शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
5
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
6
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
7
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
8
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
9
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
10
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
11
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
12
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
13
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
14
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
15
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
16
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
18
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
19
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा

No Confidence motion : मोदी सरकारने विश्वास जिंकला, पण टेन्शन वाढलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2018 08:38 IST

लोकसभेचा विश्वास मोदी सरकारने जिंकला असला तरी त्यांच्यासमोर कडवे आव्हान उभे करण्यात काँग्रेससह विरोधक यशस्वी झाले आहेत.

नवी दिल्ली - शुक्रवारी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारविरोधात दाखल झालेला अविश्वास प्रस्ताव लोकसभेने 325 विरुद्ध 126 अशा मोठ्या फरकाने फेटाळून लावला. त्यामुळे संसदेच्या कनिष्ठ सभागृहात मोदी सरकारकडे अद्यापही भक्कम पाठबळ असल्याचे समोर आले आहे. मात्र लोकसभेचा विश्वास मोदी सरकारने जिंकला असला तरी त्यांच्यासमोर कडवे आव्हान उभे करण्यात काँग्रेससह विरोधक यशस्वी झाले आहेत. त्यामुळे विश्वास जिंकला तरी पुढील लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी मोदी आणि भाजपाचे टेन्शन वाढले आहे. भाजपाचे मित्र पक्ष दुरावले लोकसभेत पूर्ण बहुमत असल्याने अविश्वास प्रस्तावाबाबत भाजपाला फारशी चिंता नव्हती. मात्र याप्रसंगी जुना मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेने भाजपाला साथ न दिल्याने मोदी आणि शहा कंपनीची चिंता वाढण्याची शक्यता आहे. अविश्वास प्रस्तावादरम्यान शिवसेना भाजपाला साथ देईल, असे वाटले होते. मात्र शिवसेनेने ऐनवेळी भाजपाला धक्का दिला. शिवसेनेची हीच भूमिका कायम राहिल्यास येत्या निवडणुकीत भाजपाला महराष्ट्रामध्ये धक्का बसण्याची शक्यता आहे. तामिळनाडूतील एआयएडीएमकेने मोदी सरकारला पाठिंबा दिला असला तरी राज्याच्या प्रश्नांवरून सरकारवर टीका करत मोदी सरकारपासून अंतर ठेवण्याचा प्रयत्न केला.  राहुल गांधींचा हल्लाबोलअविश्वास प्रस्तावादरम्यान राहुल गांधींनी केलेल्या जोरदार भाषणामुळे भाजपाच्या गोटात खळबळ उडाली होती. राफेल करारापासून ते मॉब लिचिंगपर्यंत सर्व प्रकरणामध्ये राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. तसेच मोदी आणि अमित शाह या भाजपातील सध्याच्या सर्वशक्तिमान नेत्यांवर आरोपांच्या फैरी झाडत त्यांनी सभागृहात सत्ताधाऱ्यांची कोंडी केली. विरोधकांची एकजूट विपक्ष एकजुट नजर आया विरोधी पक्षांची एकजूटही दिसून आली. विरोधी पक्षांनी विविध विषयांवरून सरकारला घेरले. तसेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मोदी सरकारवर आरोपांच्या फैरी झाडत असताना भाजपाच्या नेत्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता. मात्र राहुल गांधींना विरोधी बाकांवरून भक्कम साथ मिळाली. तृणमूल काँग्रेस, सपा,  राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबतच तेलुगू देसमचे खासदारही राहुल गांधींच्या बाजूने उभे राहिले. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात आश्वासक वातावरण निर्माण झाले आहे. एकंदरीत ही परिस्थिती पाहता मोदी सरकार आणि भाजपासाठी पुढचे दिवस आव्हानात्मक असणार आहेत. 

टॅग्स :No Confidence motionअविश्वास ठरावNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेस