शहरं
Join us  
Trending Stories
1
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
2
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
3
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
4
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
5
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
6
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
7
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
8
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
9
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
10
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
11
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
12
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
13
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
14
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
15
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
16
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
17
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
18
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
19
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
20
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...

नागरी सहकारी बँकांवर आता नेमण्यात येणार तज्ज्ञांचे व्यवस्थापन मंडळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 02:00 IST

रिझर्व्ह बँकेच्या सूचना; कर्जवाटपावर येणार निर्बंध

मुंबई : पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र (पीएमसी) बँकेतील घोटाळ्यानंतर रिझर्व्ह बँकेने नागरी सहकारी बँकांच्या कर्जवाटपावर काही निर्बंध आणले आहेत. उद्योग व उद्योग समूहांना कर्जे कशी द्यायची, याबाबत नियम घालून देतानाच, रिझर्व्ह बँकेने १00 कोटींहून अधिक ठेवी असणाऱ्या नागरी बँकांना तज्ज्ञांचे व्यवस्थापन मंडळ नेमण्याचा आदेश दिला आहे.या व्यवस्थापन मंडळांमुळे बँकांचे काम अधिक पारदर्शकपणे तसेच व्यावसायिकरीत्या चालेल, अशी रिझर्व्ह बँकेची अपेक्षा आहे. या तज्ज्ञांच्या व्यवस्यापन मंडळांमुळे सध्याच्या संचालकांच्या मनमानी कारभारावर अंकुश येणार आहे. येत्या वर्षभरात १00 कोटींहून अधिक ठेवी असणाºया सर्व नागरी सहकारी बँकांना तज्ज्ञांचे व्यवस्थापन मंडळ नेमावे लागणार आहे. आरबीआयकडून तशा प्रकारच्या सूचना सर्व बँकांना देण्यात आल्या आहेत.नागरी बँकांची स्थिती, त्यांचा कारभार व व्यवसाय, कर्जेवाटपाची पद्धत आणि त्यात करावयाच्या सुधारणा यांसाठी रिझर्व्ह बँकेने आर. गांधी यांची पूर्वीच समिती नियुक्त केली होती. त्या समितीने आधीच आपला अहवाल केला सादर केला होता. पण पीएमसी बँकेतील घोटाळ्यानंतर रिझर्व्ह बँकेने या अहवालातील काही शिफारशींची अंमलबजावणी करण्याचे ठरविले असून, तज्ज्ञांचे व्यवस्थापन मंडळ हा त्याचाच भाग आहे.नागरी सहकारी बँकांमध्ये सध्या संचालक मंडळच सारे निर्णय घेते. पण सहकारी संस्था व सहकारी बँका यांच्या कामात फरक असल्याने या बँकांचे काम अधिक व्यावसायिक पद्धतीने चालायला हवे. त्याबरोबरच त्यात हजारो वा लाखो लोकांच्या ठेवी असल्याने त्यांच्या हितांचे रक्षण व्हायला हवे, या हेतूने व्यवस्थापन मंडळाची शिफारस करण्यात आली होती. बँकांचे संचालक हे बँकिंगमधील तज्ज्ञ असतातच, असे नव्हे. अनेकदा त्यांना त्या विषयाची माहितीही नसते. त्यामुळे अनेकदा बँका अडचणीत येतात. तसे प्रकार टाळणे, हा व्यवस्थापन मंडळ नेमण्यामागील उद्देश आहे.संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयांवरही या तज्ज्ञांच्या मंडळांचा अंकुश राहील. संचालक मंडळाचे निर्णयही प्रसंगी व्यवस्थापन मंडळ बदलू शकेल, असे अधिकार त्यांना असतील. संचालक मंडळांना धोरणे ठरविताना आणि निर्णय घेतानाही व्यवस्थापन मंडळ मदत करेल. याचाच अर्थ या मंडळामार्फत मोठ्या नागरी सहकारी बँकांवर रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण राहणार आहे.मतदानाचा अधिकार नाहीनागरी सहकारी बँकांच्या व्यवस्थापन मंडळात मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच किमान पाच ते कमाल १२ सदस्य असतील. त्यांना निर्णयप्रक्रियेत मतदानाचा अधिकार नसेल. मुख्य कार्यकारी अधिकारी वा व्यवस्थापन मंडळातील सदस्य यांनी ठेवीदारांच्या रक्षणाविरोधात वा रिझर्व्ह बँकेच्या धोरणाविरोधात निर्णय घेतल्यास त्यांना तेथून हटविण्याचा अधिकार रिझर्व्ह बँकेला असेल.

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक