शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
3
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
4
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
5
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
6
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
7
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
8
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
9
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
10
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
11
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
12
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
13
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
14
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
15
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
16
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
17
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
18
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
19
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
20
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!

निष्काळजीपणाचा कळस! मध्यान्ह भोजनात सापडली पाल; १०० मुलं पडली आजारी, घटनेने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 12:28 IST

ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील सोरो ब्लॉकमधील सिरापूर गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर शाळेतील तब्बल १०० मुलं आजारी पडल्याची घटना समोर आली आहे.

ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील सोरो ब्लॉकमधील सिरापूर गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर शाळेतील तब्बल १०० मुलं आजारी पडल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी परिसरातील उदयनारायण नोडल शाळेतील १०० विद्यार्थी आजारी पडले. मध्यान्ह भोजनात पाल सापडल्याचं म्हटलं जात आहे. 

रिपोर्टनुसार, विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देण्यात आलं होतं. जेवण सुरू झाल्यानंतर काही वेळातच एका मुलाने त्यात पाल दिसल्याचं सांगितलं. त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं. शाळेच्या अधिकाऱ्यांनी अन्न वाटप थांबवलं आणि विद्यार्थ्यांना जेवू नका असं सांगितलं.

अनेक विद्यार्थ्यांना यानंतर पोटदुखी, छातीत दुखणे अशा समस्या होऊ लागल्या. यानंतर शिक्षकांनी रुग्णवाहिका आणि इतर वाहनांच्या मदतीने विद्यार्थ्यांना सोरो कम्युनिटी हेल्थ सेंटर (CHC) येथे नेले. तसेच सीएचसीच्या वैद्यकीय पथकाने शाळेला भेट देऊन मुलांवर उपचार केले. मुलांना जेवल्यानंतर उलट्या झाल्या. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी सीएचसीमध्ये दाखल करण्यात आले.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, "मला अशी माहिती मिळाली आहे की उदयनारायण नोडल शाळेतील काही विद्यार्थी मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर आजारी पडले आहेत. काही पालक आणि शाळेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले आहे, तेथे गेल्यानंतर मला कळलं की दोन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे. ५० हून अधिक विद्यार्थी येथे दाखल आहेत."

शाळेच्या मुख्याध्यापिका कविता सोरेन म्हणाल्या की , "मला मील इन्चार्जचा फोन आला की मध्यान्ह भोजनात एक पाल सापडली आहे, त्यानंतर मी ताबडतोब तेथे पोहोचले आणि जेवण बंद करण्याची ऑर्डर दिली. आत्तापर्यंत १०० हून अधिक विद्यार्थी रुग्णालयात दाखल आहेत. मी माझ्या शाळेतील इतर कर्मचाऱ्यांसह तेथे जाण्याच्या तयारीत आहे." 

टॅग्स :OdishaओदिशाSchoolशाळाStudentविद्यार्थी