शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

उत्तर प्रदेशात 3000 टन सोनं सापडलं नाही, जीएसआयनं दावा फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2020 21:56 IST

जीएसआयचे महासंचालक एम.श्रीधर यांनी कोलकाता येथून याबाबत माहिती दिली.

ठळक मुद्देसोनभद्र जिल्ह्यात सुमारे तीन हजार टन सोने मिळण्याची कोणतीच माहिती नसल्याचे जीएसआयने म्हटले आहे. जीएसआयचे महासंचालक एम.श्रीधर यांनी कोलकाता येथून याबाबत माहिती दिली.सोनभद्र जिल्हात सोन्याचे साठे आढळून आले आहेत, असे दोन दिवसांपूर्वी सोनभद्र जिल्ह्याचे खाण अधिकारी के.के. राय यांनी सांगितले होते.

कोलकाता: उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यात सोन्याच्या खाणी सापडल्याची बातमी काल सर्वत्र पसरली होती. मात्र, भारतीय भूगर्भशास्त्र सर्वेक्षण विभागाने (जीएसआय) याबाबतची माहिती फेटाळून लावली आहे. सोनभद्र जिल्ह्यात सुमारे तीन हजार टन सोने मिळण्याची कोणतीच माहिती नसल्याचे जीएसआयने म्हटले आहे. 

जीएसआयचे महासंचालक एम.श्रीधर यांनी कोलकाता येथून याबाबत माहिती दिली. यासंबंधीची माहिती किंवा डेटा जीएसआयकडून कोणालाही दिला जात नाही. जीएसआयने सोनभद्र जिल्ह्यात सोने असल्याचा कोणताही अंदाज वर्तविला नव्हता, असे एम.श्रीधर यांनी सांगितले.  ते म्हणाले, "राज्य युनिटसोबत सर्व्हे केल्यानंतर आम्ही कोणत्याही सापडलेल्या धातूची माहिती देतो. आम्ही (जीएसआय, उत्तर विभाग) या भागात 1998-99 आणि 1999- 2000 मध्ये उत्खनन केले होते. त्यासंबंधीचा अहवाल उत्तर प्रदेशच्या डीजीएमकडे सोपविला होता, जेणेकरून ते पुढील कारवाई करू शकतील."

याचबरोबर, सोन्यासाठी उत्खनन करणे समाधानकारक नव्हते. सोनभद्र जिल्ह्यातील सोन्याच्या मोठ्या स्त्रोताचे परिणाम सुद्धा जास्त चांगले नव्हते, असेही एम.श्रीधर  यांनी सांगितले. तसेच, जिल्ह्यात सोने शोधण्याचा प्रयत्न केल्यानंतर आम्ही आमच्या अहवालात असे काहीच म्हटले नाही. अहवालात जीएसआयने 52,806.25 टन धातूंचा अंदाज वर्तविला आहे. तर सोन पहाडीच्या सब ब्लॉक-एचमध्ये प्रति टन धातूचे प्रमाण 3.03 ग्रॅम सोने मिळण्याचा अंदाज वर्तविला आहे, असे एम. श्रीधर म्हणाले. 

दरम्यान, सोनभद्र जिल्हात सोन्याचे साठे आढळून आले आहेत, असे दोन दिवसांपूर्वी सोनभद्र जिल्ह्याचे खाण अधिकारी के.के. राय यांनी सांगितले होते. 'जीएसआय'च्या अंदाजानुसार सोनपहाडीमध्ये 2700 लाख टन सोने सापडले आहे. तर, हरदीमध्ये 650 लाख टन सोने सापडले आहे, असे के.के. राय यांनी सांगितले होते. मात्र, हा दावा एम. श्रीधर यांनी फेटाळून लावला आहे. 

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशGoldसोनं