शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भारतातील लहान मुलांची संख्या २०५० पर्यंत ३५ कोटींवर पोहोचणार; हवामान बदलामुळे संकटांचा करावा लागणार सामना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 08:06 IST

युनिसेफच्या अहवालातील निष्कर्ष: विद्यमान आकडेवारीच्या तुलनेत भारतात मुलांच्या संख्येत १० कोटींहून अधिक संख्येने घट होणार आहे.

नवी दिल्ली : भारतामध्ये २०५० सालापर्यंत लहान मुलांची संख्या ३५ कोटी होणार असून, त्यांचे भविष्य सुरक्षित करणे हे मोठे आव्हान असणार आहे. हवामान बदल, पर्यावरणामुळे निर्माण होणारी संकटे यांच्याइतकेच हे तगडे आव्हान असेल, असे युनिसेफच्या ताज्या अहवालामध्ये म्हटले आहे. 

विद्यमान आकडेवारीच्या तुलनेत भारतात मुलांच्या संख्येत १० कोटींहून अधिक संख्येने घट होणार आहे. सध्या भारतामध्ये ४४ कोटींहून अधिक लहान मुले आहेत. युुनिसेफने जागतिक पातळीवरील मुलांच्या संख्येबाबत यंदाच्या वर्षीचा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला. त्यात म्हटले आहे की, लोकसंख्येत होणारे बदल, पर्यावरणामुळे उभी ठाकणारी संकटे, बदलते तंत्रज्ञान यामुळे २०५० सालापर्यंत या मुलांच्या जीवनमानातही बदल होतील. 

दी एनर्जी रिसर्च इन्स्टिट्यूटच्या (टीईआरआय) सुरुची भडवाल, युनिसेफचे कार्तिक वर्मा, युनिसेफच्या भारताच्या प्रतिनिधी सिंथिया मॅककॅफ्रे यांनी हा अहवाल सर्वांसाठी खुला केला. त्यात म्हटले आहे की, २०५०पर्यंत लहान मुलांना हवामान बदल तसेच पर्यावरणीय धोक्यांचा सामना करावा लागेल. २००० सालाच्या तुलनेत आठ पट जास्त मुलांना उष्णतेच्या तीव्र लाटेला सामोरे जावे लागणार आहे. 

कमी उत्पन्न असलेल्या देशांत विशेषत: आफ्रिकेत या आव्हानांचा सामना करण्यासाठी अपुरी संसाधने असण्याची शक्यता आहे. आफ्रिकेतील देशांत दारिद्र्य, कमी शिक्षण, आरोग्याची हेळसांड अशा अनेक समस्या आहेत. त्यातील काही देशांत सतत युद्धग्रस्त वातावरण असते. त्यामुळे त्या देशांतील लहान मुलांची स्थिती अधिक हालाखीची आहे. 

संकटे टाळण्यासाठी तंत्रज्ञान महत्त्वाचे

दी एनर्जी रिसर्च इन्स्टिट्यूटच्या सुरुची भडवाल यांनी सांगितले की, हवामान बदलाच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणामांचा लहान मुलांना तडाखा बसण्याची शक्यता आहे. उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये ९५ टक्क्यांहून अधिक लोक इंटरनेटच्या जाळ्याशी जोडलेले आहेत. 

कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये हे प्रमाण फक्त २६ टक्के आहे. हवामान, पर्यावरणाच्या धोक्यांची आगाऊ सूचना मिळण्याच्या व त्यादृष्टीने दक्षतेचे उपाय घेण्याकामी आधुनिक तंत्रज्ञान खूप उपयोगी ठरते. कमी उत्पन्न असलेल्या देशांनी ही बाब लक्षात घेतली पाहिजे.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयIndiaभारतweatherहवामान