकी अर्धे ते आहेत, ज्यांना नेतृत्व हवंय आणि अर्धे ते आहेत जे कोणाच्यातरी विरोधात आहेत," अशी खोचक टीकाही त्यांनी यावेळी केली.

ओडिशा रेल्वे अपघातात 275 ठारओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात शुक्रवारी (2 जून) भीषण रेल्वे अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. या अपघातात आतापर्यंत 275 जणांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक जखमी झाले आहेत. जखमींवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर पीएम मोदींनी अपघातस्थळाची पाहणी केली आणि काही जखमींची रुग्णालयात जाऊनही भेट घेतली. यासोबतच अपघाताला जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देशही दिले. 

रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणीया अपघातानंतर काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या घटनेपासून भाजप पळू शकत नाही. भाजपने याची जबाबदारी घ्यावी, असे काँग्रेसने म्हटले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान मोदी ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात व्यस्त आहेत, पण रेल्वे सुरक्षेकडे लक्ष देत नसल्याचा आरोप केला.

टॅग्स :Odisha Coromandel Express Accidentओडिशा कोरोमंडल एक्सप्रेस अपघातcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपा