शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या बाजूला फार बघू नका..., धोका आहे...!", भरसंसदेत उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांना नेमकं काय म्हणाले खर्गे?
2
सामन्यानंतर विराटला एक प्रश्न विचराला गेला, त्यानं बोलता बोलता BCCI अन् गौतम गंभीरवरच निशाणा साधला, स्पष्टच बोलला
3
१००% पर्यंत माफीची संधी! सीटबेल्ट, सिग्नल तोडणे यांसारख्या ट्रॅफिक चलनांवर मिळणार सूट! कसा करायचा अर्ज?
4
छोटा शेअर, मोठा धमाका, ज्यानं ₹१ लाख गुंतवले, त्याचं मूल्य आज झालं ₹८१ लाख; तुमच्याकडे आहे का?
5
परदेशी झगमगाट हवा होता, अन् झाली जैश-ए-मोहम्मदची कमांडर! डॉक्टर शाहीनची ३ निकाहानंतरही एक इच्छा अपूर्ण
6
500 km रेंज, टॉप क्लास फीचर्स; लॉन्चला एक दिवस बाकी; कशी आहे मारुतीची पहिली EV कार?
7
पत्नीने PUBG खेळू दिले नाही, पतीने बायकोची हत्या केली; सहा महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न
8
मार्गशीर्ष भौम प्रदोष २०२५: मंगलदोष मुक्त, हनुमंत प्रसन्न; ‘असे करा’ शिवव्रत, शुभ-लाभ होतील!
9
५० वर्षांनी चतुर्ग्रही योग: ९ राशींना कल्पनेपलीकडे चौफेर लाभ; चौपट नफा-फायदा, मनासारखा काळ!
10
पराभवाच्या चर्चेने विरोधक संतप्त, नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाच्या प्रतिष्ठेची आठवण करून दिली
11
उघडताच पूर्ण भरला 'हा' IPO; ग्रे मार्केट प्रीमिअमवरुन बंपर लिस्टिंगची शक्यता, पाहा डिटेल्स
12
Renuka Chaudhary: चक्क श्वानाला घेऊन काँग्रेस खासदार संसदेत पोहचल्या; सत्ताधारी भाजपानं घातला गोंधळ, काय घडलं?
13
मोठा निष्काळजीपणा! मध्य प्रदेशात ५० वर्षे जुना पूल कोसळला; १० जण जखमी
14
अर्थव्यवस्थेसाठी 'चिंताजनक' बातमी! रुपया डॉलरपुढे गडगडला, सर्वसामान्यांच्या खिशावर थेट होणार परिणाम!
15
अमेरिकेत भारतीय IT कर्मचाऱ्यांसाठी 'टेन्शन'! H-1B व्हिसा मिळणं ७०% नी घटलं; TCS चाही रिजेक्शन रेट वाढला!
16
अफगाणिस्तानने उघडला नवा मार्ग, पाकिस्तानमध्ये हाहाकार; सीमेवरील व्यापार बंदीचा उलटाच झाला परिणाम
17
Holiday: डिसेंबरमध्ये शेअर बाजारात ९ दिवस कामकाज बंद! तुमचं ट्रेडिंग प्लॅनिंग आजच करा! ही घ्या सुट्टीची संपूर्ण यादी
18
यशस्वीची 'तेरे नाम' हेअर स्टाइल पाहून विराटमध्ये अवतरला सलमान; "लगन लगी.." स्टेप्सचा व्हिडिओ व्हायरल
19
Nanded Murder Case : "तुझ्या बहिणीचं ज्याच्यासोबत लफडं त्याला मारुन ये....", सक्षमला मारण्याआधी पोलीस चौकीतील घटनाक्रम; आंचलने सांगितली धक्कादायक माहिती
20
एका झटक्यात चांदीची किंमत ९३८१ रुपयांनी वाढली, सोन्यातही जोरदार वाढ; पाहा नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नितीशकुमार यांचे आंबे मांझींसाठी आंबट

By admin | Updated: June 4, 2015 23:37 IST

जीतनराम मांझी यांना आता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी असलेल्या बागेतील आंबे आणि लिचीची फळे तोडायला मनाई करण्यात आली आहे.

