शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

भारतात रामनामाशिवाय होऊ शकत नाही कोणतंही काम- योगी आदित्यनाथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2017 13:14 IST

उत्तर प्रदेशमधल्या महापालिका निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा एकदा राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला आहे.

लखनऊ - उत्तर प्रदेशात सध्या महापालिका निवडणुकांची रंगत पाहायला मिळतेय. उत्तर प्रदेशमधल्या महापालिका निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा एकदा राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला आहे. भारतात रामाशिवाय कोणतंही काम होऊ पूर्ण होऊ शकत नाही, असं योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत.पालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपाकडून खुद्द मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रचारात सक्रिय झाले आहेत. भगवान रामाचं नाव घेतल्याशिवाय कोणतंही काम पूर्ण होणार नाही. प्रभू राम हे आमची आस्था आणि श्रद्धेचं प्रतीक आहे. देशाच्या पूर्ण आस्थेचं केंद्रबिंदू भगवान राम असल्याचंही योगी आदित्यनाथांनी यावेळी आवर्जून सांगितलं आहे.उत्तर प्रदेश पालिका निवडणूक म्हणजे ही आमच्यासाठी एक प्रकारची परीक्षा आहे. आजपर्यंत केलेल्या कामाची पोचपावती म्हणून आम्ही पालिका निवडणुकीतील निकालाकडे पाहतो, असंही योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे 12 दिवसांत 33 सभा घेणार आहेत.आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेचे संस्थापक श्री श्री रविशंकरही 16 नोव्हेंबर रोजी अयोध्येचा दौरा करणार आहेत. ते राम जन्मभूमीच्या वादावर शांतीपूर्णरीत्या तोडगा काढण्यासाठी इतर पक्षकारांची भेट घेणार आहेत. परंतु श्री श्री रविशंकर हे मध्यस्थी करत असल्याच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी त्यांच्यावर टीकाही केली आहे. टीकाकारांची तोंडं मी बंद करू शकत नाही. राम मंदिराचा हा मुद्दा चर्चेनेच सुटू शकतो आणि त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे, असंही श्री श्री रविशंकर म्हणाले आहेत. श्री श्री रविशंकर हे अयोध्या दौ-याच्या वेळी लखनऊमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही भेट घेणार आहेत, अशी माहिती त्यांचे प्रतिनिधी भव्य तेज यांनी दिली आहे. श्री श्री रविशंकर 16 नोव्हेंबर रोजी अयोध्येत जाणार आहेत. राम मंदिर वादातील हिंदू आणि मुस्लिम पक्षकारांनाही श्री श्री रविशंकर यांच्या दौ-याची पूर्वकल्पना देण्यात आली आहे. 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशRam Mandirराम मंदिर