शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
2
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
3
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
4
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर सुविधा, कडेकोड सुरक्षा; प्रशासन सज्ज
5
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
6
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
7
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
8
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
9
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
10
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
11
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
12
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
13
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
14
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
15
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
16
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
17
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
18
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
19
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
20
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

नितीशकुमार यांचे आंबे मांझींसाठी आंबट

By admin | Updated: June 4, 2015 23:37 IST

जीतनराम मांझी यांना आता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी असलेल्या बागेतील आंबे आणि लिचीची फळे तोडायला मनाई करण्यात आली आहे.

पाटणा : एकेकाळी मोठ्या विश्वासाने नितीशकुमार यांनी ज्यांच्याकडे बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची खुर्ची सोपविली, त्या जीतनराम मांझी यांना आता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी असलेल्या बागेतील आंबे आणि लिचीची फळे तोडायला मनाई करण्यात आली आहे. बंडाचा झेंडा उगारणाऱ्या मांझी यांच्यावर नितीशकुमार यांच्या पडलेल्या वक्रदृष्टीचे हे फळ मानले जाते. मांझी यांनी दलित असल्यामुळेच अशी वागणूक देण्यात येत असल्याचा आरोप करीत नवा वाद छेडला आहे.फेब्रुवारीमध्ये मांझींच्या बंडाच्या राजकारणाने बिहार ढवळून निघाल्यानंतर त्यांचे मुख्यमंत्रिपद गेले, त्यानंतर त्यांनी हिंदुस्तानी अवाम मोर्चा (एचएएम) हा पक्ष स्थापन करीत वेगळे बस्तान मांडले असले तरी १ अणे मार्ग हा मुख्यमंत्र्यासाठीचा बंगला सोडलेला नाही. पुन्हा मुख्यमंत्री बनलेले नितीशकुमार ७ सर्क्युलर रोड येथील बंगल्यात वास्तव्याला आहेत. १ अणे मार्ग बंगल्यातील शेकडो आंब्याच्या आणि लिचीच्या झाडांचे रक्षण करण्यासाठी नितीशकुमार यांनी २४ पोलिसांना तैनात केले आहे. त्यात ८ उपनिरीक्षक आणि १६ कॉन्स्टेबलचा समावेश आहे. झाडावरून पडलेले फळही मांझीकडे जाऊ नये याची दक्षता घेतली जात आहे. मांझींना फळे तोडण्याला मनाई करण्यात आल्याची माहिती त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते दानिश रिझवान यांनी एका निवेदनात देताच टीव्ही वाहिन्यांनीही ‘अवाम की नही आम की चिंता’ अशी ब्रेकिंग न्यूज बनविली आहे. दरम्यान, मांझी यांना कधीही फळे तोडण्यापासून रोखले नाही, असा खुलासा बिहार पोलिसांनी केला आहे. (वृत्तसंस्था)जमिनीवर पडलेले फळही कुणाला नेऊ देऊ नये अशी आम्हाला सूचना असल्याचे मांझी यांच्या निवासस्थानी तैनात पोलिसांनी स्पष्ट केले असून त्यांनी पडत्या फळाची आज्ञा शिरसावंद्य मानल्याचे त्यांच्या कर्तव्यदक्षतेतून दिसून येत आहे. रिझवान यांनी फळे तोडण्याला मनाई हा दलितांचा अपमान असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे राजद आणि भाजपला नितीशकुमार सरकारवर हल्ला करण्याची संधी मिळाली आहे. मला आणि माझ्या कुटुंबीयांना फळे तोडण्यास मनाई करण्यात आली असून त्यातून नितीशकुमार यांची मूळ मानसिकताच दिसून येत असल्याचा आरोप मांझी यांनी केला आहे. एखादी व्यक्ती वास्तव्याला असलेल्या घराच्या परिसरातील झाडांची फळे तोडू शकत नसेल तर हा प्रकार विचित्रच म्हणावा लागेल. माझ्या कुटुंबीयांना फळे देणाऱ्या एका माळ्याला अलीकडेच निलंबित करण्यात आले आहे, अशी माहितीही मांझी यांनी दिली. राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या पत्नी राबडीदेवी यांनी २००५ मध्ये सत्ता गमावल्यानंतर यादव दाम्पत्याने सहा महिने हा बंगला सोडला नव्हता त्यावेळी मात्र नितीशकुमार यांनी असा आदेश दिला नव्हता. नितीशकुमार यांनी मी दलित असल्यामुळे दुबळा आहे असे समजून माझा अशा पातळीवर अपमान केला आहे, असेही मांझी म्हणाले.बंगल्यात वास्तव्याला असलेल्या व्यक्तीला फळे तोडू न देणे हा प्रकार अजब आहे. नितीशकुमार यांच्याविरुद्ध बंडाचे धाडस केल्यामुळेच महादलित असलेल्या मांझी यांचा अपमान केला जात आहे, असे भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांनी म्हटले. दरम्यान या आरोपांबद्दल मुख्यमंत्री नितीशकुमार यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली असता त्यांनी हसत हसत काहीही माहिती नसल्याचे सांगितले.हे अतिशय हीन राजकारण झाले. मी वृत्तपत्रांमध्ये वाचल्यानंतर पोलीस प्रमुख पी.के. ठाकूर यांच्याकडून संपूर्ण तपशील मागितला आहे. मला आधीच कळले असते तर मी सर्व फळे मागून घेतली असती आणि ती मांझींना दिली असती, असा टोलाही त्यांनी मारला. मुख्यमंत्र्यासारख्या व्हीआयपींची सुरक्षा विशेष सुरक्षा गटाकडे(एसएसजी) सोपविण्यात आली असून याप्रकरणी माहिती मिळविण्यात येत असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.