शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

बहुमत चाचणीत नितीशबाबूंचा ‘गेम’ होणार? ४ आमदार असलेल्या मांझींनी वाढवलं NDAचं टेन्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 10:54 IST

Bihar Political Update: गेल्या आठवड्यात घडलेल्या काही नाट्यमय घडामोडींनंतर नितीश कुमार आणि त्यांचा जनता दल युनायटेड पक्ष पुन्हा एकदा एनडीएमध्ये आला. नितीश कुमार यांनी भाजपाच्या पाठिंब्यासह मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता एनडीएमध्येच धुसफूस सुरू झाली आहे.

गेल्या आठवड्यात घडलेल्या काही नाट्यमय घडामोडींनंतर नितीश कुमार आणि त्यांचा जनता दल युनायटेड पक्ष पुन्हा एकदा एनडीएमध्ये आला. नितीश कुमार यांनी भाजपाच्या पाठिंब्यासह मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता एनडीएमध्येच धुसफूस सुरू झाली आहे. नितीश कुमार यांनी खातेवाटप केल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि हम पक्षाचे प्रमुख जीतन राम मांझी हे पुत्र संतोष कुमार यांना मिळालेल्या मंत्रिपदाबाबत नाराज आहेत. तसेच त्यांनी दोन मंत्रिपदांची मागणी केली आहे.  नितीश कुमार सरकारला इशारा देताना मांझी यांनी सांगितले की आम्ही रस्ताही बनवू शकतो आणि गटारही बांधू शकतो. आम्ही ते प्रत्येक काम करू शकतो, जे इतर कुणीही करू शकतो. या विधानावरून मांझी यांचा इशारा हा रस्ते बांधकाम विभागाकडे असल्याचे म्हटले जात आहे. मात्र मांझी हे ऐनवेळी पारडं बदलणार नाही ना, याबाबतची चर्चा सुरू झाली आहे. 

जीतनराम मांझी पुढे म्हणाले की, ही आमच्या घरातील गोष्ट आहे. एका भाकरीनं आमचं पोट भरलं नाही तर आम्ही दोन-तीन भाकऱ्यांची मागणी करणारच ना? आम्हाला किमान दोन भाकऱ्या हव्या आहेत. कारण आम्ही गरीबांचं राजकारण करतो. त्यामुळे आम्हाला असं खातं मिळालं पाहिजे, ज्या माध्यमातून आम्ही ग्रामीण भागात काम करू शकू. आम्ही आमच्या नेत्यांसमोर आमच्या मागण्या ठेवल्या आहेत. आता काय द्यायचं आणि काय नाही द्यायचं हे त्यांच्यावर आहे. 

दरम्यान, एनडीएतील आपल्या सहभागावरही मांझी यांनी मोठं विधान केलं. ते म्हणाले की, हा कुठलाही वाद नाही आहे. त्यामुळे त्यामुळे पाठिंबा देण्यामध्ये किंवा घेण्याच्या धोरणात कुठलाही बदल होणार नाही. आम्ही नितीश कुमार आणि एनडीएसोबत आहोत. तसेच सोबत राहू. १२ फेब्रुवारी रोजी जी बहुमत चाचणी होईल, त्यामध्ये आम्ही एनडीएसोबत राहू. तसेच या बहुमत चाचणीमध्ये एनडीए निश्चितपणे विजयी होऊ. यात कुठलाही किंतु परंतुचा प्रश्न उपस्थित होत नाही. बिहारमध्ये एनडीएचं सरकार कायम राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

बिहार विधानसभेमध्ये बहुमताचा आकडा १२२ आहे. तर एनडीएकडे १२८ आमदार आहेत. हा आकडा बहुमतापेक्षा ६ ने अधिक आहे. जर मांझी यांची  नाराजी कायम राहिल्यास त्यांचे  ४ आमदार  विरोधात जाऊ शकतात अशा परिस्थितीत येथील समिकरणं बदलू शकतात.  

टॅग्स :BiharबिहारPoliticsराजकारणNitish Kumarनितीश कुमारHindustani Awam Morchaहिंदुस्थानी अवाम मोर्चाBJPभाजपा