शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
4
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
5
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
6
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
7
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
8
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
9
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
10
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
11
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
12
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
13
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
14
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
15
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
16
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
17
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
18
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
19
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
20
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!

नितीशकुमार यांच्या जदयूने अखेर काडी टाकलीच; अग्निवीर, UCC वर विचार व्हायला हवा, मूळ मागणीही रेटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 12:33 IST

Lok sabha Politics: जदयूने अखेर आपले रंग दाखविण्यास सुरुवात केली आहे. समान नागरी कायदा आणि अग्निवीरबाबत आपली आधीचीच भुमिका राहणार असल्याचे जदयूने स्पष्ट केले आहे.

ज्या नितीशकुमार यांच्या जदयूच्या खासदारांच्या जिवावर भाजपा सत्ता स्थापन करत आहे, त्या जदयूने अखेर आपले जदयूने अटी-शर्ती ठेवायला सुरुवात केली आहे. समान नागरी कायदा आणि अग्निवीरबाबत आपली आधीचीच भुमिका राहणार असल्याचे जदयूने स्पष्ट केले आहे. जदयूचे महासचिव आणि प्रवक्ता के सी त्यागी यांनी सांगितले की या मुद्द्यांवर सर्व राज्यांशी बोलण्याची आणि त्यांचे विचार समजून घेण्याची गरज असल्याचे तेव्हाही सांगितले होते. 

जदयूने वन नेशन, वन इलेक्शनला आपले समर्थन दिले आहे. त्यागी म्हणाले आमचा एक देश एक निवडणूक याला पाठिंबा आहे. अग्निवीर योजनेला खूप विरोध झाला होता. निवडणुकीतही त्याचा परिणाम दिसला आहे. यावर पुन्हा एकदा विचार करण्याची गरज आहे. यूसीसीवर नितीश कुमार यांनी विधी आयोगाच्या अध्यक्षांना पत्र लिहून आम्ही याच्या विरोधात नाही, मात्र यावर व्यापक चर्चा आवश्यक असल्याचे म्हटले होते, तीच आजही भुमिका राहणार असल्याचे त्यागी यांनी स्पष्ट केले. 

अग्निवीर योजनेवर बोलताना त्यागी म्हणाले की, सुरक्षा कर्मचारी सैन्यदलात तैनात करण्यात येतात. ज्यावेळी अग्निवीर योजना आली तेव्हा मोठ्या वर्गामध्ये असंतोष निर्माण झाला होता. त्यांच्या कुटुंबीयांनीही निवडणुकीत याचा विरोध केला आहे. त्यामुळे यावर नव्या पद्धतीने चर्चा करण्याची गरज आहे, असे त्यागी म्हणाले. 

याचबरोबर नितीशकुमार यांनी ज्या मागणीवरून एनडीएची साथ सोडली होती, तीच मागणी पुन्हा जदयूने रेटली आहे. आम्ही बऱ्याच काळापासून मागणी करत आहोत की बिहारला विशेष राज्याचा दर्जा द्या, जर बिहारमधून लोकांचे स्थलांतर रोखायचे असेल तर हे करणे गरजेचे आहे. आम्ही एनडीएमध्ये एक ताकदवर भागीदार आहोत, असा सौम्य इशाराही त्यागी यांनी दिला आहे.  

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारJanta Dal Unitedजनता दल युनायटेडNarendra Modiनरेंद्र मोदीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकाल