शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

भाजपा-संघ एका बाजूला आणि संपूर्ण देश दुसऱ्या बाजूला- राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2018 20:46 IST

दिल्लीतील जंतरमंतर विरोधी पक्षांचे नेते एकत्र

नवी दिल्ली: सध्या भाजपा-संघ एका बाजूला आणि संपूर्ण भारत दुसऱ्या बाजूला असल्याची स्थिती पाहायला मिळत आहे, अशा शब्दांमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी सत्ताधाऱ्यांवर शरसंधान साधलं आहे. बिहारच्या मुजफ्फरपूरमधील बालिकाश्रमात मुलींवर अत्याचार झाल्याची घटना काही दिवसांपूर्वीच उघडकीस आली. या घटनेच्या निषेधार्थ जंतरमंतरवर राष्ट्रीय जनता दलानं आयोजित धरणं आंदोलनात ते बोलत होते. 

जंतरमंतरवरील आंदोलनात विरोधी पक्षांची एकी पुन्हा एकदा दिसून आली आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी सुरू केलेल्या धरणं आंदोलनात आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, आपचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, डाव्या पक्षांचे नेते डी. राजा, सीताराम येचुरी, तृणमूल काँग्रेसचे दिनेश त्रिवेदी, शरद यादव सहभागी झाले आहेत. कर्नाटकमध्ये एच. डी. कुमारस्वामी यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर पुन्हा एकदा विरोधक एकत्र आल्यानं 2019 मध्ये भाजपाविरोधीत 'महाआघाडी'च्या चर्चेला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. 

या आंदोलनात बोलताना राहुल गांधींनी भाजपा-संघासह बिहार सरकारवरही टीका केली. 'सध्या भाजपा-संघ एका बाजूला आणि देशातील जनता दुसऱ्या बाजूला अशी स्थिती आहे. पुढेदेखील हेच चित्र असेल. गेल्या चार वर्षांमध्ये जे घडलंय, ते कोणालाही आवडलेलं नाही,' असं राहुल यावेळी म्हणाले. 'देशातील परिस्थिती वाईट आहे. देशातील गरिब जनतेवर, मग ती महिला असो वा लहान दुकानदार किंवा मग दलित, सगळ्यांवर अन्याय होत आहे. आम्ही या परिस्थितीत देशाच्या जनतेसोबत उभे आहोत,' असं राहुल गांधींनी म्हटलं. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना थोडी जरी लाट वाटत असेल, तर त्यांनी या बलात्कार प्रकरणातील दोषींना शिक्षा द्यावी, अशा शब्दांमध्ये राहुल गांधींनी संताप व्यक्त केला. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दलNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाRapeबलात्कारBiharबिहार