शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

मध्य प्रदेशात बोगस मतदार नाहीतच! निवडणूक आयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 4:13 AM

मध्य प्रदेशात बोगस मतदार आढळून आले नसल्याचे निवडणूक आयोगाच्या पथकांच्या पाहणीतून समोर आले आहे. राज्यात ६० लाख बोगस मतदार असल्याचा दावा काँग्रेसने केला होता.

नवी दिल्ली - मध्य प्रदेशात बोगस मतदार आढळून आले नसल्याचे निवडणूक आयोगाच्या पथकांच्या पाहणीतून समोर आले आहे. राज्यात ६० लाख बोगस मतदार असल्याचा दावा काँग्रेसने केला होता. त्यानंतर आयोगाने या प्रकरणी तपासासाठी दोन पथकांची नियुक्ती केली होती. मात्र, बोगस मतदारांबाबत या पथकांना काहीही माहिती मिळाली नाही.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नेतृत्वात काँग्रेस नेत्यांच्या एका शिष्टमंडळाने काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन याबाबत तक्रार केली होती. त्यानंतर प्रकरणातील वास्तव जाणून घेण्यासाठी आयोगाने दोन पथकांची नियुक्ती केली होती. एका पथकाने नरेला आणि भोजपूर विधानसभा मतदारसंघात तपास केला, तर अन्य पथकाने होशंगाबाद आणि सेवनी- मालवा मतदारसंघात कागदपत्रांची पाहणी केली. ही पथके ४ जून रोजी मध्य प्रदेशात दाखल झाली होती.एका अधिकाºयाने सांगितले की, २०१६मध्ये ६८ लाख बनावट मतदारांची ओळख निश्चित करण्यात आली होती. बहुधा याच नोंदींचा तक्रारीत उल्लेख असावा. त्यानंतर बहुतांश प्रकरणांत नोंदी दुरुस्त करण्यात आल्या आहेत. याबाबतची प्रक्रिया सुरू आहे आणि आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी या त्रुटी दूर करण्यात येतील.सॉफ्टवेअरने शोधलेतपास अधिकाºयांनी सांगितले की, काही ठिकाणी त्रुटी आढळून आल्या आहेत. एका मतदारसंघात २० मतदान केंद्रांवर तपास करण्यात आला. आमच्या डुप्लिकेशन सॉफ्टवेअरने सुरुवातीला ४६ हजार डुप्लिकेट मतदार शोधून काढले. नंतर तपासणीत याची संख्या २४४२ वर आली. यातील २३९७ नोंदी बरोबर असल्याचे दिसून आले. उर्वरित४४ नोंदींपैकी १२ मतदारांचे निधन झाले आहे, तर काही जण स्थलांतरित झाले आहेत असे दिसून आले. ज्या नोंदीत त्रुटी वा विसंगती आहे अशा नोंदींची संख्या कमी असल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही अहवाल आयोगासमोर ठेवण्यात येणार आहेत.

टॅग्स :ElectionनिवडणूकMadhya Pradeshमध्य प्रदेश