पाटणा : एकेकाळी मोठ्या विश्वासाने नितीशकुमार यांनी ज्यांच्याकडे बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची खुर्ची सोपविली, त्या जीतनराम मांझी यांना आता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी असलेल्या बागेतील आंबे आणि लिचीची फळे तोडायला मनाई करण्यात आली आहे. बंडाचा झेंडा उगारणाऱ्या मांझी यांच्यावर नितीशकुमार यांच्या पडलेल्या वक्रदृष्टीचे हे फळ मानले जाते. मांझी यांनी दलित असल्यामुळेच अशी वागणूक देण्यात येत असल्याचा आरोप करीत नवा वाद छेडला आहे.फेब्रुवारीमध्ये मांझींच्या बंडाच्या राजकारणाने बिहार ढवळून निघाल्यानंतर त्यांचे मुख्यमंत्रिपद गेले, त्यानंतर त्यांनी हिंदुस्तानी अवाम मोर्चा (एचएएम) हा पक्ष स्थापन करीत वेगळे बस्तान मांडले असले तरी १ अणे मार्ग हा मुख्यमंत्र्यासाठीचा बंगला सोडलेला नाही. पुन्हा मुख्यमंत्री बनलेले नितीशकुमार ७ सर्क्युलर रोड येथील बंगल्यात वास्तव्याला आहेत. १ अणे मार्ग बंगल्यातील शेकडो आंब्याच्या आणि लिचीच्या झाडांचे रक्षण करण्यासाठी नितीशकुमार यांनी २४ पोलिसांना तैनात केले आहे. त्यात ८ उपनिरीक्षक आणि १६ कॉन्स्टेबलचा समावेश आहे. झाडावरून पडलेले फळही मांझीकडे जाऊ नये याची दक्षता घेतली जात आहे. मांझींना फळे तोडण्याला मनाई करण्यात आल्याची माहिती त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते दानिश रिझवान यांनी एका निवेदनात देताच टीव्ही वाहिन्यांनीही ‘अवाम की नही आम की चिंता’ अशी ब्रेकिंग न्यूज बनविली आहे. दरम्यान, मांझी यांना कधीही फळे तोडण्यापासून रोखले नाही, असा खुलासा बिहार पोलिसांनी केला आहे. (वृत्तसंस्था)जमिनीवर पडलेले फळही कुणाला नेऊ देऊ नये अशी आम्हाला सूचना असल्याचे मांझी यांच्या निवासस्थानी तैनात पोलिसांनी स्पष्ट केले असून त्यांनी पडत्या फळाची आज्ञा शिरसावंद्य मानल्याचे त्यांच्या कर्तव्यदक्षतेतून दिसून येत आहे. रिझवान यांनी फळे तोडण्याला मनाई हा दलितांचा अपमान असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे राजद आणि भाजपला नितीशकुमार सरकारवर हल्ला करण्याची संधी मिळाली आहे. मला आणि माझ्या कुटुंबीयांना फळे तोडण्यास मनाई करण्यात आली असून त्यातून नितीशकुमार यांची मूळ मानसिकताच दिसून येत असल्याचा आरोप मांझी यांनी केला आहे. एखादी व्यक्ती वास्तव्याला असलेल्या घराच्या परिसरातील झाडांची फळे तोडू शकत नसेल तर हा प्रकार विचित्रच म्हणावा लागेल. माझ्या कुटुंबीयांना फळे देणाऱ्या एका माळ्याला अलीकडेच निलंबित करण्यात आले आहे, अशी माहितीही मांझी यांनी दिली. राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या पत्नी राबडीदेवी यांनी २००५ मध्ये सत्ता गमावल्यानंतर यादव दाम्पत्याने सहा महिने हा बंगला सोडला नव्हता त्यावेळी मात्र नितीशकुमार यांनी असा आदेश दिला नव्हता. नितीशकुमार यांनी मी दलित असल्यामुळे दुबळा आहे असे समजून माझा अशा पातळीवर अपमान केला आहे, असेही मांझी म्हणाले.बंगल्यात वास्तव्याला असलेल्या व्यक्तीला फळे तोडू न देणे हा प्रकार अजब आहे. नितीशकुमार यांच्याविरुद्ध बंडाचे धाडस केल्यामुळेच महादलित असलेल्या मांझी यांचा अपमान केला जात आहे, असे भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांनी म्हटले. दरम्यान या आरोपांबद्दल मुख्यमंत्री नितीशकुमार यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली असता त्यांनी हसत हसत काहीही माहिती नसल्याचे सांगितले.हे अतिशय हीन राजकारण झाले. मी वृत्तपत्रांमध्ये वाचल्यानंतर पोलीस प्रमुख पी.के. ठाकूर यांच्याकडून संपूर्ण तपशील मागितला आहे. मला आधीच कळले असते तर मी सर्व फळे मागून घेतली असती आणि ती मांझींना दिली असती, असा टोलाही त्यांनी मारला. मुख्यमंत्र्यासारख्या व्हीआयपींची सुरक्षा विशेष सुरक्षा गटाकडे(एसएसजी) सोपविण्यात आली असून याप्रकरणी माहिती मिळविण्यात येत असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.