शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कर'नाटका'चा नवा प्रयोग आता गोव्यात; सत्तास्थापनेसाठी काँग्रेस करणार दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2018 18:55 IST

काँग्रेसने कर्नाटकातील राज्यपालांच्या निर्णयाप्रमाणेच देशातील इतर राज्यांमध्ये न्याय मिळावा अशी मागणी केली आहे.

बेंगळुरु- कर्नाटकात सर्वात जास्त सदस्य निवडून आणणाऱ्या पक्षाला म्हणजे भाजपाला राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी बोलावल्यानंतर राज्यामध्ये त्याचे पडसाद अजून उमटत आहेत सर्वोच्च न्यायालयासह सर्व दरवाजे ठोठावल्यानंतर काँग्रेसने याचा पुढचा अंक गोव्यात घेण्याचे ठरवले आहे. गोव्यामध्ये काँग्रेसला इतर पक्षांपेक्षा सर्वात जास्त म्हणजे 16 जागा मिळाल्या होत्या.काँग्रेसने आता गोव्यात 16 आमदारांच्या पत्रांसह राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्याकडे सत्तास्थापनेचा दावा करण्याचे निश्चित केले आहे. त्याबरोबरच मणिपूर आणि मेघालयामध्येही काँग्रेस असा दावा करेल. इतकेच नव्हे तर बिहारमध्ये राजदही आपण सर्वात जास्त सदस्यांचा पक्ष असल्यामुळे सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी आपल्याला राज्यपालांनी बोलवावे अशी विनंती करु शकतो. राजदचे नेते आणि लालूप्रसाद यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनी कालच  ट्वीट करुन कर्नाटकाचा न्याय आम्हाला लावून राजद आणि काँग्रेसला बिहारमध्ये सत्ता स्थापन करु द्यायला हवी असे मत मांडले होते.गोव्यामध्ये बहुमतासाठी काँग्रेसला 4 जागा कमी पडत होत्या. भाजपाला 40 जागांच्या विधानसभेत 14 जागा मिळाल्या होत्या. भाजपाने गोवा फॉरवर्ड पार्टी, महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीच्या साहाय्याने सत्ता स्थापन केली होती. कर्नाटकात राज्यपाल वजूभाई वाला अँग्लो इंडियन समुदायाच्या सदस्याची नेमणूक विधानसभेत करु शकतात, त्य़ामुळे भाजपाला एक सदस्याचे आणखी पाठबळ मिळेल म्हणून जेडीएस आणि काँग्रेस अॅंग्लो इंडियन सदस्याची नेमणूक रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागणार आहेत.

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Karnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८goaगोवाcongressकाँग्रेसBJPभाजपाSupreme Courtसर्वोच्च न्यायालयGovernmentसरकार