शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

No Confidence Motion: राजमाता विजयाराजे सिंदियांना अश्रू अनावर झाले तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 13:53 IST

1999 साली अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारला लोकसभेत 269 सदस्यांनी पाठिंबा दिला तर त्यांच्या सरकारविरोधात 270 सदस्यांनी पाठिंबा दिला होता.

नवी दिल्ली- राजकारण आणि सत्तेत कायम राहाणे या सतत बदलणाऱ्या गोष्टी आहेत. विशेषतः एखादे आघाडीचे सरकार पाच वर्षे कायम राहण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. विविध पक्षांना, विविध प्रांतातील विचारांना, नेत्यांना एकत्र घेऊन काम करणे अत्यंत कठिण काम असते. अटलबिहारी वाजपेयी यांनी आघाडीचे आव्हान स्विकारून सरकार स्थापन केले होते. मात्र 1999 मध्ये मात्र त्यांच्या सरकारला मोठ्या नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागले. लोकसभेत केवळ एका मताने त्यांच्या सरकारचा पराभव झाला होता.

जयललिता यांची भूमिका-14 एप्रिल 1999 रोजी अण्णाद्रमुकच्या नेत्या जयललिता यांनी रालोआ सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या मंत्र्यांना राजीनामे देण्यास सांगितले. यामुळे अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारला विरोधकांच्या  अविश्वास दर्शक ठरावाला सामोरे जावे लागले. यामध्ये बहुजन समाज पार्टीने अचानक सरकारविरोधात भूमिका घेतली. तर गिरिधर गमांग यांनी ओडिशाचे मुख्यमंत्री असूनही मतदानाला येणे धक्कादायक होते. त्यातच नॅशनल कॉन्फरन्सच्या सैफुद्दिन सोझ यांनी रालोआ सरकारविरोधात भूमिका घेतली. त्यामुळे वाजपेयी यांचे सरकार अल्पमतात आले.

एका मताने पराभव झाल्यावर-अविश्वास दर्शक ठरावात सरकार केवळ एका मताने पराभूत झाल्यावर संपूर्ण लोकसभा काही क्षण स्तब्ध झाल्यासारखी झाली. वाजपेयी यांनी निकालाकडे एक नजर टाकून ते पीएम चेंबरच्या रुम नंबर 10 मध्ये आले. त्यांना पाहाताच राजमाता विजयाराजे सिंदिया यांना अश्रू आवरणे कठिण झाल्या आणि त्या रडू लागल्या. वाजपेयी यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला मात्र त्यावेळेस त्यांनाही अत्यंत दुःख झाले. आपण पराभूत झालो, केवळ एका मताने पराभूत झालो असे शब्द त्यांनी अडवाणी यांना उद्देशून उच्चारले. राजमाता सिंदिया या ग्वाल्हेर घराण्याच्या महाराणी आणि भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेपासून प्रत्येक वाटचालीत त्यांचा सहभाग होता. भाजपाच्या प्रदीर्घ काळ उपाध्यक्षही होत्या. त्यामुळेच पक्षाचे सरकार केवळ एका मताने पराभूत होणे त्यांना सहन झाले नाही. सरकारच्या बाजूने 269 तर सरकारविरोधात 270 मते पडली होती.

निकालानंतर-पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आपल्या सरकारचे बहुमत सिद्ध करण्यात यशस्वी झालेले नाहीत असे लोकसभेचे सभापती जीएमसी बालयोगी यांनी जाहीर केले. विरोधी पक्षनेते शरद पवार यांनी बहुजन समाज पक्षाने सरकारविरोधात भूमिका घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले होते. जर समान मते पडली असती तर सभापतींना आपले निर्णायक मत देता आले असते असे मत लालकृष्ण अडवाणी यांनी व्यक्त केले होते.

 

टॅग्स :No Confidence motionअविश्वास ठरावprime ministerपंतप्रधानAtal Bihari Vajpayeeअटल बिहारी वाजपेयी