शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

नितिशकुमारांची 24 तासांत पलटी; झारखंडमध्ये भाजपा मुख्यमंत्र्याविरोधात प्रचार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2019 16:34 IST

महाराष्ट्रात शिवसेनेने भाजपपासून फारकत घेतल्याचे पडसाद झारखंडमधील विधानसभा निवडणुकीत उमटले आहेत. तर काँग्रेसचे नेते प्रचाराला येण्याचे नाव घेत नाहीयत.

रांची :  लोकसभा निवडणुकीनंतर दुय्यम केंद्रीय मंत्रिपदावरून नाराज असलेल्या बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमार यांनी झारखंडमध्ये भाजपाच्या विरोधात प्रचार करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री रघुवर दास यांच्याविरोधातच दंड थोपटणाऱ्या भाजपाच्या बंडखोर मंत्र्याला थेट पाठिंबाच जाहीर करून टाकला होता. मात्र, बिहारमध्ये सत्ता राखण्यासाठी सावध भूमिका घेतली आहे. 

महाराष्ट्रात शिवसेनेने भाजपपासून फारकत घेतल्याचे पडसाद झारखंडमधील विधानसभा निवडणुकीत उमटले आहेत. झारखंडमधील भाजप आणि मित्रपक्षांत अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून, ते एकमेकांविरुद्ध उमेदवार उभे करीत आहेत. नितीशकुमार यांचा जेडीयु स्वबळावर ही निवडणूक लढत आहे. आतापर्यंत त्यांनी २५ उमेदवार जाहीर केले आहेत. तर एनडीएचा घटक पक्ष असलेली लोक जनशक्ती पार्टी (एलजेपी) स्वबळावर झारखंड विधानसभा निवडणूक लढणार आहे. असे असताना भाजपाचे मंत्री सरयू राय यांनी मुख्यमंत्र्यांविरोधातच बंडखोरी करत आव्हान उभे केले आहे. 

राय हे मुख्यमंत्र्याविरोधातच अपक्ष म्हणून उभे ठाकले आहेत. त्यांनी नितिशकुमार यांच्याशी सख्य असल्याने तिकिट नाकारल्याचा आरोप केला आहे. राय यांनी अर्ज भरताच नितिशकुमार यांनी त्यांच्या उमेदवारांना माघारी बोलावले होते. तसेच त्यांच्यासाठी प्रचार करण्याचे आदेश कार्य कर्त्यांना दिले होते. या घडामोडी होऊन रात्र उलटत नाही तोच नितिशकुमार यांनी पलटी मारली आहे. 

पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर नितिशकुमार यांनी झारखंडमध्ये माझ्या प्रचाराची गरज नसल्याचे म्हटले आहे. भाजपविरोधात प्रचार केल्यास त्याची झळ बिहारमधील भाजपाच्या पाठिंब्यावर असलेल्या सरकारला बसू शकते, अशी भीती त्यांना सतावू लागली आहे. यामुळे नितिशकुमार यांनी सावध भूमिका घेतल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. 

टॅग्स :jharkhand election 2019झारखंड निवडणूक 2019Janta Dal Unitedजनता दल युनायटेडNitish Kumarनितीश कुमार