शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

भारत-चीन सीमावादावर अद्याप कोणताही ठोस तोडगा नाही : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2020 10:20 IST

लडाख येथील भारत आणि चीन सीमेवरील परिस्थिती जैसे थे आहे. भारत-चीन सीमाप्रश्न निकाली निघाला असता, तर आजची परिस्थिती उद्भवली नसती, असे राजनाथ सिंह म्हणाले. 

ठळक मुद्देभारत-चीन सीमावादावर अद्याप तोडगा नाहीप्रदीर्घ काळापासून सुरू असलेला सीमावाद निकाली लागायला हवा होतासैन्यस्तरीय चर्चा सुरू असल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांकडून स्पष्ट

नवी दिल्ली :भारत-चीन सीमावादावर अद्याप कोणताही ठोस तोडगा निघाला नाही, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले आहे. भारत-चीन सीमावादासंदर्भात आज (बुधवारी) संरक्षणमंत्र्यांनी महत्त्वाची माहिती दिली. त्यावेळी ते बोलत होते. 

लडाख येथील भारत आणि चीन सीमेवरील परिस्थिती जैसे थे आहे. सीमावादासंदर्भात दोन्ही देश अद्याप कोणत्याही ठोस निष्कर्षावर पोहोचलेले नाहीत. असे असले तरी सैन्यस्तरीय चर्चा सुरू असून, लवकरच आणखी एक बैठक होणार आहे, असे राजनाथ सिंह म्हणाले. 

भारत-चीन सीमाप्रश्न प्रदीर्घ काळापासून वादात आहे. यावर तोडगा निघायला हवा. चीनसोबत चर्चा सुरू आहे. आतापर्यंत पार पडलेल्या चर्चांमधून काहीच तोडगा निघालेला नाही. भारत-चीन सीमेवरील परिस्थिती आहे, तशी कायम आहे, असेही त्यांनी सांगितले. कोणताही देश विस्तारवादी धोरणाचा अवलंब करत असेल, तर भारतात घुसखोरी करण्यापासून त्या देशाला थांबवण्याचे सामर्थ्य आणि क्षमता आपल्याकडे आहे, असे राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले. 

भारत-चीन सीमाप्रश्न निकाली निघाला असता, तर आजची परिस्थिती उद्भवली नसती. चीन सीमा भागात त्यांच्याबाजूने नियमितपणे पायाभूत सुविधा तयार करत आहे. मात्र, भारत सैन्य आणि नागरिकांसाठी काम करत आहे. कोणावरही आक्रमण करण्यासाठी नाही, तर देशवासीयांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भारताकडून अनेक कामे केली जात असल्याचे त्यांनी नमूद केले. 

दरम्यान, एप्रिल २०२० पासून लडाख येथील सीमेवरून भारत आणि चीन यांच्यात तणावाची स्थिती आहे. दोन्ही देशांकडून मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात करण्यात आले आहे. आतापर्यंत अनेकदा दोन्ही देशांच्या सैन्यस्तरावर चर्चांच्या अनेक फेऱ्या झाल्या आहे. परंतु, सीमावादावर कोणताही तोडगा निघालेला नाही. 

 

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावladakhलडाखRajnath Singhराजनाथ सिंहborder disputeसीमा वादIndiaभारतchinaचीन