शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

भारत-चीन सीमावादावर अद्याप कोणताही ठोस तोडगा नाही : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2020 10:20 IST

लडाख येथील भारत आणि चीन सीमेवरील परिस्थिती जैसे थे आहे. भारत-चीन सीमाप्रश्न निकाली निघाला असता, तर आजची परिस्थिती उद्भवली नसती, असे राजनाथ सिंह म्हणाले. 

ठळक मुद्देभारत-चीन सीमावादावर अद्याप तोडगा नाहीप्रदीर्घ काळापासून सुरू असलेला सीमावाद निकाली लागायला हवा होतासैन्यस्तरीय चर्चा सुरू असल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांकडून स्पष्ट

नवी दिल्ली :भारत-चीन सीमावादावर अद्याप कोणताही ठोस तोडगा निघाला नाही, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले आहे. भारत-चीन सीमावादासंदर्भात आज (बुधवारी) संरक्षणमंत्र्यांनी महत्त्वाची माहिती दिली. त्यावेळी ते बोलत होते. 

लडाख येथील भारत आणि चीन सीमेवरील परिस्थिती जैसे थे आहे. सीमावादासंदर्भात दोन्ही देश अद्याप कोणत्याही ठोस निष्कर्षावर पोहोचलेले नाहीत. असे असले तरी सैन्यस्तरीय चर्चा सुरू असून, लवकरच आणखी एक बैठक होणार आहे, असे राजनाथ सिंह म्हणाले. 

भारत-चीन सीमाप्रश्न प्रदीर्घ काळापासून वादात आहे. यावर तोडगा निघायला हवा. चीनसोबत चर्चा सुरू आहे. आतापर्यंत पार पडलेल्या चर्चांमधून काहीच तोडगा निघालेला नाही. भारत-चीन सीमेवरील परिस्थिती आहे, तशी कायम आहे, असेही त्यांनी सांगितले. कोणताही देश विस्तारवादी धोरणाचा अवलंब करत असेल, तर भारतात घुसखोरी करण्यापासून त्या देशाला थांबवण्याचे सामर्थ्य आणि क्षमता आपल्याकडे आहे, असे राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले. 

भारत-चीन सीमाप्रश्न निकाली निघाला असता, तर आजची परिस्थिती उद्भवली नसती. चीन सीमा भागात त्यांच्याबाजूने नियमितपणे पायाभूत सुविधा तयार करत आहे. मात्र, भारत सैन्य आणि नागरिकांसाठी काम करत आहे. कोणावरही आक्रमण करण्यासाठी नाही, तर देशवासीयांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भारताकडून अनेक कामे केली जात असल्याचे त्यांनी नमूद केले. 

दरम्यान, एप्रिल २०२० पासून लडाख येथील सीमेवरून भारत आणि चीन यांच्यात तणावाची स्थिती आहे. दोन्ही देशांकडून मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात करण्यात आले आहे. आतापर्यंत अनेकदा दोन्ही देशांच्या सैन्यस्तरावर चर्चांच्या अनेक फेऱ्या झाल्या आहे. परंतु, सीमावादावर कोणताही तोडगा निघालेला नाही. 

 

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावladakhलडाखRajnath Singhराजनाथ सिंहborder disputeसीमा वादIndiaभारतchinaचीन