शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
2
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
3
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
4
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
5
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
6
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
7
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
8
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
9
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
10
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
11
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
12
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
13
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
14
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
15
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
16
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
17
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
18
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
19
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
20
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?

बिहारमध्ये एनआरसी लागू करणार नाही; भाजपाला मित्रपक्षाकडून धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 06:30 IST

एनआरसीची बिहारमध्ये अंमलबजावणी करण्याची गरज नाही. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबद्दल बिहार विधानसभेमध्ये चर्चा घडवून आणण्यास जनता दल (यू)-भाजपचे आघाडी सरकार तयार आहे.

पाटणा : नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझन्स (एनआरसी) ची बिहारमध्ये अंमलबजावणी करण्याची गरज नाही. इतकेच नव्हे, तर संपूर्ण देशातही तो लागू करण्याची आवश्यकता नाही आणि तशी कृती करण्याचे औचित्यही दिसत नाही, असे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी म्हटले आहे. मित्रपक्ष असलेल्या जनता दल (संयुक्त)च्या अध्यक्षांनीच ही भूमिका घेतल्याने भाजप नेते अस्वस्थझाले आहेत.

याआधी भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीत असलेल्या अकाली दल व आसाम गण परिषदेनेही हीच भूमिका घेतली. भाजपचे समर्थन करणाऱ्या बिजू जनता दलानेही आता त्याला विरोध केला आहे आणि आता नितीश कुमार यांच्या पक्षानेही विरोध केला आहे. त्यांच्या आधी त्या पक्षाचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांनीही एनआरसी व सीएएला विरोध दर्शवला होता.

नागरिकत्व दुरुस्ती कायदा, एनआरसी, एनपीआर या तीन विषयांवर भाजपप्रणित एनडीएचा घटक पक्ष असलेल्या जनता दल (यू)चे प्रमुख व मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी केली होती. त्यानंतर नितीशकुमार यांनी एनआरसी देशात राबवावी, असा आग्रह धरला जात असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. सीएए, एनआरसी, एनपीआरविरोधात जागोजागी निदर्शने होत आहेत.

आसाममधील घुसखोरांचा प्रश्न सोडविण्यासाठी एनआरसी तयार करण्यात आली. आसाममधील संघटनांनी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबरोबर केलेल्या करारामध्ये या योजनेची तरतूद होती. एनआरसी देशभरात राबविण्याची गरज नाही.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या विषयावर स्पष्ट भूमिका मांडली आहे असे नितीशकुमार म्हणाले.भूमिका बदलणार?नितीशकुमार म्हणाले की, एनआरसीची बिहारमध्ये अंमलबजावणी करण्याची गरज नाही. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबद्दल बिहार विधानसभेमध्ये चर्चा घडवून आणण्यास जनता दल (यू)-भाजपचे आघाडी सरकार तयार आहे. या विधेयकाला संसदेत जनता दल (यू)ने पाठिंबा दिला होता. कायद्याविरोधात देशभर सुरू असलेली निदर्शनांमुळे नितीशकुमार भूमिका बदलण्याचा विचार करीत आहेत की काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBJPभाजपा