शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

2022मध्ये एकाही काश्मिरी पंडिताने घाटीतून पलायन केले नाही; गृह राज्‍यमंत्र्यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 21:05 IST

नित्यानंद राय यांनी सांगितल्यानुसार, काश्मीर खोऱ्यात सध्या 6,514 काश्मीरी पंडित राहतात.

नवी दिल्ली: अत्याचाराला कंटाळून काश्मीर खोऱ्यातून गेल्या अनेक वर्षांमध्ये हजारो-लाखो काश्मिरी पंडितांनी पलायन केले आहे. केंद्रात नरेंद्र मोदी सरकार आल्यापासून या काश्मिरी पंडितांना सुरक्षा पुरवल्याचा दावा केला जातो. याबाबत आज केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय (Nityanand Rai) यांनी राज्यसभेत महत्वाची माहिती दिली.

नित्यानंद राय यांनी सांगितले की, सरकारी नोंदीनुसार 2022 मध्ये एकाही काश्मिरी पंडिताने काश्मीर खोऱ्यातून पलायन केले नाही. खोऱ्यात सध्या 6,514 काश्मीरी पंडित राहतात. 2022 मध्ये एकाही काश्मिरी पंडिताने स्थलांतर केले नसल्याचा दावा सरकारने केला आहे. सरकारने आकडेवारीसह माहिती दिली आहे. केंद्र सरकारने काश्मिरी पंडितांचा जिल्हावार तपशीलही दिला आहे. कोणत्या जिल्ह्यात किती काश्मीर पंडित राहतात हे सांगण्यात आले आहे.

जिल्हावार तपशील20 जुलै 2022 पर्यंत अनंतनागमध्ये 808 काश्मिरी पंडित राहत असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच, कुलगाम जिल्ह्यात सर्वाधिक 2,639 काश्मिरी पंडित राहतात. पुलवामामध्ये 579, शोपियानमध्ये 320, श्रीनगरमध्ये 455, गंदरबलमध्ये 130, कुपवाडामध्ये 19, बांदीपोरामध्ये 66, बारामुल्लामध्ये 294 आणि बडगाममध्ये 1,204 काश्मिरी पंडित आहेत.

सरकारची विशेष योजनाविशेष म्हणजे काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकार आणि काश्मीर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान पॅकेज अंतर्गत राज्यातील सरकारी विभागांमध्ये नियुक्त केलेल्या काश्मिरी पंडितांना सुरक्षित जिल्ह्यात तैनात केले जात आहे. मनोज सिन्हा यांनी पीपल्स अलायन्स फॉर गुपकर डिक्लेरेशन (पीएजीडी) आणि भाजपच्या शिष्टमंडळाला कळवले होते की, खोऱ्यातील तहसील मुख्यालयावर नुकतेच झालेले दहशतवादी हल्ले पाहता, काश्मिरी पंडित कर्मचाऱ्यांची तैनाती सुरक्षित जिल्ह्यांमध्ये केली जाईल.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरRajya Sabhaराज्यसभाBJPभाजपाHome Ministryगृह मंत्रालय