शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईनंतर आता बळीराजाची राजधानीत धडक; कर्जमाफीसाठी एल्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2018 15:57 IST

सरकार अश्वासने देत आहे, मात्र ते पूर्ण करण्यात ते अपयशी ठरत आहे.

नवी दिल्ली - सहा दिवस 180 किलोमीटर पायपीट करत काल मुंबईत धडकलेल्या शेतकरी, आदिवासींच्या अभूतपूर्व अशा लाल वादळापुढे नमते घेत राज्य सरकारने मोर्चेक-यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे आंदोलन शमले तोपर्यंत राजधानी दिल्लीमध्ये शेतकऱ्यंनी कर्जमाफीसाठी आंदोलन छेडले आहे. 

भारतीय किसान युनियनच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांनी महापंचात अंतर्गत कर्जमाफीसाठी एल्गार पुकारला आहे. सर्व शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्ज आहे. कर्जाला कंटाळून प्रत्येक दिवशी शेतकरी आत्महत्या करत आहे. त्यामुळं सरकारने स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी मान्य करुन शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी. नवी दिल्लीमध्ये आलेल्या काही शेतकऱ्यांनी सरकारला इशारा दिला की, जर सरकारने कर्जमाफी नाही केल्यास 2019 च्या निवडणूकीत त्याचे पडसाद दिसून येतील. 

 

भारतीय किसान युनियन यांच्या मतानुसार शेतकरी दररोज नवनव्या आडचणीमध्ये अडकत आहे. सरकार अश्वासने देत आहे, मात्र ते पुर्ण करण्यात ते अपयशी ठरत आहे. शेतकऱ्यांच्या सद्याच्या परिस्थितीवर सरकारने मौन बाळगले आहे. स्वामिनाथन आयोगामध्ये शेतकऱ्यांचे हितेचे निर्णय घेण्यात आले आहेत. मात्र यावर कोणतीही आमंलबजावणी केली जात नाही. शेतकऱ्यांच्या पिकाला योग्या भाव मिळत नाहीत.

भारतीय किसान युनियन यांनी वीज बिलासाठी शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या त्रासाचाही यावेली निशेध केला. शेतकरी म्हणाले की, जर शेतामध्ये पिकलेल्या मालाला किंमत मिळत नसेल तर शेतकरी विज बिल कसे भरणार...आज शेतातील मालाला दमडीची किंमत मिळत असल्यामुळं काही शेतकरी ते रस्त्यावर फेकून देतात...

गेल्या कित्येक दिवसांपासून देशांमध्ये शेतकऱ्यांचा उद्रेक उडत आहे. प्रत्येक राज्यात मोर्चे निघत आहेत. सरकारच्या धोरणावर नाराजी व्यक्त केली जात आहे. सरकरकडून मात्र अश्वासने दिली जातात त्यावर आंमलबजावणी कधी होणार माहित नाही. असे आंदोलनात आलेल्या एका शेतकऱ्यांनी सांगितले. 

टॅग्स :FarmerशेतकरीKisan Sabha Long Marchकिसान सभा लाँग मार्च