शहरं
Join us  
Trending Stories
1
हाँगकाँगमध्ये हाहाकार! २,००० फ्लॅट्सचे गगनचुंबी टॉवर एकाचवेळी पेटले, १३ जणांचा मृत्यू...
2
राम मंदिर ध्वजारोहणावर बोलणं पाकिस्तानवा महागात पडलं, भारतानं आरसा दाखवत गप-गार केलं!
3
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
4
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
5
Travel : कोल्डड्रिंकपेक्षाही स्वस्त पेट्रोल, इतर गोष्टीही खिशाला परवडणाऱ्या; भारतीयांसाठी व्हिसा फ्री आहे 'हे' बेट!
6
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
7
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
8
२०२६ ला ५ राशींची अग्निपरीक्षा सुरू, साडेसाती तीव्र होणार; शनि प्रकोप-प्रतिकूल, अखंड सावधान!
9
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
10
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
11
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
12
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
13
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
14
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
15
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
16
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
17
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
18
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
19
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
20
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानला माफी नाहीच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 14:00 IST

मुद्द्याची गोष्ट : कोणतेही दहशतवादी कृत्य हे ‘ॲक्ट ऑफ वॉर’ मानले जाईल आणि त्याला ऑपरेशन सिंदूर हेच प्रत्युत्तर असेल हे भारताने स्पष्ट केले आहे. तसेच, पीओके रिकामा करावा असा उल्लेख आजवर कोणत्याही राजकीय प्रमुखाने भाषणात केलेला नव्हता. यामुळे पाकिस्तानचे धाबे दणाणले आहे. 

डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र आणि संरक्षण धोरण विश्लेषक -

भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये १९४९ पासून २०१९ पर्यंत अनेक संघर्ष झाले. परंतु पहलगामच्या बैसरन खोऱ्यातील दहशतवादी हल्ल्याला भारताने ज्या पद्धतीने प्रत्युत्तर दिले त्यामुळे पाकिस्तान हताश झाला आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ला हा आतापर्यंतच्या पाकिस्तानपुरस्कृत हल्ल्यांपेक्षा वेगळा होता. 

दहशतवाद्यांनी जाणीवपूर्वक नागरिकांना त्यांचा धर्म विचारून ‘टार्गेटेड किलिंग’ केले आणि यामध्ये २६ निष्पाप भारतीय पर्यटक मारले गेले. यातून पाकपुरस्कृत दहशतवादी संघटना या जागतिक पातळीवर सक्रिय असणाऱ्या दहशतवादी संघटनांशी संलग्न असल्याचे स्पष्ट झाले. धर्म विचारून टार्गेट करण्याची मोडस ऑपरेंडी इसिस, अल कायदा, हमास यांसारख्या दहशतवादी संघटनांनी यापूर्वीच वापरली होती. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी ताज हॉटेलमध्ये घुसलेल्या पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनीही धर्म, राष्ट्रीयत्व विचारून हत्या केल्या होत्या. आंतरराष्ट्रीय समुदायाला भारत सातत्याने एक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करत आहे, तो म्हणजे पाकपुरस्कृत दहशतवादी संघटना या केवळ भारतासाठीच नव्हे तर जगासाठी डोकेदुखी आहेत. 

पाकिस्तानचा दहशतवाद्यांना आश्रय ओसामा बिन लादेन हादेखील पाकिस्तानातच पकडला गेला. आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलेल्या ज्या हाफिज सईदवर लाखो डॉलर्सचा इनाम आहे, त्याचाही मुक्काम पाकिस्तानातच आहे. डॅनियल पर्ल या पत्रकाराची गळा चिरून हत्या करणाऱ्या अबू जिंदालचा खात्मा आता ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये झाला. अमेरिका गेल्या दोन दशकांपासून त्याला पकडू शकलेला नव्हता, हे इथेलक्षात घ्यायला हवे.  

