शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

"पुढच्या वेळीही मी मुख्यमंत्री होईन, माझ्या पसंतीच्या मंत्र्यांचीही निवड करेन"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 21:28 IST

Ashok Gehlot : भाजपाचे लोक बाहेर पडल्यामुळे काही लोकांना त्रास होऊ लागेल, असे म्हणत अशोक गहलोत यांनी भाजपाला टोला लगावला.

जयपूर : पंजाब काँग्रेसमध्ये गोंधळ निर्माण झाल्याची परिस्थिती असताना आता राजस्थानमध्ये बंडखोरीचा सूर आहे. राजस्थानमध्येकाँग्रेसमध्ये अद्याप फारसा गदारोळ झाला नाही, परंतु अंतर्गत संबंधांमधील वाद स्पष्टपणे जाणवले जाऊ शकतात. अशातच मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी मोठं विधान केले आहे. पुढच्या वेळीही मुख्यमंत्री होणार असल्याचे मुख्यमंत्री अशोक गहलोत  यांनी स्पष्ट केले आहे. (No Change Of Leadership, We Will Complete Our Tenure And Return Once Again: Ashok Gehlot)

राजस्थानमध्ये पंजाबसारखे होणार नाही. मीडिया आणि भाजपा नक्कीच अशा कहाण्या चालवत आहेत, पण राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार पाच वर्षे चालणार आहे. पुढील 15 वर्षे देखील काँग्रेसचे सरकार कायम राहणार आहे, असे मीडियाशी बोलताना अशोक गहलोत यांनी म्हटले आहे. याचबरोबर, भाजपाचे लोक म्हणतात की, मुख्यमंत्री घरात बसतात. मात्र, मी तर हॉटेलमध्ये जैसलमेर-जयपूर फिरत होतो. ही अमित शहा आणि धर्मेंद्र प्रधान यांची कृपा होती, असे अशोक गहलोत म्हणाले.

याचबरोबर, भाजपाचे लोक बाहेर पडल्यामुळे काही लोकांना त्रास होऊ लागेल, असे म्हणत अशोक गहलोत यांनी भाजपाला टोला लगावला. मला काहीही होणार नाही, आता 15 वर्षे राहणार. मी घरात बसलो नाही, जर मी निघून गेलो तर तुम्हाला आणि तुमच्या चाहत्यांनाही समस्यांना सामोरे जावे लागेल, असे अशोक गहलोत म्हणाले. दरम्यान, अशोक गेहलोत यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून घराबाहेर पडत नसल्याचा आरोप करण्यात येत होता. या आरोपावर उत्तर देताना अशोक गहलोत यांनी हे स्पष्टीकरण दिले.

याशिवाय, अशोक गहलोत यांनी सचिन पायलट यांच्यावरही निशाणा साधला. मी माझ्या आवडीचे मंत्री बनवेन आणि पुढच्या वेळी सुद्धा मी मुख्यमंत्री होईन, असे अशोक गहलोत यांनी म्हटले आहे. दरम्यान, अशोक गहलोत यांचे हे विधान एकप्रकारे सचिन पायलट यांना आव्हान देणारे आहे, कारण त्यांना आपल्या समर्थकांना दीर्घकाळ मंत्रिमंडळात सामावून घ्यायचे आहे.

टॅग्स :Ashok Gahlotअशोक गहलोतcongressकाँग्रेसRajasthanराजस्थान