लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार रणकंदण बघायला मिळाले. भारत-अमेरिका व्यापार कराराच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर थेट हल्ला चढवत गंभीर आरोप केले. हा करार म्हणजे संपूर्ण शरणागती असल्याची टीका त्यांनी सरकारवर केली.
यावेळी राहुल गांधी यांनी दावा केला की, "भारत-अमेरिका व्यापार करार हा समान अटींवर झालेला नाही. या करारात भारतीय शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यात आले नाही. यापूर्वी असा निर्णय कोणत्याही पंतप्रधानाने घेतला नाही, ना भविष्यातही कोणी घेईल. सरकारला लाज वाटायला हवी की, त्यांनी भारत मातेची विक्री केली." यावर केंद्रीय संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू यांनी पलटवार केला.
"...'मायचा लाल' जन्माला आलेला नाही" -किरेन रिजिजूं म्हणाले, "अद्याप देशाला विकणारा अथवा खरेदी करणारा कोणी 'मायचा लाल' जन्माला आलेला नाही. नरेंद्र मोदी हे आतापर्यंतचे सर्वात कणखर पंतप्रधान आहेत. कोणत्याही पुराव्याशिवाय बिनबुडाचे आरोप करणे हे लोकशाहीत स्वीकारार्ह नसल्याचेही रिजिजू यांनी यावेळी स्पष्ट केले.
"विरोधी पक्ष नेत्यांनी त्यांचे सर्व मुद्दे सिद्ध करावेत" -रिजिजू पुढे म्हणाले, "अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात जाऊन तुम्ही जे काही आरोप केले आहेत, तुम्ही विरोधी पक्षनेते आहात. जेव्हा तुम्ही काही बोलता, तेव्हा त्यांचे गंभीर अर्थ निघत असतात. विरोधी पक्ष नेत्यांनी त्यांचे सर्व मुद्दे सिद्ध करावेत, असा मी आग्रह करतो." राहुल गांधींचे भाषण संपल्यानंतर रिजिजू यांनी काँग्रेसवर देशाला कमकुवत करण्याचा आरोप केला. "भारत प्रगती पाहून, काँग्रेस दुःख होत आहे," अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
Web Summary : Rahul Gandhi accused the government of surrendering to the US in a trade deal. Rijiju retorted, asserting no one can sell India and Modi is a strong PM. He challenged the opposition to prove their allegations.
Web Summary : राहुल गांधी ने भारत-अमेरिका व्यापार समझौते पर सरकार पर हमला बोला। रिजिजू ने पलटवार करते हुए कहा कि कोई भी भारत को बेच नहीं सकता और मोदी एक मजबूत पीएम हैं। उन्होंने विपक्ष को आरोप साबित करने की चुनौती दी।