शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

No Confidence motion : मोदी सरकारने विश्वास जिंकला, पण टेन्शन वाढलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2018 08:38 IST

लोकसभेचा विश्वास मोदी सरकारने जिंकला असला तरी त्यांच्यासमोर कडवे आव्हान उभे करण्यात काँग्रेससह विरोधक यशस्वी झाले आहेत.

नवी दिल्ली - शुक्रवारी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारविरोधात दाखल झालेला अविश्वास प्रस्ताव लोकसभेने 325 विरुद्ध 126 अशा मोठ्या फरकाने फेटाळून लावला. त्यामुळे संसदेच्या कनिष्ठ सभागृहात मोदी सरकारकडे अद्यापही भक्कम पाठबळ असल्याचे समोर आले आहे. मात्र लोकसभेचा विश्वास मोदी सरकारने जिंकला असला तरी त्यांच्यासमोर कडवे आव्हान उभे करण्यात काँग्रेससह विरोधक यशस्वी झाले आहेत. त्यामुळे विश्वास जिंकला तरी पुढील लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी मोदी आणि भाजपाचे टेन्शन वाढले आहे. भाजपाचे मित्र पक्ष दुरावले लोकसभेत पूर्ण बहुमत असल्याने अविश्वास प्रस्तावाबाबत भाजपाला फारशी चिंता नव्हती. मात्र याप्रसंगी जुना मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेने भाजपाला साथ न दिल्याने मोदी आणि शहा कंपनीची चिंता वाढण्याची शक्यता आहे. अविश्वास प्रस्तावादरम्यान शिवसेना भाजपाला साथ देईल, असे वाटले होते. मात्र शिवसेनेने ऐनवेळी भाजपाला धक्का दिला. शिवसेनेची हीच भूमिका कायम राहिल्यास येत्या निवडणुकीत भाजपाला महराष्ट्रामध्ये धक्का बसण्याची शक्यता आहे. तामिळनाडूतील एआयएडीएमकेने मोदी सरकारला पाठिंबा दिला असला तरी राज्याच्या प्रश्नांवरून सरकारवर टीका करत मोदी सरकारपासून अंतर ठेवण्याचा प्रयत्न केला.  राहुल गांधींचा हल्लाबोलअविश्वास प्रस्तावादरम्यान राहुल गांधींनी केलेल्या जोरदार भाषणामुळे भाजपाच्या गोटात खळबळ उडाली होती. राफेल करारापासून ते मॉब लिचिंगपर्यंत सर्व प्रकरणामध्ये राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. तसेच मोदी आणि अमित शाह या भाजपातील सध्याच्या सर्वशक्तिमान नेत्यांवर आरोपांच्या फैरी झाडत त्यांनी सभागृहात सत्ताधाऱ्यांची कोंडी केली. विरोधकांची एकजूट विपक्ष एकजुट नजर आया विरोधी पक्षांची एकजूटही दिसून आली. विरोधी पक्षांनी विविध विषयांवरून सरकारला घेरले. तसेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मोदी सरकारवर आरोपांच्या फैरी झाडत असताना भाजपाच्या नेत्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता. मात्र राहुल गांधींना विरोधी बाकांवरून भक्कम साथ मिळाली. तृणमूल काँग्रेस, सपा,  राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबतच तेलुगू देसमचे खासदारही राहुल गांधींच्या बाजूने उभे राहिले. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात आश्वासक वातावरण निर्माण झाले आहे. एकंदरीत ही परिस्थिती पाहता मोदी सरकार आणि भाजपासाठी पुढचे दिवस आव्हानात्मक असणार आहेत. 

टॅग्स :No Confidence motionअविश्वास ठरावNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेस