शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

भाजपा-संघ एका बाजूला आणि संपूर्ण देश दुसऱ्या बाजूला- राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2018 20:46 IST

दिल्लीतील जंतरमंतर विरोधी पक्षांचे नेते एकत्र

नवी दिल्ली: सध्या भाजपा-संघ एका बाजूला आणि संपूर्ण भारत दुसऱ्या बाजूला असल्याची स्थिती पाहायला मिळत आहे, अशा शब्दांमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी सत्ताधाऱ्यांवर शरसंधान साधलं आहे. बिहारच्या मुजफ्फरपूरमधील बालिकाश्रमात मुलींवर अत्याचार झाल्याची घटना काही दिवसांपूर्वीच उघडकीस आली. या घटनेच्या निषेधार्थ जंतरमंतरवर राष्ट्रीय जनता दलानं आयोजित धरणं आंदोलनात ते बोलत होते. 

जंतरमंतरवरील आंदोलनात विरोधी पक्षांची एकी पुन्हा एकदा दिसून आली आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी सुरू केलेल्या धरणं आंदोलनात आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, आपचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, डाव्या पक्षांचे नेते डी. राजा, सीताराम येचुरी, तृणमूल काँग्रेसचे दिनेश त्रिवेदी, शरद यादव सहभागी झाले आहेत. कर्नाटकमध्ये एच. डी. कुमारस्वामी यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर पुन्हा एकदा विरोधक एकत्र आल्यानं 2019 मध्ये भाजपाविरोधीत 'महाआघाडी'च्या चर्चेला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. 

या आंदोलनात बोलताना राहुल गांधींनी भाजपा-संघासह बिहार सरकारवरही टीका केली. 'सध्या भाजपा-संघ एका बाजूला आणि देशातील जनता दुसऱ्या बाजूला अशी स्थिती आहे. पुढेदेखील हेच चित्र असेल. गेल्या चार वर्षांमध्ये जे घडलंय, ते कोणालाही आवडलेलं नाही,' असं राहुल यावेळी म्हणाले. 'देशातील परिस्थिती वाईट आहे. देशातील गरिब जनतेवर, मग ती महिला असो वा लहान दुकानदार किंवा मग दलित, सगळ्यांवर अन्याय होत आहे. आम्ही या परिस्थितीत देशाच्या जनतेसोबत उभे आहोत,' असं राहुल गांधींनी म्हटलं. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना थोडी जरी लाट वाटत असेल, तर त्यांनी या बलात्कार प्रकरणातील दोषींना शिक्षा द्यावी, अशा शब्दांमध्ये राहुल गांधींनी संताप व्यक्त केला. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दलNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाRapeबलात्कारBiharबिहार