शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
3
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
4
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
5
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
6
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
7
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
8
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
9
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
10
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
11
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
12
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
13
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
14
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
15
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
16
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
17
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
18
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
19
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
20
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला

इंडिया नव्हे,‘भारत’च?; विशेष अधिवेशनात विधेयक? राष्ट्रपतींचा उल्लेख ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 06:19 IST

संसदेच्या आगामी विशेष अधिवेशनात देशाचे नाव ‘भारत’ करण्यासाठी केंद्र सरकार विधेयक पारित करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

- संजय शर्मानवी दिल्ली : देशाचे नाव आता ‘इंडिया’ऐवजी ‘भारत’ करण्यासाठी केंद्रीय पातळीवर जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जी-२० देशांच्या राष्ट्राध्यक्षांसाठी आयोजित स्नेहभोजनाच्या निमंत्रण पत्रिकेवर मुर्मू यांचा उल्लेख ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असा करण्यात आला आहे. त्यावरून जोरदार राजकीय आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. दरम्यान, संसदेच्या आगामी विशेष अधिवेशनात देशाचे नाव ‘भारत’ करण्यासाठी केंद्र सरकार विधेयक पारित करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

किती देशांनी बदलले नाव? आतापर्यंत सिलोनचे श्रीलंका, बेचुयानालँडचे बोत्सवाना, एबिसिनियाचे इथिओपिया, ट्राजार्डेनचे जॉर्डन, बर्माचे म्यानमार, तुर्कीएचे तुर्की, हॉलंडचे नेदरलँड, फारसचे इराण व सियामचे थायलँड असे नामांतर झाले.

आरोप-प्रत्यारोप ‘भारत’ नावावर राजकीय वादही सुरू झाला आहे. विरोधी पक्ष काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, आप व राजदने यावर टीका केली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी ‘इंडिया’ आघाडीला घाबरूनच देशाच्या नावातून ‘इंडिया’ हटवण्यात येत असल्याचे म्हटले आहे. ‘इंडिया’ हे नाव विरोधकांच्या आघाडीला जोडले गेल्यामुळे नेत्यांवर किंवा आघाडीवर थेट हल्लाबोल करता येत नाही, ही बाब भाजप नेत्यांनीही स्वीकारली आहे. तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आघाडीला आपल्या भाषेत ‘घमंडिया आघाडी’ हे नाव दिले आहे.

मोहन भागवत यांच्या वक्तव्यानंतर चर्चेला जोर

संसदेचे विशेष अधिवेशन अचानक का बोलावले, याचा अजेंडा आता स्पष्ट होत आहे. ‘एक देश, एक निवडणूक’ या विषयावर चर्चा रंगली असतानाच आता देशाचे नाव बदलण्याची तयारी केली जात आहे. त्याचा प्रत्यय जी-२० च्या स्नेहभोजनाच्या निमंत्रण पत्रिकेवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा उल्लेख ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असा केला.  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी दोन दिवसांपूर्वी देशातील लोकांनी जगात कुठेही गेले, तरी स्वत:ला ‘इंडिया’ऐवजी ‘भारत’ देशाचा नागरिक म्हणण्यास सुरुवात करावी, असे म्हटले होते. त्याच अनुषंगाने विशेष अधिवेशनात प्रस्ताव सादर करण्याची तयारी केली जात आहे.

देशाच्या सन्मान आणि गौरवाशी निगडित प्रत्येक विषयावर काँग्रेस दरवेळी का आक्षेप घेते? भारत जोडो नावाने यात्रा करणाऱ्यांना ‘भारतमाता की जय’ उद्घोष करणाऱ्यांविरोधात इतका द्वेष का?     - जगत प्रकाश नड्डा, अध्यक्ष, भाजपइंडिया म्हणजेच भारत, हे संघराज्य आहे. एक देश, एक निवडणूक हा संघराज्य प्रणाली व त्याच्या सर्व राज्यांवर हल्ला आहे.    - राहुल गांधी, काँग्रेस नेते.‘इंडिया’ हा भारत आहे, त्यामुळे अचानक असे काय झाले की, देशाने फक्त भारतच म्हणायला हवे. आपण देशाला भारत म्हणतो, इंग्रजीत ‘इंडिया’. त्यात नवीन काही नाही. देशात इतिहासाचे पुनर्लेखन केले जात आहे.    - ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, प. बंगाल सध्या जनतेत ‘इंडिया’ला ज्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे सत्ताधाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे नाव काढण्याचा प्रयत्न केला जात असेल. मात्र, इंडिया हे नाव हटविण्याचा कोणालाही अधिकार नाही.     - शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपाcongressकाँग्रेस