शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

दोन दशकांत जमिनीतील पाणी आटले, संकट वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 10:35 IST

धक्कादायक निष्कर्ष, दोन दशकांत ४५० घन किलोमीटरचा फटका

नवी दिल्ली: एका नवीनअभ्यासानुसार २००२ ते २०२१ दरम्यान उत्तर भारतात भूजल सुमारे ४५० घन किलोमीटरने घटले असून, हवामान बदलामुळे येत्या काही वर्षांत भूजल पातळी आणखी कमी होण्याची भीती एका अभ्यासात व्यक्त करण्यात आली आहे.

आयआयटी गांधीनगर येथील अभियांत्रिकी आणि भू-विज्ञान विभागाचे प्रमुख आणि विक्रम साराभाई केंद्राचे प्राध्यापक, संशोधक विमल मिश्रा यांनी सांगितले की, भूजल संसाधनांवर दबाव आणखी वाढेल, असे अभ्यासात असे दिसून आहे.

भूजलाचे फेरभरण होण्यासाठी आम्हाला पाऊस कमी तीव्रतेचा, परंतु अधिक दिवस पडण्याची गरज आहे, सिंचनासाठी पाण्याची वाढती मागणी आणि भविष्यात भूजल फेरभरण कमी झाल्याच्या एकत्रित परिणामामुळे आधीच वेगाने कमी होत असलेल्या संसाधनावर अधिक ताण येऊ शकतो - विमल मिश्रा, संशोधक, आयआयटी गांधीनगर

पाऊस घटला, हिवाळा उबदार

उपग्रह डेटा आणि अभ्यासावरून संशोधकांना आढळले की संपूर्ण उत्तर भारतात मान्सून (जून ते सप्टेंबर) पर्जन्यमान १९५१-२०२१ दरम्यान ८.५ टक्के कमी झाले आहे. तसेच, याच काळात देशातील हिवाळा ऋतू ०.३ अंश सेल्सिअस अधिक उष्ण झाला आहे.

कोरड्या मान्सूनमुळे पावसाच्या कमतरतेच्या कालावधीत पिके टिकवून ठेवण्यासाठी भूजलावर अधिक अवलंबून राहावे लागते. पावसाळ्यात तर उबदार हिवाळ्यामुळे भूजल फेरभरणात सुमारे ६ ते १२ टक्क्यांनी मोठी घट होईल, असा अंदाज आहे. हे संशोधन 'अर्ब्स फ्यूचर' या नियतकालिकात प्रकाशित झाले आहे.

असा येतो भूजलावर दबाव

हैदराबादस्थित राष्ट्रीय भूभौतिक संशोधन संस्थेच्या (एनजीआरआय) संशोधकांच्या चमूने अभ्यासात म्हटले आहे की, पावसाळ्यात कमी पाऊस आणि उबदार हिवाळ्यामुळे सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढेल आणि भूजल फेरभरण कमी होईल. याम यामुळे उत्तर भारतातील आधीच कमी होत असलेल्या भूजल संपत्तीवर आणखी दबाव येईल.

टॅग्स :water shortageपाणीकपातRainपाऊसmonsoonमोसमी पाऊस