शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

2022मध्ये एकाही काश्मिरी पंडिताने घाटीतून पलायन केले नाही; गृह राज्‍यमंत्र्यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 21:05 IST

नित्यानंद राय यांनी सांगितल्यानुसार, काश्मीर खोऱ्यात सध्या 6,514 काश्मीरी पंडित राहतात.

नवी दिल्ली: अत्याचाराला कंटाळून काश्मीर खोऱ्यातून गेल्या अनेक वर्षांमध्ये हजारो-लाखो काश्मिरी पंडितांनी पलायन केले आहे. केंद्रात नरेंद्र मोदी सरकार आल्यापासून या काश्मिरी पंडितांना सुरक्षा पुरवल्याचा दावा केला जातो. याबाबत आज केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय (Nityanand Rai) यांनी राज्यसभेत महत्वाची माहिती दिली.

नित्यानंद राय यांनी सांगितले की, सरकारी नोंदीनुसार 2022 मध्ये एकाही काश्मिरी पंडिताने काश्मीर खोऱ्यातून पलायन केले नाही. खोऱ्यात सध्या 6,514 काश्मीरी पंडित राहतात. 2022 मध्ये एकाही काश्मिरी पंडिताने स्थलांतर केले नसल्याचा दावा सरकारने केला आहे. सरकारने आकडेवारीसह माहिती दिली आहे. केंद्र सरकारने काश्मिरी पंडितांचा जिल्हावार तपशीलही दिला आहे. कोणत्या जिल्ह्यात किती काश्मीर पंडित राहतात हे सांगण्यात आले आहे.

जिल्हावार तपशील20 जुलै 2022 पर्यंत अनंतनागमध्ये 808 काश्मिरी पंडित राहत असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच, कुलगाम जिल्ह्यात सर्वाधिक 2,639 काश्मिरी पंडित राहतात. पुलवामामध्ये 579, शोपियानमध्ये 320, श्रीनगरमध्ये 455, गंदरबलमध्ये 130, कुपवाडामध्ये 19, बांदीपोरामध्ये 66, बारामुल्लामध्ये 294 आणि बडगाममध्ये 1,204 काश्मिरी पंडित आहेत.

सरकारची विशेष योजनाविशेष म्हणजे काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकार आणि काश्मीर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान पॅकेज अंतर्गत राज्यातील सरकारी विभागांमध्ये नियुक्त केलेल्या काश्मिरी पंडितांना सुरक्षित जिल्ह्यात तैनात केले जात आहे. मनोज सिन्हा यांनी पीपल्स अलायन्स फॉर गुपकर डिक्लेरेशन (पीएजीडी) आणि भाजपच्या शिष्टमंडळाला कळवले होते की, खोऱ्यातील तहसील मुख्यालयावर नुकतेच झालेले दहशतवादी हल्ले पाहता, काश्मिरी पंडित कर्मचाऱ्यांची तैनाती सुरक्षित जिल्ह्यांमध्ये केली जाईल.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरRajya Sabhaराज्यसभाBJPभाजपाHome Ministryगृह मंत्रालय