शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
3
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
4
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
5
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
6
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
7
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
8
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
9
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
10
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
11
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
12
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
13
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
14
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
15
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
16
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
17
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
18
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
19
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
20
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?

Coromandal Train Accident: ममता, नितीश, लालू रेल्वेमंत्री असताना 184 अपघात; मृतांचा आकडा हजारोंमध्ये...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2023 21:01 IST

Odisha Train Accident : कोरोमंडल ट्रेन अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोषींवर कडक कारवाच्या सूचना दिल्या आहेत.

Coromandal Train Accident: ओडिशातील बालासोरमध्ये बंगळुरू-हावडा कोरोमंडल सुपरफास्ट एक्स्प्रेसचा भीषण अपघात झाला. भरधाव ट्रेन थांबलेल्या मालगाडीवर धडकून पटरीवरुन उतरली. अवघ्या 20 मिनिटांच्या कालावधीत तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या. या अपघातात 280+ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर 1000 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातानंतर सरकारने CBI चौकशीचे आदेश दिले आहेत.

संबंधित बातमी- गौतम अदानी यांची मोठी घोषणा; कोरोमंडल ट्रेन अपघातातील मृतांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणार

या दुर्घटनेतील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी काल अपघातस्थळी भेट दिली. रेल्वेमंत्री दोन दिवसांपासून घटनास्थळी उपस्थित असून बचावकार्यानंतर सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. यासोबतच हा अपघात कोणत्या कारणामुळे झाला, याची माहितीही त्यांनी दिली आहे. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमुळे हा अपघात झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, देशाचे माजी रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी, नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांच्या काळातही अनेक अपघात झाले आहेत.

ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री असताना 54 रेल्वे अपघात ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री असताना दोन मोठे रेल्वे अपघात झाले होते. तसेच, त्यांच्या काळात एकूण 54 गाड्या एकमेकांवर आदळल्या. 839 गाड्या रुळावरून घसरल्या आणि यात 1451 जणांचा मृत्यू झाला आहे. ममता बॅनर्जी मंत्री झाल्यानंतर अवघ्या 15 महिन्यांत डझनभर मोठ्या रेल्वे अपघातांमध्ये सुमारे 270 प्रवाशांचा मृत्यू झाला होता.

नितीश रेल्वेमंत्री असताना 79 रेल्वे अपघात बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 19 मार्च 1999 ते ऑगस्ट 1999 पर्यंत म्हणजे फक्त 139 दिवस आणि पुन्हा 20 मार्च 2001 ते 22 मे 2004 पर्यंत म्हणजे 3 वर्षे 63 दिवस रेल्वे मंत्री म्हणून काम केले. त्यादरम्यान 79 रेल्वे अपघात झाले, तर 1000 गाड्या रुळावरून घसरल्या. या अपघातांमध्ये सुमारे 1527 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. ऑगस्ट 1999 मध्ये आसाममध्ये गॅसल ट्रेन अपघातात किमान 290 प्रवासी ठार झाले होते.

संबंधित बातमी- LIC चा मोठा निर्णय; ओडिशा ट्रेन अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना लवकर मिळणार क्लेम

लालू यादव रेल्वेमंत्री असताना 51 रेल्वे अपघात 

बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी 22 मे 2004 ते 22 मे 2009 या कालावधीसाठी रेल्वेमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली. रेल्वेमंत्री असताना त्यांनी रेल्वेसाठी खूप काम केले, असे त्यांच्याबद्दल बोलले जाते. पण, यादरम्यान 51 गाड्या एकमेकांवर आदळल्या आणि 550 गाड्या रुळावरून घसरल्या. या अपघातांमध्ये 1159 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता.

 

टॅग्स :Odisha Coromandel Express Accidentओडिशा कोरोमंडल एक्सप्रेस अपघातNitish Kumarनितीश कुमारMamata Banerjeeममता बॅनर्जीLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवAshwini Vaishnawअश्विनी वैष्णव