शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

No Confidence Motion: सोनिया गांधी यांचे गणित कच्चे- अनंत कुमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 17:09 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडे अविश्वास दर्शक ठरावावर मात करण्याइतके संख्याबळ असूनही सोनिया गांधी यांनी काल केलेल्या या विधानामुळे सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले होते.

नवी दिल्ली- कोण म्हणतंय आमच्याकडे संख्याबळ नाही? अशा शब्दांमध्ये अविश्वास ठरावाच्या भविष्याबद्दल मत मांडणाऱ्या काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना भाजपाने आज प्रत्युत्तर दिले आहे. सोनिया गांधी यांचे गणित कच्चे आहे अशा शब्दांमध्ये अनंत कुमार यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडे अविश्वास दर्शक ठरावावर मात करण्याइतके संख्याबळ असूनही सोनिया गांधी यांनी काल केलेल्या या विधानामुळे सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले होते. त्याबाबत बोलताना अनंत कुमार यांनी आपले मत मांडले. ते म्हणाले,'' सोनियाजींचे गणित कच्चे आहे. त्यांनी याचप्रकारे 1996 साली आकडेमोड केली होती. पुढे काय झालं हे आम्हाला माहिती आहे. त्याची आकडेमोड पुन्हा एकदा चुकीची ठरेल. मोदी सरकारकडे संसदेत आणि संसदेबाहेरही बहुमत आहे. आम्हाला सर्व दिशांनी पाठिंबा मिळेल हे तुम्हाला दिसेलच.''1999 साली सोनिया गांधी यांनी आमच्याकडे 272 सदस्य असून अजून आमच्याकडे लोक येत आहेत अशाप्रकारचे विधान केले होते. मात्र अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारचा एका मताने पराभव केल्यानंतर प्रत्यक्षात त्यांचा पक्ष सत्ता स्थापन करु शकला नाही.

1999 साली काय झाले होते- 1999 साली पंतप्रधान वाजपेयी यांनी सर्वात प्रथम अविश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागले. यावेळेस त्यांचे सरकार केवळ एका मताने पराभूत झाले. बहुजन समाज पक्षाने भारतीय जनता पार्टीस मदत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यांनी आयत्यावेळेस भाजपा सरकाविरोधात भूमिका घेतली.  हे सरकार दलितविरोधी आहे असे सांगत या पक्षाने सरकारला विरोध केला होता.अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार कोसळण्याचे खरे कारण जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे खासदार सैफुद्दिन सोझ यांनी अचानक अविश्वास ठरावाला पाठिंबा देऊन रालोआ सरकारविरोधात मतदान केले. यामुळे त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले सोझ सध्या काँग्रेसमध्ये आहेत.  त्याहून धक्कादायक घटना लोकसभेत त्यावेळेस घडली होती ती म्हणजे गिरिधर गमांग यांनी लोकसभेत येऊन सरकारविरोधात मतदान करणे. गमांग ओडिशाचे मुख्यमंत्री होते, त्यांनी ओडिशाच्या मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला होता, मात्र त्यांनी लोकसभेचे सदस्यत्व सोडले नव्हते. त्यांच्या एका मताचाही रालोआ सरकारला फटका बसला. आज हेच गमांग भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत.

टॅग्स :No Confidence motionअविश्वास ठरावSonia Gandhiसोनिया गांधीParliamentसंसद