शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

Odisha Train Accident: इंटरलॉकिंग सिस्टममध्ये जाणीवपूर्वक छेडछाड? बालासोर ट्रेन दुर्घटनेबाबत मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 11:17 IST

ओडिशा रेल्वे अपघाताचा तपास सुरू आहे. इंटरलॉकिंग सिस्टीममध्ये छेडछाड झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

Odisha Train Accident: ओडिशा येथील बालोसोर ट्रेन अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागला. यात ११०० जण जखमी झाले आहेत, या अपघाताची चौकशी सुरू झाली आहे. ट्रॅकच्या इंटरलॉकिंग सिस्टीममध्ये जाणीवपूर्वक छेडछाड केल्याचे रेल्वेच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्याचे पुरावेही सापडल्याचे तपासात सांगण्यात येत आहे. अपघातानंतर सर्वाधिक चर्चा या इंटरलॉकिंग प्रणालीची झाली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनीही प्राथमिक तपासाच्या आधारे या यंत्रणेत गडबड असण्याची शक्यता व्यक्त केली होती.

दिल्ली पोलीस ॲक्शनमोडमध्ये; सोमवारी रात्री ब्रिजभूषण सिंहांच्या निवासस्थानी, १५ जणांची चौकशी

सीआरबी रेल्वेने पंतप्रधान कार्यालयाला अपघाताची माहिती दिली आहे. अपघाताबाबत रेल्वेने भीती व्यक्त केली आहे की, जी काही घटना घडली, ती पॉइंट बदलल्यामुळे घडली आहे. पीएमओला सांगण्यात आले की, रेल्वेला असे वाटते की हे सर्व मुद्दाम केले आहे किंवा एखाद्याने केले आहे ज्याला या मुद्द्याची पूर्ण माहिती आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी, प्राथमिक तपासणीत इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टममध्ये छेडछाड केल्याचा स्पष्ट पुरावा आढळला आहे. सीबीआयच्या तपासात याबाबत आणखी काही खुलासे होतील. या अपघातामागे कोणाचा हात आहे, हा अपघात कोणी घडवून आणला, अपघात कसा घडला याचा शोध सीबीआय घेईल.

"इंटरलॉकिंग सिस्टम ही सिग्नलिंगची एक अतिशय सुरक्षित पद्धत आहे. याला 'फेल सेफ' म्हणतात, याचा अर्थ असा की जर सिस्टीममध्ये बिघाड झाला, तर सर्व सिग्नल लाल होतील आणि सर्व गाड्या थांबतील, अशी माहिती त्यांनी दिली. 

रेल्वेच्या म्हणण्यानुसार, जोपर्यंत कोणीतरी या इंटरलॉकिंग प्रणालीशी जाणीवपूर्वक छेडछाड करत नाही, तोपर्यंत मेन लाइनसाठी नियुक्त केलेली लाईन लूप लाइनने बदलणे शक्य नाही. यावर  तपास करावा, अशी शिफारस अधिकाऱ्यांनी केली आहे. भारतीय रेल्वे वापरत असलेल्या इंटरलॉकिंग सिस्टमला चार प्रमाणपत्रे आहेत आणि ती १०० टक्के सुरक्षित मानली जाते.

टॅग्स :Odisha Coromandel Express Accidentओडिशा कोरोमंडल एक्सप्रेस अपघातAccidentअपघातrailwayरेल्वे