शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
5
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
6
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
7
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
8
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
9
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
10
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
11
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
13
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
14
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
15
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
16
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
17
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
18
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!

उत्तर प्रदेशात 3000 टन सोनं सापडलं नाही, जीएसआयनं दावा फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2020 21:56 IST

जीएसआयचे महासंचालक एम.श्रीधर यांनी कोलकाता येथून याबाबत माहिती दिली.

ठळक मुद्देसोनभद्र जिल्ह्यात सुमारे तीन हजार टन सोने मिळण्याची कोणतीच माहिती नसल्याचे जीएसआयने म्हटले आहे. जीएसआयचे महासंचालक एम.श्रीधर यांनी कोलकाता येथून याबाबत माहिती दिली.सोनभद्र जिल्हात सोन्याचे साठे आढळून आले आहेत, असे दोन दिवसांपूर्वी सोनभद्र जिल्ह्याचे खाण अधिकारी के.के. राय यांनी सांगितले होते.

कोलकाता: उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यात सोन्याच्या खाणी सापडल्याची बातमी काल सर्वत्र पसरली होती. मात्र, भारतीय भूगर्भशास्त्र सर्वेक्षण विभागाने (जीएसआय) याबाबतची माहिती फेटाळून लावली आहे. सोनभद्र जिल्ह्यात सुमारे तीन हजार टन सोने मिळण्याची कोणतीच माहिती नसल्याचे जीएसआयने म्हटले आहे. 

जीएसआयचे महासंचालक एम.श्रीधर यांनी कोलकाता येथून याबाबत माहिती दिली. यासंबंधीची माहिती किंवा डेटा जीएसआयकडून कोणालाही दिला जात नाही. जीएसआयने सोनभद्र जिल्ह्यात सोने असल्याचा कोणताही अंदाज वर्तविला नव्हता, असे एम.श्रीधर यांनी सांगितले.  ते म्हणाले, "राज्य युनिटसोबत सर्व्हे केल्यानंतर आम्ही कोणत्याही सापडलेल्या धातूची माहिती देतो. आम्ही (जीएसआय, उत्तर विभाग) या भागात 1998-99 आणि 1999- 2000 मध्ये उत्खनन केले होते. त्यासंबंधीचा अहवाल उत्तर प्रदेशच्या डीजीएमकडे सोपविला होता, जेणेकरून ते पुढील कारवाई करू शकतील."

याचबरोबर, सोन्यासाठी उत्खनन करणे समाधानकारक नव्हते. सोनभद्र जिल्ह्यातील सोन्याच्या मोठ्या स्त्रोताचे परिणाम सुद्धा जास्त चांगले नव्हते, असेही एम.श्रीधर  यांनी सांगितले. तसेच, जिल्ह्यात सोने शोधण्याचा प्रयत्न केल्यानंतर आम्ही आमच्या अहवालात असे काहीच म्हटले नाही. अहवालात जीएसआयने 52,806.25 टन धातूंचा अंदाज वर्तविला आहे. तर सोन पहाडीच्या सब ब्लॉक-एचमध्ये प्रति टन धातूचे प्रमाण 3.03 ग्रॅम सोने मिळण्याचा अंदाज वर्तविला आहे, असे एम. श्रीधर म्हणाले. 

दरम्यान, सोनभद्र जिल्हात सोन्याचे साठे आढळून आले आहेत, असे दोन दिवसांपूर्वी सोनभद्र जिल्ह्याचे खाण अधिकारी के.के. राय यांनी सांगितले होते. 'जीएसआय'च्या अंदाजानुसार सोनपहाडीमध्ये 2700 लाख टन सोने सापडले आहे. तर, हरदीमध्ये 650 लाख टन सोने सापडले आहे, असे के.के. राय यांनी सांगितले होते. मात्र, हा दावा एम. श्रीधर यांनी फेटाळून लावला आहे. 

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशGoldसोनं