शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

एनआरसीबाबत अमित शाह यांची मोठी घोषणा, संपूर्ण देशात लागू होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 15:18 IST

नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स (एनआरसी) आता संपूर्ण देशभरासाठी लागू करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज राज्यसभेत केली.

नवी दिल्ली -नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स (एनआरसी) आता संपूर्ण देशभरासाठी लागू करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज राज्यसभेत केली. तसेच एनआरसीमध्ये धर्माच्या आधारावर भेदभाव केला जाणार नाही तर जे भारताचे नागरिक असतील त्या सर्वांना एनआरसीमध्ये सामावून घेतले जाणार आहे, असे अमित शाह यांनी सांगितले. त्याबरोबरच एनआरसी आणि सिटीझनशिप अमेंडमेंट बिल (नागरिकता संशोधन विधेयक) यात फरक असल्याचेही अमित शाह यांनी यावेळी स्पष्ट केले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज राज्यसभेमध्ये प्रश्नोत्तराच्या तासावेळी  एनआरसी संदर्भात विचारण्यात आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. तसेच एनआरसी  आणि  नागरिकता संशोधन बिल यांच्यातील फरकही स्पष्ट केला.

काही विशिष्ट्य धर्माच्या लोकांना एनआरसीमध्ये नाव नोंदवता येणार नसल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. मात्र एनआरसीमध्ये कुठल्याही विशिष्ट्य धर्माच्या लोकांना वगळण्याची तरतूद नाही. कुठल्याही जातीधर्माच्या व्यक्ती जे भारतीय नागरिक असतील त्यांचा एनआरसीमध्ये समावेश होईल. तसेच एनआरसी आणि नागरिकता संशोधन विधेयक या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत, असे अमित शाह यांनी सांगितले.

यावेळी नागरिकता संशोधन विधेयकाची गरज का आहे हे सुद्धा अमित शाह यांनी स्पष्ट केले. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशमधून धर्माच्या आधारावर निर्वासित करण्यात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, ख्रिश्चन आणि पारशी धर्मियांना नागरिकत्व देण्यासाठी नागरिकता संशोधन विधेयक गरजेचे आहे, असे अमित शाह म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांनुसार आसाममध्ये एनआरसीची प्रक्रिया हाती घेण्यात आली होती. मात्र आता जर संपुर्ण देशात एनआरसीची प्रक्रिया सुरू करण्यात आली तर आसाममध्येही नव्याने एनआरसीची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असेही अमित शाह यांनी सांगितले.

टॅग्स :Amit Shahअमित शहाCentral Governmentकेंद्र सरकारIndiaभारत