शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

एक इंच जमीनही चीनने हडपलेली नाही, लडाखचे नायब राज्यपाल बी. डी. मिश्रा यांचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 11:59 IST

Ladakh : भारताची एकही इंच जमीन चीनने बळकाविलेली नाही, असे लडाखचे नायब राज्यपाल बी. डी. मिश्रा यांनी सांगितले. कुरापत काढणाऱ्याला भारतीय सैन्य चोख प्रत्युत्तर देईल, असा इशाराही मिश्रा यांनी सोमवारी दिला.

जम्मू - भारताची एकही इंच जमीन चीनने बळकाविलेली नाही, असे लडाखचे नायब राज्यपाल बी. डी. मिश्रा यांनी सांगितले. कुरापत काढणाऱ्याला भारतीय सैन्य चोख प्रत्युत्तर देईल, असा इशाराही मिश्रा यांनी सोमवारी दिला.

लडाखमध्येचीनने मोठा भूभाग बळकाविला आहे, असे विधान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले होते. त्याबद्दल बी. डी. मिश्रा म्हणाले, मी कोणाच्याही वक्तव्यावर प्रतिक्रिया देणार नाही. मात्र, भारताची एकही इंच जमीन कोणीही हडपलेली नाही हे वास्तव आहे. ती स्थिती स्वत: डोळ्याने पाहिली असल्याने त्याबद्दल मी खात्रीने सर्वांना सांगू शकतो. १९६२च्या युद्धामध्ये जे झाले तो स्वतंत्र इतिहास आहे. मात्र, सध्याची स्थिती लक्षात घेतली तर भारताच्या ताब्यात असलेला कोणताही भूभाग कोणीही बळकाविलेला नाही, असे त्यांनी सांगितले. मिश्रा हे निवृत्त ब्रिगेडिअर आहेत. तीन दिवसीय चर्चासत्रासाठी ते जम्मू येथे आले आहेत. (वृत्तसंस्था)

‘लष्करी उत्पादनांत स्वयंपूर्ण होण्यासाठी प्राधान्य’- लष्करी उत्पादन निर्मितीमध्ये स्वयंपूर्ण होण्याला देशाने प्राधान्य दिले आहे. भारत हा जागतिक नेता बनण्यासाठी ती पहिली पायरी आहे, असे नॉर्दन आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी सोमवारी सांगितले. - nजम्मू आयआयटीच्या वतीने आयोजित नॉर्थ टेक या परिषदेत ते बोलत होते. सीमा भागात ड्रोनच्या हालचालींना पायबंद घालण्यासाठी भारताने योग्य हालचाली केल्या आहेत, असेही द्विवेदी यांनी सांगितले. 

पर्यटनस्थळांच्या विकासाची मागणी- लडाखमधील पर्यटनस्थळांचा आणखी विकास तसेच इंटरनेट जाळ्याचा विस्तार करावा तसेच रेस्ट हाउस बांधण्यासाठी जमीन द्यावी, अशा मागण्या लडाखच्या सीमेवर असलेल्या गावांतील नागरिकांनी केल्या आहेत. - केंद्रीय गृह खात्यातील सीमा व्यवस्थापन विभागाचे सचिव अतुल दुल्लू यांनी नुकताच लडाखच्या सीमा भागातील चुशूलसहित काही गावांचा दौरा केला. त्यावेळी तेथील नागरिकांनी त्यांच्याकडे विविध मागण्या केल्या.

टॅग्स :ladakhलडाखIndiaभारतchinaचीन