शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

भारत-चीन सीमावादावर अद्याप कोणताही ठोस तोडगा नाही : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2020 10:20 IST

लडाख येथील भारत आणि चीन सीमेवरील परिस्थिती जैसे थे आहे. भारत-चीन सीमाप्रश्न निकाली निघाला असता, तर आजची परिस्थिती उद्भवली नसती, असे राजनाथ सिंह म्हणाले. 

ठळक मुद्देभारत-चीन सीमावादावर अद्याप तोडगा नाहीप्रदीर्घ काळापासून सुरू असलेला सीमावाद निकाली लागायला हवा होतासैन्यस्तरीय चर्चा सुरू असल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांकडून स्पष्ट

नवी दिल्ली :भारत-चीन सीमावादावर अद्याप कोणताही ठोस तोडगा निघाला नाही, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले आहे. भारत-चीन सीमावादासंदर्भात आज (बुधवारी) संरक्षणमंत्र्यांनी महत्त्वाची माहिती दिली. त्यावेळी ते बोलत होते. 

लडाख येथील भारत आणि चीन सीमेवरील परिस्थिती जैसे थे आहे. सीमावादासंदर्भात दोन्ही देश अद्याप कोणत्याही ठोस निष्कर्षावर पोहोचलेले नाहीत. असे असले तरी सैन्यस्तरीय चर्चा सुरू असून, लवकरच आणखी एक बैठक होणार आहे, असे राजनाथ सिंह म्हणाले. 

भारत-चीन सीमाप्रश्न प्रदीर्घ काळापासून वादात आहे. यावर तोडगा निघायला हवा. चीनसोबत चर्चा सुरू आहे. आतापर्यंत पार पडलेल्या चर्चांमधून काहीच तोडगा निघालेला नाही. भारत-चीन सीमेवरील परिस्थिती आहे, तशी कायम आहे, असेही त्यांनी सांगितले. कोणताही देश विस्तारवादी धोरणाचा अवलंब करत असेल, तर भारतात घुसखोरी करण्यापासून त्या देशाला थांबवण्याचे सामर्थ्य आणि क्षमता आपल्याकडे आहे, असे राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले. 

भारत-चीन सीमाप्रश्न निकाली निघाला असता, तर आजची परिस्थिती उद्भवली नसती. चीन सीमा भागात त्यांच्याबाजूने नियमितपणे पायाभूत सुविधा तयार करत आहे. मात्र, भारत सैन्य आणि नागरिकांसाठी काम करत आहे. कोणावरही आक्रमण करण्यासाठी नाही, तर देशवासीयांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भारताकडून अनेक कामे केली जात असल्याचे त्यांनी नमूद केले. 

दरम्यान, एप्रिल २०२० पासून लडाख येथील सीमेवरून भारत आणि चीन यांच्यात तणावाची स्थिती आहे. दोन्ही देशांकडून मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात करण्यात आले आहे. आतापर्यंत अनेकदा दोन्ही देशांच्या सैन्यस्तरावर चर्चांच्या अनेक फेऱ्या झाल्या आहे. परंतु, सीमावादावर कोणताही तोडगा निघालेला नाही. 

 

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावladakhलडाखRajnath Singhराजनाथ सिंहborder disputeसीमा वादIndiaभारतchinaचीन