शहरं
Join us  
Trending Stories
1
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
2
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
3
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
4
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
5
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
6
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
7
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
8
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
9
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
10
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
11
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
12
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
13
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
14
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
15
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
16
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
17
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
18
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
19
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
20
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा

देशात परदेशी विद्यार्थ्यांच्या माहितीची अचूक नोंद ठेवणारी नाही यंत्रणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2020 20:32 IST

देशात नेमके किती परदेशी विद्यार्थी कोणत्या अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेत आहेत, याची अचूक माहिती उपलब्ध नाही..

ठळक मुद्दे केंद्र सरकारकडून ही माहिती संकलित करणारी यंत्रणा तयार करण्याचे काम सुरू देशामध्ये सध्या सुमारे ४७ हजार विद्यार्थी विविध अभ्यासक्रमांमध्ये घेत आहेत शिक्षण

पुणे : पुण्यासह देशभरातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांच्या माहितीची अचुक नोंद ठेवणारी मध्यवर्ती यंत्रणाच सरकारकडे नाही. त्यामुळे देशात नेमके किती परदेशी विद्यार्थी कोणत्या अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेत आहेत, याची अचूक माहिती उपलब्ध नाही. केंद्र सरकारकडून ही माहिती संकलित करणारी यंत्रणा तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती भारतीय सांस्कृतिक स्वातंत्र्यासंबंधी परिषदेच्या उप महामहासंचालक नम्रता कुमार यांनी दिली.

पुण्यात दि. २८ व २९ जानेवारी रोजी आयोजित ‘डेस्टिनेशन इंडिया’ या राष्ट्रीय परिषदेच्या अनुषंगाने त्या पत्रकारांशी बोलत होत्या. देशामध्ये सध्या सुमारे ४७ हजार विद्यार्थी विविध अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेत आहेत. पण हा आकडा अचुक नाही. सध्या परदेशी विद्यार्थी देशात आल्यानंतर गृह मंत्रालयाकडे त्याची नोंद होते. त्यानंतर संबंधित विद्यार्थ्याने शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतल्यानंतर ही माहिती विद्यापीठ अनुदान आयोगासह संबंधित नियामक संस्थेकडे संकलित जाते. पण अनेकदा काही विद्यार्थी अल्पमुदतीचे अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतात. त्याची नोंद होत नाही. त्यामुळे युजीसी, असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजसह अन्य नियामक संस्था आणि गृह मंत्रालयाकडील विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये खुप अंतर असते. हा आकडा नेमका किती हे सध्या सांगणे कठीण असल्याचे सुत्रांनी सांगितले.

याविषयी बोलताना नम्रता कुमार म्हणाल्या, ‘देशात नेमके परदेशी विद्यार्थी किती आहेत, याची माहिती ठेवणारी मध्यवर्ती यंत्रणा नाही. परदेशी विद्यार्थी पारंपरिक अभ्यासक्रमांसह व्यावसायिक व अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतात. वैद्यकीय अभ्यासक्रमांसह अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांची माहिती एकत्रित होत नाही. त्यामुळे कोणत्या अभ्यासक्रमात किती विद्यार्थी शिकतात हे समजत नाही. ही यंत्रणा विकसित करण्याचे काम सध्या सुरू आहे.

   परिषदेमध्ये या मुद्यावरही चर्चा होणार आहे.’ संख्या होतेय कमी दरम्यान, परदेशी विद्यार्थ्यांची संख्या काही प्रमाणात कमी होत असली तरी त्यामागे विविध कारणे आहेत. त्यादृष्टीने त्यांच्या अडचणी सोडविणे, आपल्या संस्कृतीशी त्यांना जोडणे, आकर्षण वाढविणे यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी सांगितले.

परदेशी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा बदलत असून संशोधनासाठी येथील संस्थांना प्राधान्य मिळत आहे. त्यासाठी आवश्यक दर्जेदार सुविधा, शिक्षकही आपल्याकडे उपलब्ध असल्याचे सिम्बायोसिस विद्यापीठाच्या प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर यांनी नमुद केले.-------------------------

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालयCentral Governmentकेंद्र सरकार