शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
2
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
3
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
4
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
5
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
6
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
7
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
8
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
9
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
10
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
11
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
12
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
13
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
14
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
15
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
16
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
17
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
18
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
19
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
20
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य

आई तुझा आशीर्वाद... कन्फर्म सीट असतानाही सुदैवानेच बचावला १० वी पास मुलगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2023 19:04 IST

कोरोमंडल एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका १६ वर्षीय मुलासाठी त्याच्या आईचं प्रेम सर्वार्धाने नवं आयुष्य देणारं ठरलं.

- ओडिशातील बालासोर येथील भीषण अपघातात जवळपास ३०० जणांचा मृत्यू झाला असून १ हजारांहून अधिकजण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू असून अनेकांना घरी सोडण्यात आलं आहे. तर, काहींवरही गंभीर असल्याने उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेत अनेकजण सुदैवाने बचावले आहे. देव तारी त्याला कोण मारी ही म्हण खऱ्या अर्थाने खरी ठरल्याचं अनेक उदाहरणांतून समोर आलं. अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी दुर्घटनेत काही अशा घटनांमुळे थोडासा दिलासा मिळतोय. तर, या अपघातातून ज्यांचा जीव वाचला त्यांच्या कुटुंबीयांसाठी हा सर्वात मोठा भाग्याचा क्षण ठरला. 

कोरोमंडल एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका १६ वर्षीय मुलासाठी त्याच्या आईचं प्रेम सर्वार्धाने नवं आयुष्य देणारं ठरलं. आई तुझा आशीर्वाद... असंच काहीसं म्हणावं लागेल. ज्यामुळे, अपघात झालेल्या बोगीत सीट असतानाही जॉर्ज तिथं नव्हता. कोरोमंडल एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका १६ वर्षीय विद्यार्थ्याचं नशिबच थोर म्हणावं लागेल. बेरहामपूर येथील जॉर्ज जॅकब दास याने नुकतेच १० वीची परीक्षा पास केली आहे. आपल्या आई-वडिलांसोबत तो कोरोमंडल एक्सप्रेसमधून प्रवास करत होता. त्यावेळी, आई-वडिलांचे रिझर्व्हेशन कोच बी २ मध्ये होते. तर, जॉर्ज जॅकब दास याला कोरोमंडल एक्सप्रेसच्या बी८ मध्ये सीट मिळाली होती. मात्र, त्याच्या आई-वडिलांना जॉर्जला बी८ मध्ये बसण्यास विरोध करत टीसीकडे त्याचे सीट बदलून देण्याची विनंती केली. मात्र, त्यांचे हे प्रयत्न अयशस्वी ठरले. त्यानंतर, वडिल ईजेकील दास यांनी त्याला त्यांच्याच जागेवरुन प्रवास करण्याचा सल्ला दिला.  

विशेष म्हणजे जॉर्जची सीट बदलण्याची विनंती करण्यासाठी ते जॉर्जला घेऊन बी८ मध्ये जाणार होते. मात्र, जॉर्जच्या आईने रात्री ८ नंतर जेवण केल्यावर तू तिकडे जा, असे सूचवले. त्यामुळे, जॉर्ज आई-वडिलांपाशी बी २ मध्येच राहिला. दरम्यान, रेल्वे अपघात झाल्याचा आवाज झाला आणि ते ज्या बोगीत होते ती बोगीही जागेवर हलायला लागली होती. जेव्हा रेल्वे थांबली आणि बाहेर येऊन पाहिलं असता, सर्वत्र हात-पाय पसरल्याचं दिसून आलं. अनेकांचे मृतदेह रुळाजवळच पडले होते. नशिब बलवत्तर म्हणून ईजेकील हे कुटुंबासह घरी परत आले. त्यावेळी, त्यांना बी ८ मधील अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. तर, याच बोगीतील अनेकजण गंभीर जखमीही झाले आहेत.

आईच्या निर्णयामुळेच जॉर्ज बी ८ मध्ये न जाता आई-वडिलांजवळ बी २ मध्ये राहिला. सुदैवाने त्याचा जीव वाचला. मात्र, घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून देव तारी त्याला कोण मारी... किंवा आई तुझा आशीर्वाद... म्हणूनच १६ वर्षीय जॉर्ज जॅकब दासला नवजीवन मिळालं, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.   

टॅग्स :AccidentअपघातOdisha Coromandel Express Accidentओडिशा कोरोमंडल एक्सप्रेस अपघातrailwayरेल्वे