शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
3
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
4
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
5
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
6
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
7
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
8
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
9
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
10
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
11
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
12
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
13
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
14
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
15
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
16
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
17
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
18
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
19
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
20
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा

देशात परदेशी विद्यार्थ्यांच्या माहितीची अचूक नोंद ठेवणारी नाही यंत्रणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2020 20:32 IST

देशात नेमके किती परदेशी विद्यार्थी कोणत्या अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेत आहेत, याची अचूक माहिती उपलब्ध नाही..

ठळक मुद्दे केंद्र सरकारकडून ही माहिती संकलित करणारी यंत्रणा तयार करण्याचे काम सुरू देशामध्ये सध्या सुमारे ४७ हजार विद्यार्थी विविध अभ्यासक्रमांमध्ये घेत आहेत शिक्षण

पुणे : पुण्यासह देशभरातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांच्या माहितीची अचुक नोंद ठेवणारी मध्यवर्ती यंत्रणाच सरकारकडे नाही. त्यामुळे देशात नेमके किती परदेशी विद्यार्थी कोणत्या अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेत आहेत, याची अचूक माहिती उपलब्ध नाही. केंद्र सरकारकडून ही माहिती संकलित करणारी यंत्रणा तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती भारतीय सांस्कृतिक स्वातंत्र्यासंबंधी परिषदेच्या उप महामहासंचालक नम्रता कुमार यांनी दिली.

पुण्यात दि. २८ व २९ जानेवारी रोजी आयोजित ‘डेस्टिनेशन इंडिया’ या राष्ट्रीय परिषदेच्या अनुषंगाने त्या पत्रकारांशी बोलत होत्या. देशामध्ये सध्या सुमारे ४७ हजार विद्यार्थी विविध अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेत आहेत. पण हा आकडा अचुक नाही. सध्या परदेशी विद्यार्थी देशात आल्यानंतर गृह मंत्रालयाकडे त्याची नोंद होते. त्यानंतर संबंधित विद्यार्थ्याने शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतल्यानंतर ही माहिती विद्यापीठ अनुदान आयोगासह संबंधित नियामक संस्थेकडे संकलित जाते. पण अनेकदा काही विद्यार्थी अल्पमुदतीचे अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतात. त्याची नोंद होत नाही. त्यामुळे युजीसी, असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजसह अन्य नियामक संस्था आणि गृह मंत्रालयाकडील विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये खुप अंतर असते. हा आकडा नेमका किती हे सध्या सांगणे कठीण असल्याचे सुत्रांनी सांगितले.

याविषयी बोलताना नम्रता कुमार म्हणाल्या, ‘देशात नेमके परदेशी विद्यार्थी किती आहेत, याची माहिती ठेवणारी मध्यवर्ती यंत्रणा नाही. परदेशी विद्यार्थी पारंपरिक अभ्यासक्रमांसह व्यावसायिक व अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतात. वैद्यकीय अभ्यासक्रमांसह अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांची माहिती एकत्रित होत नाही. त्यामुळे कोणत्या अभ्यासक्रमात किती विद्यार्थी शिकतात हे समजत नाही. ही यंत्रणा विकसित करण्याचे काम सध्या सुरू आहे.

   परिषदेमध्ये या मुद्यावरही चर्चा होणार आहे.’ संख्या होतेय कमी दरम्यान, परदेशी विद्यार्थ्यांची संख्या काही प्रमाणात कमी होत असली तरी त्यामागे विविध कारणे आहेत. त्यादृष्टीने त्यांच्या अडचणी सोडविणे, आपल्या संस्कृतीशी त्यांना जोडणे, आकर्षण वाढविणे यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी सांगितले.

परदेशी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा बदलत असून संशोधनासाठी येथील संस्थांना प्राधान्य मिळत आहे. त्यासाठी आवश्यक दर्जेदार सुविधा, शिक्षकही आपल्याकडे उपलब्ध असल्याचे सिम्बायोसिस विद्यापीठाच्या प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर यांनी नमुद केले.-------------------------

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालयCentral Governmentकेंद्र सरकार