अणुहल्ल्याच्या धमक्यांमधील हवा गेलीया हल्ल्यानंतर सर्वांत मोठी गोष्ट घडली, ती म्हणजे पाकिस्तानच्या अणुयुद्धाच्या धमक्यांचा फुगा कायमचा फुटला. साधारणतः १९९८ मध्ये भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश अण्वस्त्रधारी बनले. यानंतर भारताने तत्काळ १९९९ मध्ये आपले अणुधोरण जाहीर केले. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी संसदेमध्ये या धोरणाची घोषणा करताना भारत कधीही पहिल्यांदा अण्वस्त्रांचा वापर करणार नाही, हे जाहीर केले. भारताचा अण्वस्त्र कार्यक्रम हा प्रतिहल्ल्यासाठी असेल, हेही जाहीर करण्यात आले. भारताने यातून आपण जबाबदार देश असल्याचे दाखवून दिले.  

या उलट पाकिस्तान सातत्याने अण्वस्त्र हल्ल्याच्या धमक्या देत राहिला. अशा प्रकारची वक्तव्ये पाकिस्तानच्या शीर्षस्थ नेत्यांकडून करण्यात आली. यामुळे काश्मीर प्रश्नावरून संघर्ष झाला तर त्याचे रूपांतर अणुयुद्धात होऊ शकते, असा जणू सिद्धांतच बनला. त्यातून जागतिक पटलावर काश्मीर प्रश्न महत्त्वाचा बनला. यामुळे भारतावर गेल्या दोन दशकांमध्ये ‘स्ट्रॅटेजिक रिस्ट्रेन’ किंवा सामरिक संयमाबाबत दबाव आला.   

हे उघड-उघड पाकिस्तानचे न्युक्लियर ब्लॅकमेलिंग होते. या ब्लॅकमेलिंग बलूनला टाचणी लावण्याचे काम ‘ऑपरेशन सिंदूर’ने केले. पाकिस्तानच्या सर्व महत्त्वाच्या शहरात घुसून तेथील एअरबेस, रडार सिस्टिम, लढाऊ विमाने, ड्रोन्स भारताने उद्ध्वस्त केले. या संघर्षात १०० दहशतवादी आणि ५० सैनिक भारताने मारले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ‘यापुढे न्युक्लियर ब्लॅकमेलिंग’ खपवून घेतले जाणार नाही’ हे स्पष्टपणाने सांगितले. 

जलास्त्र अद्यापही कोंडीसाठी सज्ज एअरस्ट्राइक करण्यापूर्वी भारताने सिंधू नदी पाणीवाटप करार स्थगित केला. भविष्यात पाकिस्तान सुधारला नाही तर भारत सिंधू नदीचे पाणी अडवेल किंवा त्यासंदर्भातील कोणताही डेटा शेअर करणार नाही किंवा गरज भासल्यास प्रवाह बदलण्यासही मागे पुढे पाहणार नाही, हे पाकिस्तानला आपण दाखवून दिले. हा निर्णय खूप मोठे पाऊल ठरला. भारत-पाकिस्तान यांच्यात १० मे रोजी झालेल्या शस्त्रसंधीमध्ये कुठेही सिंधू नदी पाणीवाटप करार स्थगित करण्याचा निर्णय मागे घेण्याचा उल्लेख नाही, हे विशेष.

झेलम नदीला आलेल्या पुराचा डेटा भारताने पाकिस्तानसोबत शेअर केला नाही. परिणामी या पुराचा फटका पाकिस्तानला बसला. चिनाब नदीवरील प्रकल्पाचे दरवाजे भारताने एकाएकी बंद केले. यामुळे काही काळासाठी चिनाब नदीची पाकिस्तानातील पाणीपातळी १७-१८ फुटांवरून २-३ फुटांपर्यंत घसरली. याचा आपल्याकडील शेतीवर परिणाम होऊ शकतो, हे पाकिस्तानला कळून चुकले. येणाऱ्या भविष्यात भारत-पाक संघर्षाचा केंद्रबिंदू काश्मीरबरोबरीने पाणी हा असेल हे यातून समोर आले.   

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानOperation Sindoorऑपरेशन सिंदूर