शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांची ‘सरसकट ओबीसीची मागणी स्वीकारलेली नाही’; CM देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
2
आजचे राशीभविष्य, ५ सप्टेंबर २०२५: प्रवासाचे बेत, प्रियव्यक्तीचा सहवास पण वाणीवर संयम ठेवा !
3
जीएसटीतील बदलामुळे सामान्यांचा मोठा फायदा; अर्थव्यवस्थेलाही मिळेल बूस्टर, PM मोदींना विश्वास
4
शिक्षणाच्या दर्जात आयआयटी मद्रास अव्वलच...; क्रमवारीत आयआयटी बॉम्बे तिसऱ्या स्थानावर
5
यू टर्न की मास्टरस्ट्रोक? जनतेच्या खिशातून अधिकचेच पैसे काढले; ८ वर्षांनी सरकारच्या लक्षात आले
6
मराठा, ओबीसी आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमित्यांचे कार्य समांतर - चंद्रशेखर बावनकुळे
7
कुजबुज! राज ठाकरेंचं एवढेच वाक्य वादळ ठरले; शिंदेसेनेच्या आमदाराने लगावला टोला, "आधी लोकांमधून.."
8
प्रवाशांनी लावला रेल्वेला चुना, त्यामुळे आता स्थानकात क्यूआर तिकीट बंद; प्रशासनाचा निर्णय
9
"मराठी माणूस एकटवला, म्हणून..."; निदर्शनांवर निर्बंधांच्या मागणीवरून मिलिंद देवरांवर टीकेची झोड 
10
जीआरवर उगाच संभ्रम निर्माण केला जातोय; दगाफटका केला तर सुपडा साफ होईल, मनोज जरांगेंचा इशारा
11
ओ देवाभाऊ, तुही जात कंची? फडणवीसांवर विषारी टीका करणाऱ्यांपेक्षा त्यांच्या नेतृत्वावर...
12
घटनात्मक गुंतागुंत! एखाद्या विधिमंडळ सदस्याने चुकीचे वर्तन केले तर त्याला शिक्षा कोण देणार?
13
२३ वर्षीय प्रियकर, ८३ वर्षीय प्रेयसी! अनोखी प्रेमकहाणी आली चर्चेत; मैत्रिणीच्या घरी गेला अन्...
14
पक्ष्यांसह विमानांच्या सुरक्षेवर आता ‘बर्डगार्ड’ ठेवणार वॉच; नवी मुंबई विमानतळ कंपनीची माहिती
15
३ वेळा १० थर, तरी विश्वविक्रम नाही; कुठेतरी पाणी मुरतंय, जय जवान गोविंदा पथकाचा आरोप
16
पत्नीने प्रेयसीसोबत लॉजवर पकडलं; घाबरलेल्या पतीने खाडीत मारली उडी, त्यानंतर 'असं' काही घडलं...
17
जगभ्रमंतीसाठी निघालेल्या नवी मुंबईच्या ट्रॅव्हल ब्लॉगरची दुचाकी इंग्लंडमध्ये चोरीला
18
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
19
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
20
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?

‘विमान कर्मचाऱ्यांवर निराधार आरोप नको’; इंडियन पायलट्स संघटनेने अमेरिकन अहवाल फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 06:14 IST

Air India Plane Crash Report: चौकशीमध्ये विमानविषयक तज्ज्ञ समावेशाची मागणी करण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अहमदाबाद येथे अपघात झालेल्या एअर इंडियाच्या विमानातील तांत्रिक बिघाडाचा केंद्र सरकारने पुन्हा आढावा घ्यावा तसेच या चौकशीत संबंधित विषयातील तज्ज्ञांचा समावेश करावा, अशी मागणी फेडरेशन ऑफ इंडियन पायलट्स (एफआयपी) या संघटनेने गुरुवारी केली. १२ जून रोजी झालेल्या या विमान अपघातात २६० जणांचा मृत्यू झाला. यासंदर्भात एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने (एएआयबी) प्रसिद्ध केलेल्या प्राथमिक अहवालाबाबत एफआयपीने काही प्रश्न उपस्थित केले आहेत. 

एफआयपीने सांगितले की, या विमानाची दोन्ही इंजिन आपोआप बंद होण्याची शक्यता ज्यामुळे उद्भवली असती त्या तांत्रिक गोष्टींचा एएआयबीच्या अहवालात नीट विचार केलेला नाही. ही गोष्ट एफपीआयने केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाला पत्र लिहून कळविली आहे. त्यात म्हटले आहे की, अहमदाबाद येथे विमानाला झालेल्या अपघाताबद्दलचा प्राथमिक अहवाल वेळेत सादर केला ही उत्तम गोष्ट झाली. मात्र या विमानातील पायलटच्या काय चुका झाल्या असाव्यात याचा कोणत्याही ठोस पुराव्याविना एएआयबीने अंदाज बांधण्याचा प्रयत्न केला आहे.

एफआयपीने म्हटले आहे की, बोईंग विमानाच्या प्रणालीमध्ये दोष असतानाही त्याचे खापर पायलटवर फोडण्यात आल्याचे प्रकार याआधी घडले आहेत. अहमदाबाद विमान अपघातात पायलटची चूक असल्याचे आडमार्गाने सुचविणे हे अयोग्य आहे. त्यामुळे अंतिम निष्कर्ष चुकीच्या पद्धतीने काढले जाऊ शकतात. फ्लाइट डेटा रेकॉर्डर, कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डर तसेच टीसीएमए, इइसी, एफएडीइसी या प्रणालींमधील तांत्रिक बिघाडांचा आढावा घेण्याची मागणी या संघटनेने केली आहे. 

‘विमान कर्मचाऱ्यांवर निराधार आरोप नको’एअर इंडियाच्या विमानातील कर्मचाऱ्यांनी प्रवाशांचे प्राण वाचविण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले. त्यामुळे त्यांच्यावर कोणीही निराधार आरोप करू नयेत असे एअरलाइन पायलट्स असोसिएशन-इंडिया (अल्पा-इंडिया) या पायलटच्या संघटनेने गुरुवारी म्हटले आहे. अहमदाबाद येथे झालेल्या अपघाताबाबत कोणतेही ठोस पुरावे नसताना पायलटना जबाबदार धरू नये, असेही पायलटच्या संघटनांचे मत आहे. 

स्टॅबिलायझरमधील बिघाडाचीही चौकशी करा’अहमदाबादमध्ये १२ जून रोजी एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताच्या चौकशीत स्टॅबिलायझरमधील संभाव्य बिघाडाचाही विचार व्हावा, असे विमानतज्ज्ञ कॅप्टन एहसान खालिद यांनी म्हटले आहे. रेकॉर्डरमधील स्टॅबिलायझरशी संबंधित माहिती तपासली पाहिजे. कारण दुरुस्ती नीट न झाल्यामुळे अपघात झाला असावा अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.  

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAir Indiaएअर इंडिया