शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

यूपीएच्या काळात सहा सर्जिकल स्ट्राइक झाले? लष्कर म्हणतं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 08:49 IST

काँग्रेस, भाजपाचे सर्जिकल स्ट्राइकवरुन दावे-प्रतिदावे

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत सर्जिकल स्ट्राइक आणि एअर स्ट्राइकवरुन काँग्रेस आणि भाजपामध्ये चांगलीच जुंपली आहे. सर्जिकल स्ट्राइक, एअर स्ट्राइक करुन दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून केला जात आहे. यानंतर काँग्रेसनंदेखील यूपीए सरकारच्या काळात सहा सर्जिकल स्ट्राइक झाल्याचा दावा केला. भाजपा, काँग्रेस सर्जिकल स्ट्राइकवरुन एकमेकांवर 'स्ट्राइक' करत असताना प्रथमच लष्करानं यावर भाष्य केलं आहे. लष्करानं सर्जिकल स्ट्राइकबद्दलच्या आरटीआयला उत्तर दिलं आहे.  यूपीए सरकारच्या काळात पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राइकची माहिती उपलब्ध नसल्याचं लष्करानं आरटीआयला दिलेल्या उत्तरात म्हटलं आहे. लष्कराच्या डीजीएमओ (डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन्स) यांनी ही माहिती दिली आहे. यासाठी जम्मू-काश्मीरमधले आरटीआय कार्यकर्ते रोहित चौधरींनी अर्ज केला होता. 2004 ते 2014 या कालावधीत भारतीय लष्करानं पाकिस्तानमध्ये घुसून किती सर्जिकल स्ट्राइक केले आणि त्यातले किती यशस्वी झाले, असे प्रश्न चौधरींनी त्यांच्या अर्जात विचारले होते. 29 सप्टेंबर 2016 च्या आधी सर्जिकल स्ट्राइक झाल्याची कोणतीही माहिती उपलब्ध नाही, असं उत्तर डीजीएमओंनी या आरटीआयला दिलं.पंतप्रधान मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये अनेकदा सर्जिकल आणि एअर स्ट्राइकचा उल्लेख केला आहे. काँग्रेसच्या काळात दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिलं जात नव्हतं, असंदेखील मोदींनी अनेकदा म्हटलं आहे. तर गेल्याच आठवड्यात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी यूपीए सरकारच्या काळातही सर्जिकल स्ट्राइक झाल्याचा दावा केला. आम्ही सर्जिकल स्ट्राइक केले. मात्र कधीही त्याचा वापर मतं मिळवण्यासाठी केला नाही, असं सिंग एका मुलाखतीत म्हणाले.मनमोहन सिंग यांच्या दाव्यानंतर काँग्रेसनं एक पत्रकार परिषद घेतली. त्यात पक्षाचे प्रवक्ते राजीव शुक्ला यांनी यूपीए सरकारच्या काळात सहा सर्जिकल स्ट्राइक झाल्याचा दावा केला. शुक्ला यांनी पत्रकारांना संबोधित करताना सर्जिकल स्ट्राइक नेमके कुठे आणि कधी करण्यात आली, याची तपशीलवार माहिती दिली. पूंछमधील भट्टल सेक्टर (19 जून 2018), केलमधील शारदा सेक्टर (30 ऑगस्ट-1 सप्टेंबर 2011), सावन पात्रा चेकपोस्ट (6 जानेवारी 2013), नाझपीर सेक्टर (27-28 जुलै 2013), नीलम व्हॅली (6 ऑगस्ट 2013) आणि 23 डिसेंबर 2013 रोजी सर्जिकल स्ट्राइक करण्यात आल्याचं शुक्ला म्हणाले. यूपीए सरकारच्या काळातही सर्जिकल स्ट्राइक झाले. मात्र त्याचा राजकीय फायद्यासाठी वापर केला नाही, अशा शब्दांत शुक्ला यांनी मोदींना टोला लगावला.   

टॅग्स :surgical strikeसर्जिकल स्ट्राइकIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसManmohan Singhमनमोहन सिंगLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPakistanपाकिस्तान