शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Odisha Railway Accident: मला माझ्या भावाशी बोलू द्या... शेवटची इच्छा पूर्ण होताच ट्रेनमध्ये अडकलेल्या तरुणानं सोडले प्राण   

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2023 17:03 IST

Odisha Railway Accident: कदाचित आपल्याकडे शेवटची काही मिनिटेच शिल्लक आहेत, याची जाणीव त्याला झाली. त्यामुळेच त्याने बचाव पथकातील व्यक्तीला छोट्या भावाशी संपर्क साधून देण्याची विनंती केली.

ओदिशामध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघातात जवळपास २८० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. आता या अपघातादरम्याच्या करुण कहाण्या जगासमोर येत आहेत. अपघातग्रस्त कोरोमंडल एक्स्प्रेसमधून ललित ऋषिदेव नावाचा तरुणही प्रवाक करत होता. जेव्हा तो ट्रेनमध्ये चढला तेव्हा हा त्याचा शेवटचा प्रवास आहे, याची त्याला कल्पनाही नव्हती. बिहारमधील पुर्णिया येथे राहणाऱ्या ललितला चेन्नईमध्ये मजुरीचं काम मिळालं होतं.

ललित हा नोकरीसाठी घरातून बाहेर पडला. पण तो चेन्नईला पोहोचू शकला नाही. वाटेतच त्याला मृत्यूने गाठले. ओदिशामधील बालासोर येथे झालेल्या अपघातामध्ये ललित गंभीर जखमी झाला होता. जेव्हा त्याला वाचवण्यासाठी बचाव पथक त्याच्यापर्यंत पोहोचले, तेव्हा त्याची प्रकृती चिंताजनक होती. कदाचित आपल्याकडे शेवटची काही मिनिटेच शिल्लक आहेत, याची जाणीव त्याला झाली. त्यामुळेच त्याने बचाव पथकातील व्यक्तीला छोट्या भावाशी संपर्क साधून देण्याची विनंती केली.

तेव्हा बचाव पथकातील व्यक्तींनी मोबाईल शोधण्यास सुरुवात केली. लवकरच ललितचा मोबाईल सापडला. त्यानंतर त्याचा भाऊ मिथुन ऋषिदेव याला फोन लावण्यात आला. फोनवर ललितने काही मिनिटे त्याच्यासोबत संवाद साधला. त्यानंतर ललितचा मृत्यू झाला. भावाचा अचानक मृत्यू झाल्याने मिथुनलाही शोक अनावर झाला. कुटुंबातील इतर व्यक्तींनाही मोठा धक्का बसला.

दरम्यान, ललिचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी त्याचे कुटुंबीय बालासोरमध्ये पोहोचले. तेव्हा ललितचा मृतदेह शोधण्यासाठी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. खूप शोधाशोध केल्यानंतर ललितचा मृतदेह सापडला. मुलाचा मृतदेह पाहून आई-वडील बेशुद्ध झाले. दरम्यान, ललितसोबत आणखी तिघेजण होते. मात्र त्यातील दोन जणांचा या रेल्वे अपघातात मृत्यू झाला.  

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेAccidentअपघातFamilyपरिवार