शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

मुंबईनंतर आता बळीराजाची राजधानीत धडक; कर्जमाफीसाठी एल्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2018 15:57 IST

सरकार अश्वासने देत आहे, मात्र ते पूर्ण करण्यात ते अपयशी ठरत आहे.

नवी दिल्ली - सहा दिवस 180 किलोमीटर पायपीट करत काल मुंबईत धडकलेल्या शेतकरी, आदिवासींच्या अभूतपूर्व अशा लाल वादळापुढे नमते घेत राज्य सरकारने मोर्चेक-यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे आंदोलन शमले तोपर्यंत राजधानी दिल्लीमध्ये शेतकऱ्यंनी कर्जमाफीसाठी आंदोलन छेडले आहे. 

भारतीय किसान युनियनच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांनी महापंचात अंतर्गत कर्जमाफीसाठी एल्गार पुकारला आहे. सर्व शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्ज आहे. कर्जाला कंटाळून प्रत्येक दिवशी शेतकरी आत्महत्या करत आहे. त्यामुळं सरकारने स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी मान्य करुन शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी. नवी दिल्लीमध्ये आलेल्या काही शेतकऱ्यांनी सरकारला इशारा दिला की, जर सरकारने कर्जमाफी नाही केल्यास 2019 च्या निवडणूकीत त्याचे पडसाद दिसून येतील. 

 

भारतीय किसान युनियन यांच्या मतानुसार शेतकरी दररोज नवनव्या आडचणीमध्ये अडकत आहे. सरकार अश्वासने देत आहे, मात्र ते पुर्ण करण्यात ते अपयशी ठरत आहे. शेतकऱ्यांच्या सद्याच्या परिस्थितीवर सरकारने मौन बाळगले आहे. स्वामिनाथन आयोगामध्ये शेतकऱ्यांचे हितेचे निर्णय घेण्यात आले आहेत. मात्र यावर कोणतीही आमंलबजावणी केली जात नाही. शेतकऱ्यांच्या पिकाला योग्या भाव मिळत नाहीत.

भारतीय किसान युनियन यांनी वीज बिलासाठी शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या त्रासाचाही यावेली निशेध केला. शेतकरी म्हणाले की, जर शेतामध्ये पिकलेल्या मालाला किंमत मिळत नसेल तर शेतकरी विज बिल कसे भरणार...आज शेतातील मालाला दमडीची किंमत मिळत असल्यामुळं काही शेतकरी ते रस्त्यावर फेकून देतात...

गेल्या कित्येक दिवसांपासून देशांमध्ये शेतकऱ्यांचा उद्रेक उडत आहे. प्रत्येक राज्यात मोर्चे निघत आहेत. सरकारच्या धोरणावर नाराजी व्यक्त केली जात आहे. सरकरकडून मात्र अश्वासने दिली जातात त्यावर आंमलबजावणी कधी होणार माहित नाही. असे आंदोलनात आलेल्या एका शेतकऱ्यांनी सांगितले. 

टॅग्स :FarmerशेतकरीKisan Sabha Long Marchकिसान सभा लाँग मार्च