शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

No Confidence Motion: राजमाता विजयाराजे सिंदियांना अश्रू अनावर झाले तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 13:53 IST

1999 साली अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारला लोकसभेत 269 सदस्यांनी पाठिंबा दिला तर त्यांच्या सरकारविरोधात 270 सदस्यांनी पाठिंबा दिला होता.

नवी दिल्ली- राजकारण आणि सत्तेत कायम राहाणे या सतत बदलणाऱ्या गोष्टी आहेत. विशेषतः एखादे आघाडीचे सरकार पाच वर्षे कायम राहण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. विविध पक्षांना, विविध प्रांतातील विचारांना, नेत्यांना एकत्र घेऊन काम करणे अत्यंत कठिण काम असते. अटलबिहारी वाजपेयी यांनी आघाडीचे आव्हान स्विकारून सरकार स्थापन केले होते. मात्र 1999 मध्ये मात्र त्यांच्या सरकारला मोठ्या नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागले. लोकसभेत केवळ एका मताने त्यांच्या सरकारचा पराभव झाला होता.

जयललिता यांची भूमिका-14 एप्रिल 1999 रोजी अण्णाद्रमुकच्या नेत्या जयललिता यांनी रालोआ सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या मंत्र्यांना राजीनामे देण्यास सांगितले. यामुळे अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारला विरोधकांच्या  अविश्वास दर्शक ठरावाला सामोरे जावे लागले. यामध्ये बहुजन समाज पार्टीने अचानक सरकारविरोधात भूमिका घेतली. तर गिरिधर गमांग यांनी ओडिशाचे मुख्यमंत्री असूनही मतदानाला येणे धक्कादायक होते. त्यातच नॅशनल कॉन्फरन्सच्या सैफुद्दिन सोझ यांनी रालोआ सरकारविरोधात भूमिका घेतली. त्यामुळे वाजपेयी यांचे सरकार अल्पमतात आले.

एका मताने पराभव झाल्यावर-अविश्वास दर्शक ठरावात सरकार केवळ एका मताने पराभूत झाल्यावर संपूर्ण लोकसभा काही क्षण स्तब्ध झाल्यासारखी झाली. वाजपेयी यांनी निकालाकडे एक नजर टाकून ते पीएम चेंबरच्या रुम नंबर 10 मध्ये आले. त्यांना पाहाताच राजमाता विजयाराजे सिंदिया यांना अश्रू आवरणे कठिण झाल्या आणि त्या रडू लागल्या. वाजपेयी यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला मात्र त्यावेळेस त्यांनाही अत्यंत दुःख झाले. आपण पराभूत झालो, केवळ एका मताने पराभूत झालो असे शब्द त्यांनी अडवाणी यांना उद्देशून उच्चारले. राजमाता सिंदिया या ग्वाल्हेर घराण्याच्या महाराणी आणि भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेपासून प्रत्येक वाटचालीत त्यांचा सहभाग होता. भाजपाच्या प्रदीर्घ काळ उपाध्यक्षही होत्या. त्यामुळेच पक्षाचे सरकार केवळ एका मताने पराभूत होणे त्यांना सहन झाले नाही. सरकारच्या बाजूने 269 तर सरकारविरोधात 270 मते पडली होती.

निकालानंतर-पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आपल्या सरकारचे बहुमत सिद्ध करण्यात यशस्वी झालेले नाहीत असे लोकसभेचे सभापती जीएमसी बालयोगी यांनी जाहीर केले. विरोधी पक्षनेते शरद पवार यांनी बहुजन समाज पक्षाने सरकारविरोधात भूमिका घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले होते. जर समान मते पडली असती तर सभापतींना आपले निर्णायक मत देता आले असते असे मत लालकृष्ण अडवाणी यांनी व्यक्त केले होते.

 

टॅग्स :No Confidence motionअविश्वास ठरावprime ministerपंतप्रधानAtal Bihari Vajpayeeअटल बिहारी वाजपेयी