शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

बहुमत चाचणीत नितीशबाबूंचा ‘गेम’ होणार? ४ आमदार असलेल्या मांझींनी वाढवलं NDAचं टेन्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 10:54 IST

Bihar Political Update: गेल्या आठवड्यात घडलेल्या काही नाट्यमय घडामोडींनंतर नितीश कुमार आणि त्यांचा जनता दल युनायटेड पक्ष पुन्हा एकदा एनडीएमध्ये आला. नितीश कुमार यांनी भाजपाच्या पाठिंब्यासह मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता एनडीएमध्येच धुसफूस सुरू झाली आहे.

गेल्या आठवड्यात घडलेल्या काही नाट्यमय घडामोडींनंतर नितीश कुमार आणि त्यांचा जनता दल युनायटेड पक्ष पुन्हा एकदा एनडीएमध्ये आला. नितीश कुमार यांनी भाजपाच्या पाठिंब्यासह मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता एनडीएमध्येच धुसफूस सुरू झाली आहे. नितीश कुमार यांनी खातेवाटप केल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि हम पक्षाचे प्रमुख जीतन राम मांझी हे पुत्र संतोष कुमार यांना मिळालेल्या मंत्रिपदाबाबत नाराज आहेत. तसेच त्यांनी दोन मंत्रिपदांची मागणी केली आहे.  नितीश कुमार सरकारला इशारा देताना मांझी यांनी सांगितले की आम्ही रस्ताही बनवू शकतो आणि गटारही बांधू शकतो. आम्ही ते प्रत्येक काम करू शकतो, जे इतर कुणीही करू शकतो. या विधानावरून मांझी यांचा इशारा हा रस्ते बांधकाम विभागाकडे असल्याचे म्हटले जात आहे. मात्र मांझी हे ऐनवेळी पारडं बदलणार नाही ना, याबाबतची चर्चा सुरू झाली आहे. 

जीतनराम मांझी पुढे म्हणाले की, ही आमच्या घरातील गोष्ट आहे. एका भाकरीनं आमचं पोट भरलं नाही तर आम्ही दोन-तीन भाकऱ्यांची मागणी करणारच ना? आम्हाला किमान दोन भाकऱ्या हव्या आहेत. कारण आम्ही गरीबांचं राजकारण करतो. त्यामुळे आम्हाला असं खातं मिळालं पाहिजे, ज्या माध्यमातून आम्ही ग्रामीण भागात काम करू शकू. आम्ही आमच्या नेत्यांसमोर आमच्या मागण्या ठेवल्या आहेत. आता काय द्यायचं आणि काय नाही द्यायचं हे त्यांच्यावर आहे. 

दरम्यान, एनडीएतील आपल्या सहभागावरही मांझी यांनी मोठं विधान केलं. ते म्हणाले की, हा कुठलाही वाद नाही आहे. त्यामुळे त्यामुळे पाठिंबा देण्यामध्ये किंवा घेण्याच्या धोरणात कुठलाही बदल होणार नाही. आम्ही नितीश कुमार आणि एनडीएसोबत आहोत. तसेच सोबत राहू. १२ फेब्रुवारी रोजी जी बहुमत चाचणी होईल, त्यामध्ये आम्ही एनडीएसोबत राहू. तसेच या बहुमत चाचणीमध्ये एनडीए निश्चितपणे विजयी होऊ. यात कुठलाही किंतु परंतुचा प्रश्न उपस्थित होत नाही. बिहारमध्ये एनडीएचं सरकार कायम राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

बिहार विधानसभेमध्ये बहुमताचा आकडा १२२ आहे. तर एनडीएकडे १२८ आमदार आहेत. हा आकडा बहुमतापेक्षा ६ ने अधिक आहे. जर मांझी यांची  नाराजी कायम राहिल्यास त्यांचे  ४ आमदार  विरोधात जाऊ शकतात अशा परिस्थितीत येथील समिकरणं बदलू शकतात.  

टॅग्स :BiharबिहारPoliticsराजकारणNitish Kumarनितीश कुमारHindustani Awam Morchaहिंदुस्थानी अवाम मोर्चाBJPभाजपा