शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
2
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
3
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
4
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
5
Pooja Khedkar Mother: नवी मुंबईतून ट्रक चालकाचं अपहरण, पुण्यातील घरात ठेवले डांबून; पूजा खेडकरच्या आईचा प्रताप
6
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
7
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
8
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
9
भारत-विरुद्ध पाकिस्तान सामन्यावर नाना पाटेकर म्हणाले, "आपल्या लोकांचं रक्त वाहिलं आहे..."
10
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
11
VIRAL : भूकंपाच्या झटक्यानं आसाम हादरलं, नर्सनी धाडस दाखवलं! स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले बाळांचे प्राण 
12
'दशावतार' पाहायला गेलेल्या अमराठी प्रेक्षकाच्या डोळ्यांत पाणी, दिलीप प्रभावळकरांना दिला कडक सॅल्यूट, थिएटरमधील व्हिडीओ
13
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
14
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन
15
Navratri 2025: आई तुळजाभवानीची घोर मंचकी निद्रा प्रारंभ; आता दर्शन थेट घटस्थापनेला!
16
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
17
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
18
Stock Markets Today: आठवड्याची सुस्त सुरुवात, ६० अंकांनी वधारला सेन्सेक्स; रियल्टी, मेटल शेअर्समध्ये खरेदी
19
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केलेली ती कृती भोवणार? टीम इंडियावर कारवाई होणार?
20
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?

Coromandal Train Accident: ममता, नितीश, लालू रेल्वेमंत्री असताना 184 अपघात; मृतांचा आकडा हजारोंमध्ये...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2023 21:01 IST

Odisha Train Accident : कोरोमंडल ट्रेन अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोषींवर कडक कारवाच्या सूचना दिल्या आहेत.

Coromandal Train Accident: ओडिशातील बालासोरमध्ये बंगळुरू-हावडा कोरोमंडल सुपरफास्ट एक्स्प्रेसचा भीषण अपघात झाला. भरधाव ट्रेन थांबलेल्या मालगाडीवर धडकून पटरीवरुन उतरली. अवघ्या 20 मिनिटांच्या कालावधीत तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या. या अपघातात 280+ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर 1000 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातानंतर सरकारने CBI चौकशीचे आदेश दिले आहेत.

संबंधित बातमी- गौतम अदानी यांची मोठी घोषणा; कोरोमंडल ट्रेन अपघातातील मृतांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणार

या दुर्घटनेतील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी काल अपघातस्थळी भेट दिली. रेल्वेमंत्री दोन दिवसांपासून घटनास्थळी उपस्थित असून बचावकार्यानंतर सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. यासोबतच हा अपघात कोणत्या कारणामुळे झाला, याची माहितीही त्यांनी दिली आहे. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमुळे हा अपघात झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, देशाचे माजी रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी, नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांच्या काळातही अनेक अपघात झाले आहेत.

ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री असताना 54 रेल्वे अपघात ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री असताना दोन मोठे रेल्वे अपघात झाले होते. तसेच, त्यांच्या काळात एकूण 54 गाड्या एकमेकांवर आदळल्या. 839 गाड्या रुळावरून घसरल्या आणि यात 1451 जणांचा मृत्यू झाला आहे. ममता बॅनर्जी मंत्री झाल्यानंतर अवघ्या 15 महिन्यांत डझनभर मोठ्या रेल्वे अपघातांमध्ये सुमारे 270 प्रवाशांचा मृत्यू झाला होता.

नितीश रेल्वेमंत्री असताना 79 रेल्वे अपघात बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 19 मार्च 1999 ते ऑगस्ट 1999 पर्यंत म्हणजे फक्त 139 दिवस आणि पुन्हा 20 मार्च 2001 ते 22 मे 2004 पर्यंत म्हणजे 3 वर्षे 63 दिवस रेल्वे मंत्री म्हणून काम केले. त्यादरम्यान 79 रेल्वे अपघात झाले, तर 1000 गाड्या रुळावरून घसरल्या. या अपघातांमध्ये सुमारे 1527 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. ऑगस्ट 1999 मध्ये आसाममध्ये गॅसल ट्रेन अपघातात किमान 290 प्रवासी ठार झाले होते.

संबंधित बातमी- LIC चा मोठा निर्णय; ओडिशा ट्रेन अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना लवकर मिळणार क्लेम

लालू यादव रेल्वेमंत्री असताना 51 रेल्वे अपघात 

बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी 22 मे 2004 ते 22 मे 2009 या कालावधीसाठी रेल्वेमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली. रेल्वेमंत्री असताना त्यांनी रेल्वेसाठी खूप काम केले, असे त्यांच्याबद्दल बोलले जाते. पण, यादरम्यान 51 गाड्या एकमेकांवर आदळल्या आणि 550 गाड्या रुळावरून घसरल्या. या अपघातांमध्ये 1159 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता.

 

टॅग्स :Odisha Coromandel Express Accidentओडिशा कोरोमंडल एक्सप्रेस अपघातNitish Kumarनितीश कुमारMamata Banerjeeममता बॅनर्जीLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवAshwini Vaishnawअश्विनी वैष्णव