शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

ओडिशामध्ये रंगणार तिरंगी लढती! भाजपाची द्विधावस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 10:28 IST

तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकांत भाजपाला बसलेला हादरा व उत्तर प्रदेशात सपा-बसपा आघाडीचे एकत्र जबर आव्हान, या पार्श्वभूमीवर केंद्रातील सत्ता टिकवून ठेवण्यासाठी भाजपा नेतृत्वाने ‘लूक ईस्ट पॉलिसी’ अवलंबली आहे. त्यामध्ये ओडिशाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

- रवी टालेतीन राज्यांतील विधानसभा निवडणुकांत भाजपाला बसलेला हादरा व उत्तर प्रदेशात सपा-बसपा आघाडीचे एकत्र जबर आव्हान, या पार्श्वभूमीवर केंद्रातील सत्ता टिकवून ठेवण्यासाठी भाजपा नेतृत्वाने ‘लूक ईस्ट पॉलिसी’ अवलंबली आहे. त्यामध्ये ओडिशाला महत्त्व प्राप्त झाले आहे. लोकसभेत २१ सदस्य पाठविणाऱ्या ओडिशात लोकसभा व विधानसभा निवडणूक एकत्रच होत आहे. तब्बल १९ वर्षांपासून सलग एकहाती सत्ता बिजू जनता दलाला सत्तेतून काढण्याचा भाजपा नेतृत्वाचा मनसुबा आहे. काही वर्षांपूर्वी बिजदसोबत युती असलेल्या भाजपाने राज्यात प्रभाव वाढवत, कधीकाळी प्रबळ असलेल्या कॉंग्रेसला तिसºया क्रमांकावर पोहोचविले आहे. मात्र लोकसभेतील संख्याबळ वाढविण्यासाठी कॉंग्रेसचेही लक्ष ओडिशावर आहे. त्यामुळे येथील निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे.तिरंगी लढती व सुमारे दोन दशके सत्तेत असल्याने बिजदला करावा लागणार असलेला सत्ताविरोधी लहरीचा सामना, यामुळे या राज्यात चांगली संधी असल्याचे भाजपाला वाटते. जनतेने अनेक वर्षे कॉंग्रेसला व नंतर बिजदला १९ वर्षे संधी दिली असून, आता आम्हाला पाच वर्षांसाठी संधी दिल्यास आम्ही ओडिशाला देशातील क्रमांक एकचे राज्य बनवू, यावर भाजपाचा जोर आहे.आपल्या कामगिरीत सुधारणा करण्यासाठी भाजपाला बिजदविरोधात आघाडी उघडण्याची गरज आहे; मात्र राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा ते करताना दिसत नाही. त्यामागचे कारण भाजपा नेतृत्वाला बिजदचे नेते नवीन पटनायक यांना दुखवायचे नाही. बहुमतासाठी जागा कमी पडल्यास, बिजद मदत करू शकेल, असे भाजपाला वाटते.या द्विधा मनस्थितीचा भाजपाला फटका बसण्याची शक्यताही नाकारता येत नाही. दुसरे कारण भाजपाला सारी मदार पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आहे. मात्र मोदीच व्यक्तिश: नवीन पटनायक सरकारवर तुटून पडण्याचे टाळत आहेत. आपल्या तिन्ही दौºयात त्यांनी पटनायक सरकारवर कठोर टीका केली नाही.भाजपा व कॉंग्रेसपासून समान अंतर राखण्याचे पटनायक यांचे धोरण असले तरी, तिसºया आघाडीबाबतही ते उत्सुक नाहीत. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या गैरभाजपा, गैरकॉंग्रेस आघाडीच्या प्रस्तावाला पटनायक यांचा प्रतिसाद थंड होता. मात्र राष्ट्रपती निवडणुकीत रामनाथ कोविंद यांना पाठिंबा, मोदी सरकारच्या विरोधातील अविश्वास प्रस्तावावरील मतदानाच्या वेळी त्यांच्या खासदारांचे बहिर्गमन, मोदी सरकारच्या अनेक विधेयकांना पाठिंबा, या कृतींतून आपल्याला भाजपाचे वावडे नसल्याचे त्यांनी दाखवून दिले मात्र महानदी पाणीवाटप वा ओडिशाला विशेष दजाच्या मागणीवरून त्यांनी मोदींवर टीकाही केली. या मुद्यांद्वारे मतांची बेगमी करता येते, हे त्यांनी बरोबर ओळखले आहे.काँग्रेस द्विधा मन:स्थितीत नाहीकाँग्रेसला भाजपाविरोधात मिळतील तेवढ्या पक्षांची साथ हवीच असली आहे. पण पटनायकविरोधात आघाडीसाठी भाजपाप्रमाणे काँग्रेस द्विधा मन:स्थितीत दिसत नाही. राहुल गांधी यांनी जानेवारीत ओडिशाला भेट दिली, तेव्हा त्यांनी भाजपा व बिजदवरही टीकास्त्र डागले. आपल्याला भाजपा आणि बिजद यांच्याशी लढा द्यायचा असल्याचे त्यांच्या टीकेतून स्पष्टपणे दिसले. त्यामुळे राज्यात तिरंगी लढती रंगण्याची शक्यता आहे.एकूण जागा : लोकसभा - २१बिजद ९भाजपा ७कॉँग्रेस ५एकूण जागा : विधानसभा - १४७बिजद ११८कॉँग्रेस १५भाजपा १०अन्य ४

टॅग्स :PoliticsराजकारणOdishaओदिशाcongressकाँग्रेसBJPभाजपा