शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

ओडिशामध्ये रंगणार तिरंगी लढती! भाजपाची द्विधावस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 10:28 IST

तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकांत भाजपाला बसलेला हादरा व उत्तर प्रदेशात सपा-बसपा आघाडीचे एकत्र जबर आव्हान, या पार्श्वभूमीवर केंद्रातील सत्ता टिकवून ठेवण्यासाठी भाजपा नेतृत्वाने ‘लूक ईस्ट पॉलिसी’ अवलंबली आहे. त्यामध्ये ओडिशाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

- रवी टालेतीन राज्यांतील विधानसभा निवडणुकांत भाजपाला बसलेला हादरा व उत्तर प्रदेशात सपा-बसपा आघाडीचे एकत्र जबर आव्हान, या पार्श्वभूमीवर केंद्रातील सत्ता टिकवून ठेवण्यासाठी भाजपा नेतृत्वाने ‘लूक ईस्ट पॉलिसी’ अवलंबली आहे. त्यामध्ये ओडिशाला महत्त्व प्राप्त झाले आहे. लोकसभेत २१ सदस्य पाठविणाऱ्या ओडिशात लोकसभा व विधानसभा निवडणूक एकत्रच होत आहे. तब्बल १९ वर्षांपासून सलग एकहाती सत्ता बिजू जनता दलाला सत्तेतून काढण्याचा भाजपा नेतृत्वाचा मनसुबा आहे. काही वर्षांपूर्वी बिजदसोबत युती असलेल्या भाजपाने राज्यात प्रभाव वाढवत, कधीकाळी प्रबळ असलेल्या कॉंग्रेसला तिसºया क्रमांकावर पोहोचविले आहे. मात्र लोकसभेतील संख्याबळ वाढविण्यासाठी कॉंग्रेसचेही लक्ष ओडिशावर आहे. त्यामुळे येथील निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे.तिरंगी लढती व सुमारे दोन दशके सत्तेत असल्याने बिजदला करावा लागणार असलेला सत्ताविरोधी लहरीचा सामना, यामुळे या राज्यात चांगली संधी असल्याचे भाजपाला वाटते. जनतेने अनेक वर्षे कॉंग्रेसला व नंतर बिजदला १९ वर्षे संधी दिली असून, आता आम्हाला पाच वर्षांसाठी संधी दिल्यास आम्ही ओडिशाला देशातील क्रमांक एकचे राज्य बनवू, यावर भाजपाचा जोर आहे.आपल्या कामगिरीत सुधारणा करण्यासाठी भाजपाला बिजदविरोधात आघाडी उघडण्याची गरज आहे; मात्र राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा ते करताना दिसत नाही. त्यामागचे कारण भाजपा नेतृत्वाला बिजदचे नेते नवीन पटनायक यांना दुखवायचे नाही. बहुमतासाठी जागा कमी पडल्यास, बिजद मदत करू शकेल, असे भाजपाला वाटते.या द्विधा मनस्थितीचा भाजपाला फटका बसण्याची शक्यताही नाकारता येत नाही. दुसरे कारण भाजपाला सारी मदार पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आहे. मात्र मोदीच व्यक्तिश: नवीन पटनायक सरकारवर तुटून पडण्याचे टाळत आहेत. आपल्या तिन्ही दौºयात त्यांनी पटनायक सरकारवर कठोर टीका केली नाही.भाजपा व कॉंग्रेसपासून समान अंतर राखण्याचे पटनायक यांचे धोरण असले तरी, तिसºया आघाडीबाबतही ते उत्सुक नाहीत. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या गैरभाजपा, गैरकॉंग्रेस आघाडीच्या प्रस्तावाला पटनायक यांचा प्रतिसाद थंड होता. मात्र राष्ट्रपती निवडणुकीत रामनाथ कोविंद यांना पाठिंबा, मोदी सरकारच्या विरोधातील अविश्वास प्रस्तावावरील मतदानाच्या वेळी त्यांच्या खासदारांचे बहिर्गमन, मोदी सरकारच्या अनेक विधेयकांना पाठिंबा, या कृतींतून आपल्याला भाजपाचे वावडे नसल्याचे त्यांनी दाखवून दिले मात्र महानदी पाणीवाटप वा ओडिशाला विशेष दजाच्या मागणीवरून त्यांनी मोदींवर टीकाही केली. या मुद्यांद्वारे मतांची बेगमी करता येते, हे त्यांनी बरोबर ओळखले आहे.काँग्रेस द्विधा मन:स्थितीत नाहीकाँग्रेसला भाजपाविरोधात मिळतील तेवढ्या पक्षांची साथ हवीच असली आहे. पण पटनायकविरोधात आघाडीसाठी भाजपाप्रमाणे काँग्रेस द्विधा मन:स्थितीत दिसत नाही. राहुल गांधी यांनी जानेवारीत ओडिशाला भेट दिली, तेव्हा त्यांनी भाजपा व बिजदवरही टीकास्त्र डागले. आपल्याला भाजपा आणि बिजद यांच्याशी लढा द्यायचा असल्याचे त्यांच्या टीकेतून स्पष्टपणे दिसले. त्यामुळे राज्यात तिरंगी लढती रंगण्याची शक्यता आहे.एकूण जागा : लोकसभा - २१बिजद ९भाजपा ७कॉँग्रेस ५एकूण जागा : विधानसभा - १४७बिजद ११८कॉँग्रेस १५भाजपा १०अन्य ४

टॅग्स :PoliticsराजकारणOdishaओदिशाcongressकाँग्रेसBJPभाजपा