शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
2
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
3
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
4
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
5
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
6
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
7
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
8
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
9
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
10
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
11
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
12
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
13
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
14
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
15
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
16
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
17
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
18
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
19
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
20
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर

'अल्पसंख्याकांच्या विरोधात नाही, पण कोणीही विशेष नागरिक...'; नरेंद्र मोदींनी दिलं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2024 14:14 IST

Lok Sabha Election : आपण अल्पसंख्याकांच्या विरोधात नाही असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाचे विधान केलं आहे.

PM Narendra Modi : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात हिंदू मुस्लिम हे मुद्दे मोठ्या प्रमाणावर गाजत आहेत. अल्पसंख्याक समाजाबाबत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी महत्त्वाचे विधान केलं आहे. मी अल्पसंख्याकांविरुद्ध एक शब्दही उच्चारला नाही आणि भारतीय जनता पक्ष आजच नाही तर कधीच अल्पसंख्याकांच्या विरोधात नव्हता, असे पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे. तसेच आपण कुणालाही विशेष नागरिक मानायला तयार नाही आहोत, असेही मोदींनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी काँग्रेसकडून होत असलेल्या आरोपांबाबतही भाष्य केलं.

रविवारी रात्री उशिरा पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत मोदींनी अल्पसंख्यांकांबद्दल भाष्य केलं. निवडणूक भाषणे जातीयदृष्ट्या फूट पाडणारी आणि ध्रुवीकरण करणारी नाहीत हे सर्वांनाच माहिती आहे, असे पंतप्रधान मोदींनी यावेळी म्हटलं. विरोधकांकडू होत असलेली टीका पाहून पंतप्रधान मोदींनी भाष्य केलं. काँग्रेसने संविधानाच्या धर्मनिरपेक्षतेचा अवमान केल्याचा आरोपही पंतप्रधानांनी केला.

निवडणूक प्रचारादरम्यानच्या माझ्या भाषणांचा उद्देश व्होटबँकेचे राजकारण तसेच विरोधी पक्षांचे अल्पसंख्याकांना खूश करण्याच्या प्रयत्नांचा पर्दाफाश करणे हा आहे, असेही मोदी म्हणाले. यावेळी अल्पसंख्याकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबद्दल मोदींना मुलाखतीदरम्यान विचारण्यात आले असता त्यांनी प्रतिक्रिया दिली. "मी अल्पसंख्याकांविरोधात एक शब्दही बोललो नाही. मी फक्त काँग्रेसच्या व्होट बँकेच्या राजकारणाविरुद्ध बोलतोय. काँग्रेस संविधानाच्या विरोधात काम करत आहे, मी हेच सांगत होतो," असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

"बाबासाहेब आंबेडकर आणि जवाहरलाल नेहरू यांच्यासह भारतीय राज्यघटनेच्या रचनाकारांनी धर्माच्या आधारावर आरक्षण नसल्याचा निर्णय घेतला होता. आता तुम्ही त्याच्यापासून दूर जात आहात. त्यांचा खुलासा करणे ही माझी जबाबदारी आहे. त्यावेळी माझ्या पक्षाचा एकही सदस्य संविधान सभेत नव्हता. ही देशभरातील उल्लेखनीय लोकांची सभा होती," असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

"त्यांचे राजकारण तुष्टीकरणाचे आहे आणि माझे राजकारण 'सबका साथ, सबका विकास'चे आहे. आमचा सर्व धर्माच्या समानतेवर विश्वास आहे. आम्हाला सर्वांना सोबत घेऊन जायचे आहे. आम्ही कुणालाही विशेष नागरिक म्हणून स्वीकारायला तयार नाही. पण आम्ही सर्वांना समान मानतो," असं पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केलं. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा