शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
3
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
4
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
7
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
8
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
9
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
10
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
11
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
12
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
13
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
14
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
15
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
16
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
17
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
18
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
19
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
20
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?

भाजपा-संघ एका बाजूला आणि संपूर्ण देश दुसऱ्या बाजूला- राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2018 20:46 IST

दिल्लीतील जंतरमंतर विरोधी पक्षांचे नेते एकत्र

नवी दिल्ली: सध्या भाजपा-संघ एका बाजूला आणि संपूर्ण भारत दुसऱ्या बाजूला असल्याची स्थिती पाहायला मिळत आहे, अशा शब्दांमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी सत्ताधाऱ्यांवर शरसंधान साधलं आहे. बिहारच्या मुजफ्फरपूरमधील बालिकाश्रमात मुलींवर अत्याचार झाल्याची घटना काही दिवसांपूर्वीच उघडकीस आली. या घटनेच्या निषेधार्थ जंतरमंतरवर राष्ट्रीय जनता दलानं आयोजित धरणं आंदोलनात ते बोलत होते. 

जंतरमंतरवरील आंदोलनात विरोधी पक्षांची एकी पुन्हा एकदा दिसून आली आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी सुरू केलेल्या धरणं आंदोलनात आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, आपचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, डाव्या पक्षांचे नेते डी. राजा, सीताराम येचुरी, तृणमूल काँग्रेसचे दिनेश त्रिवेदी, शरद यादव सहभागी झाले आहेत. कर्नाटकमध्ये एच. डी. कुमारस्वामी यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर पुन्हा एकदा विरोधक एकत्र आल्यानं 2019 मध्ये भाजपाविरोधीत 'महाआघाडी'च्या चर्चेला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. 

या आंदोलनात बोलताना राहुल गांधींनी भाजपा-संघासह बिहार सरकारवरही टीका केली. 'सध्या भाजपा-संघ एका बाजूला आणि देशातील जनता दुसऱ्या बाजूला अशी स्थिती आहे. पुढेदेखील हेच चित्र असेल. गेल्या चार वर्षांमध्ये जे घडलंय, ते कोणालाही आवडलेलं नाही,' असं राहुल यावेळी म्हणाले. 'देशातील परिस्थिती वाईट आहे. देशातील गरिब जनतेवर, मग ती महिला असो वा लहान दुकानदार किंवा मग दलित, सगळ्यांवर अन्याय होत आहे. आम्ही या परिस्थितीत देशाच्या जनतेसोबत उभे आहोत,' असं राहुल गांधींनी म्हटलं. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना थोडी जरी लाट वाटत असेल, तर त्यांनी या बलात्कार प्रकरणातील दोषींना शिक्षा द्यावी, अशा शब्दांमध्ये राहुल गांधींनी संताप व्यक्त केला. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दलNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाRapeबलात्कारBiharबिहार