शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

बिहारमध्ये एनआरसी लागू करणार नाही; भाजपाला मित्रपक्षाकडून धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 06:30 IST

एनआरसीची बिहारमध्ये अंमलबजावणी करण्याची गरज नाही. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबद्दल बिहार विधानसभेमध्ये चर्चा घडवून आणण्यास जनता दल (यू)-भाजपचे आघाडी सरकार तयार आहे.

पाटणा : नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझन्स (एनआरसी) ची बिहारमध्ये अंमलबजावणी करण्याची गरज नाही. इतकेच नव्हे, तर संपूर्ण देशातही तो लागू करण्याची आवश्यकता नाही आणि तशी कृती करण्याचे औचित्यही दिसत नाही, असे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी म्हटले आहे. मित्रपक्ष असलेल्या जनता दल (संयुक्त)च्या अध्यक्षांनीच ही भूमिका घेतल्याने भाजप नेते अस्वस्थझाले आहेत.

याआधी भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीत असलेल्या अकाली दल व आसाम गण परिषदेनेही हीच भूमिका घेतली. भाजपचे समर्थन करणाऱ्या बिजू जनता दलानेही आता त्याला विरोध केला आहे आणि आता नितीश कुमार यांच्या पक्षानेही विरोध केला आहे. त्यांच्या आधी त्या पक्षाचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांनीही एनआरसी व सीएएला विरोध दर्शवला होता.

नागरिकत्व दुरुस्ती कायदा, एनआरसी, एनपीआर या तीन विषयांवर भाजपप्रणित एनडीएचा घटक पक्ष असलेल्या जनता दल (यू)चे प्रमुख व मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी केली होती. त्यानंतर नितीशकुमार यांनी एनआरसी देशात राबवावी, असा आग्रह धरला जात असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. सीएए, एनआरसी, एनपीआरविरोधात जागोजागी निदर्शने होत आहेत.

आसाममधील घुसखोरांचा प्रश्न सोडविण्यासाठी एनआरसी तयार करण्यात आली. आसाममधील संघटनांनी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबरोबर केलेल्या करारामध्ये या योजनेची तरतूद होती. एनआरसी देशभरात राबविण्याची गरज नाही.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या विषयावर स्पष्ट भूमिका मांडली आहे असे नितीशकुमार म्हणाले.भूमिका बदलणार?नितीशकुमार म्हणाले की, एनआरसीची बिहारमध्ये अंमलबजावणी करण्याची गरज नाही. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबद्दल बिहार विधानसभेमध्ये चर्चा घडवून आणण्यास जनता दल (यू)-भाजपचे आघाडी सरकार तयार आहे. या विधेयकाला संसदेत जनता दल (यू)ने पाठिंबा दिला होता. कायद्याविरोधात देशभर सुरू असलेली निदर्शनांमुळे नितीशकुमार भूमिका बदलण्याचा विचार करीत आहेत की काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBJPभाजपा