शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

ओडिशा रेल्वे दुर्घटना : ममतांच्या 'त्या' वक्तव्यावर सुवेंदूंचा पलटवार; म्हणाले, अपघाताला TMC च जबाबदार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 11:08 IST

ममता बॅनर्जी यांनी, या अपघाताच्या CBI चौकशीवरही सवाल खडा केला. त्या म्हणाल्या, 'मी गेल्या 12 वर्षांपूर्वी ज्ञानेश्वरी रेल्वे अपघाताचा तपास सीबीआयकडे सोपवला होता, मात्र यातून काहीही निष्पन्न झाले नाही. सैंथिया प्रकरणातही मी सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. मात्र काहीही झाले नाही.

ओडिशा रेल्वेअपघातानंतर, परिस्थिती पुन्हा एकदा पटरीवर आली आहे. मात्र, यासंदर्भात राजकीय पक्षांमध्ये आरोपबॅनर्जीप्रत्यारोप सुरूच आहेत. अपघातानंतर रेल मंत्री अश्विनी वैष्णव यांना निशाणा बनवले जात होते. मात्र आता सीबीआय चौकशीचा मुद्दा समोर आल्यानंतर, विरोधकांनी पुन्हा एकदा विरोधी सूर आळवला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सीबीआय चौकशीसंदर्भात, याने काहीही साध्य होणार नाही, असे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता भाजपनेही त्यांच्यावर पलटवार केला आहे. पश्चिम बंगालचे विरोध पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी ममतांच्या या वक्तव्यावर पलटवार करत प्रश्न उपस्थित केले आहेत.

मृतांचा आकडा लपवतेय सरकार बॅनर्जी टीएमसी नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सरकारवर गंभीर आरोप करत, सरकार मृतांचा आकडा लपवत असल्याचे म्हटले आहे. ममता म्हणाल्या, 'एका बाजूला मृत्यूंचा पूर आहे आणि लोकांप्रती आपल्या मनात कसल्याही प्रकारची सहानुभूती नाही. सरकारचे लोक जनतेसोबत उभे नाहीत. ते कुठल्याही पद्धतीने मृतांच्या आकड्यांवर अंकुश लावण्याचा प्रयत्न करत आहेत. मी या स्पर्धेचा भाग नाही. मी नेहमीच लोकांबरोबर उभी आहे.

सीबीआय चौकशीवर खडा केला सवाल - यावेळी ममता बॅनर्जी यांनी, या अपघाताच्या CBI चौकशीवरही सवाल खडा केला. त्या म्हणाल्या, 'मी गेल्या 12 वर्षांपूर्वी ज्ञानेश्वरी रेल्वे अपघाताचा तपास सीबीआयकडे सोपवला होता, मात्र यातून काहीही निष्पन्न झाले नाही. सैंथिया प्रकरणातही मी सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. मात्र काहीही झाले नाही. सीबीआय गुन्हे विषयक प्रकरणांचा तपास करते. मात्र ही दुर्घटना आहे. रेल्वे संरक्षण आयोग आहे, सर्वप्रथम तेच चौकशी करतात. लोकांसमोर सत्य यावे एवढीच आमची इच्छा आहे. ही वेळ सत्य दाबण्याची नाही. त्या कुटुंबीयांचा विचार करता ज्यांनी आपले लोक गमावले आहेत.'

भाजपचा पलटवार - ममता बॅनर्जी यांच्या या वक्तव्यावरून भाजपने पलटवार केला आहे. पश्चिम बंगालमधील विरोधीपक्ष नेते सुवेंदू अधिकारी म्हणाले, या घटनेमागे टीएमसीच आहे. ते दुसऱ्या राज्यातील सीबीआय चौकशीसंदर्भात एवढे चिंतित आणि घबरलेले का? हे कॉल रिकॉर्डिंग जे टीएमसी नेत्यांनी शेअर केले आहे, ज्यात रेल्वेचे दोन अधिकारी बोलत आहेत, त्याची चौकशी व्हायला हवी. आपण बालासोरमध्ये सीबीआयसंदर्भात एवढे चिंतित का?

टॅग्स :Odishaओदिशाrailwayरेल्वेMamata Banerjeeममता बॅनर्जीAccidentअपघात