शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
5
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
6
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
7
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
8
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
9
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
10
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
11
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
12
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
13
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
14
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
15
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
16
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
17
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
18
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
19
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
20
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत

देशात १६ मेनंतर एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळणार नाही; वैद्यकीय व्यवस्थापन समितीच्या प्रमुखांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 09:56 IST

कोरोनाचा धोका कमी करण्यासाठी सरकारकडून विविध प्रयत्न करण्यात येत आहे.

नवी दिल्ली: जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. आतापर्यत  29 लाखहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली असून 2 लाख 6 हजारांपेक्षा जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा २७ हजारांच्या घरात गेला आहे.

कोरोनाचा धोका कमी करण्यासाठी सरकारकडून विविध प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्ण दुप्पट होण्याचा वेग देखील मंदावला असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे. तसेच रुग्णसंख्या दुप्पट होण्याचे प्रमाण कमी झाले असून, ते आता दहा दिवसांवर गेले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत भारतातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये रोज लक्षणीय वाढ होत असली, तरी १६ मेनंतर देशात एकही नवीन कोरोनाचा रुग्ण आढळणार नाही, असा दावा नीती आयोगाचे सदस्य आणि सरकारच्या वैद्यकीय व्यवस्थापन समितीचे प्रमुख व्ही. के. पॉल यांनी केला आहे. त्यामुळे या दाव्यानंतर भारतीयांना थोडा दिलासा मिळाला आहे.

किम जोंग उन जिवंत; दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या सल्लागारांचा मोठा खुलासा

राष्ट्रीय साथरोगशास्त्र संस्थेच्या संशोधकांसह जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) काही प्रतिनिधींनी मांडलेल्या अभ्यासाद्वारे हा निष्कर्ष काढण्यात आला आहे, अशी माहिती व्ही. के. पॉल यांनी दिली. 'गुजरात, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र यासारख्या करोनाचे 'हॉटस्पॉट' ठरलेल्या राज्यांमधील रुग्णसंख्या जोपर्यंत कमी होत नाही, तोपर्यंत राष्ट्रीय सरासरी कमी होणार नाही. तीन मेपासून रुग्णसंख्येत प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ होईल. कदाचित दीड हजार रुग्ण रोज वाढतील. १२ मे रोजी ही संख्या एक हजारपर्यंत खाली येईल आणि १६ मेनंतर एकही नवा रुग्ण आढळणार नाही, असा दावाही करण्यात आला आहे. 

देशभरात करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या पोहोचली २७,८९२ वर. तर आतापर्यंत एकूण ६१८५ रुग्ण बरे झाले असून ८७२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात १३९६ रुग्ण आढळले असून ४८ रुग्णांचा मृत्यूही झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतWorld health organisationजागतिक आरोग्य संघटनाHealthआरोग्य