शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
3
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
4
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
5
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
6
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
7
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
8
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
9
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
10
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
11
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
12
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
13
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
14
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
15
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
16
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
17
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
18
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
19
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
20
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा

नोटाबंदी ही चूक नव्हे, तर जनता व छोट्या व्यावसायिकांवर आक्रमण होतं- राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 6:54 PM

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

नवी दिल्ली- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. राफेल करार आणि नोटाबंदीवरून राहुल यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. नोटाबंदी ही चूक नव्हती, तर जनता आणि छोट्या व्यावसायिकांवर आक्रमणं होते, असं राहुल गांधी म्हणाले आहेत. देशातल्या 15 मोठ्या उद्योजकांच्या भल्यासाठीच मोदी सरकारनं नोटाबंदी केली. नोटाबंदीमुळे देशाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.भ्रष्टाचा-यांचा काळा पैसा पांढरा करण्यासाठीच नोटाबंदी केल्याचा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला. नोटाबंदीच्या माध्यमातून सरकारनं जनतेवर आक्रमण केले. नोटाबंदीमुळे छोट्या व्यापा-यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, असंही राहुल गांधी म्हणाले आहेत.भाजपा अध्यक्ष अमित शहा संचालक असलेल्या गुजरातमधल्या बँकेत 700 कोटींचा घोटाळा समोर आला होता. या घोटाळ्यात 700 कोटी रुपये काळ्याचे पांढरे करण्यात आले. जनतेच्या खिशातील पैसा उद्योजकांच्या गल्ल्यात जमा करण्याचे काम मोदी सरकारनं केले. जनतेची लुबाडणूक करण्याचं काम मोदींनी केलं आहे.नोटाबंदीच्या निर्णयातून काहीही निष्पन्न झालेलं नाही. नोटाबंदी हा जुमला नव्हे, तर एक मोठा भ्रष्टाचार ठरला आहे, असा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला आहे. प्रत्येकाच्या बँक खात्यात 15 लाख रुपये जमा होतील, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळेल, बेरोजगारी संपवण्याचं मोदींनी दिलेलं आश्वासनं हवेत विरली आहेत, असंही राहुल गांधी म्हणाले आहेत. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीRafale Dealराफेल डील