शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

दोन दशकांत जमिनीतील पाणी आटले, संकट वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 10:35 IST

धक्कादायक निष्कर्ष, दोन दशकांत ४५० घन किलोमीटरचा फटका

नवी दिल्ली: एका नवीनअभ्यासानुसार २००२ ते २०२१ दरम्यान उत्तर भारतात भूजल सुमारे ४५० घन किलोमीटरने घटले असून, हवामान बदलामुळे येत्या काही वर्षांत भूजल पातळी आणखी कमी होण्याची भीती एका अभ्यासात व्यक्त करण्यात आली आहे.

आयआयटी गांधीनगर येथील अभियांत्रिकी आणि भू-विज्ञान विभागाचे प्रमुख आणि विक्रम साराभाई केंद्राचे प्राध्यापक, संशोधक विमल मिश्रा यांनी सांगितले की, भूजल संसाधनांवर दबाव आणखी वाढेल, असे अभ्यासात असे दिसून आहे.

भूजलाचे फेरभरण होण्यासाठी आम्हाला पाऊस कमी तीव्रतेचा, परंतु अधिक दिवस पडण्याची गरज आहे, सिंचनासाठी पाण्याची वाढती मागणी आणि भविष्यात भूजल फेरभरण कमी झाल्याच्या एकत्रित परिणामामुळे आधीच वेगाने कमी होत असलेल्या संसाधनावर अधिक ताण येऊ शकतो - विमल मिश्रा, संशोधक, आयआयटी गांधीनगर

पाऊस घटला, हिवाळा उबदार

उपग्रह डेटा आणि अभ्यासावरून संशोधकांना आढळले की संपूर्ण उत्तर भारतात मान्सून (जून ते सप्टेंबर) पर्जन्यमान १९५१-२०२१ दरम्यान ८.५ टक्के कमी झाले आहे. तसेच, याच काळात देशातील हिवाळा ऋतू ०.३ अंश सेल्सिअस अधिक उष्ण झाला आहे.

कोरड्या मान्सूनमुळे पावसाच्या कमतरतेच्या कालावधीत पिके टिकवून ठेवण्यासाठी भूजलावर अधिक अवलंबून राहावे लागते. पावसाळ्यात तर उबदार हिवाळ्यामुळे भूजल फेरभरणात सुमारे ६ ते १२ टक्क्यांनी मोठी घट होईल, असा अंदाज आहे. हे संशोधन 'अर्ब्स फ्यूचर' या नियतकालिकात प्रकाशित झाले आहे.

असा येतो भूजलावर दबाव

हैदराबादस्थित राष्ट्रीय भूभौतिक संशोधन संस्थेच्या (एनजीआरआय) संशोधकांच्या चमूने अभ्यासात म्हटले आहे की, पावसाळ्यात कमी पाऊस आणि उबदार हिवाळ्यामुळे सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढेल आणि भूजल फेरभरण कमी होईल. याम यामुळे उत्तर भारतातील आधीच कमी होत असलेल्या भूजल संपत्तीवर आणखी दबाव येईल.

टॅग्स :water shortageपाणीकपातRainपाऊसmonsoonमोसमी पाऊस