शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

नितीशकुमार यांच्या जदयूने अखेर काडी टाकलीच; अग्निवीर, UCC वर विचार व्हायला हवा, मूळ मागणीही रेटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 12:33 IST

Lok sabha Politics: जदयूने अखेर आपले रंग दाखविण्यास सुरुवात केली आहे. समान नागरी कायदा आणि अग्निवीरबाबत आपली आधीचीच भुमिका राहणार असल्याचे जदयूने स्पष्ट केले आहे.

ज्या नितीशकुमार यांच्या जदयूच्या खासदारांच्या जिवावर भाजपा सत्ता स्थापन करत आहे, त्या जदयूने अखेर आपले जदयूने अटी-शर्ती ठेवायला सुरुवात केली आहे. समान नागरी कायदा आणि अग्निवीरबाबत आपली आधीचीच भुमिका राहणार असल्याचे जदयूने स्पष्ट केले आहे. जदयूचे महासचिव आणि प्रवक्ता के सी त्यागी यांनी सांगितले की या मुद्द्यांवर सर्व राज्यांशी बोलण्याची आणि त्यांचे विचार समजून घेण्याची गरज असल्याचे तेव्हाही सांगितले होते. 

जदयूने वन नेशन, वन इलेक्शनला आपले समर्थन दिले आहे. त्यागी म्हणाले आमचा एक देश एक निवडणूक याला पाठिंबा आहे. अग्निवीर योजनेला खूप विरोध झाला होता. निवडणुकीतही त्याचा परिणाम दिसला आहे. यावर पुन्हा एकदा विचार करण्याची गरज आहे. यूसीसीवर नितीश कुमार यांनी विधी आयोगाच्या अध्यक्षांना पत्र लिहून आम्ही याच्या विरोधात नाही, मात्र यावर व्यापक चर्चा आवश्यक असल्याचे म्हटले होते, तीच आजही भुमिका राहणार असल्याचे त्यागी यांनी स्पष्ट केले. 

अग्निवीर योजनेवर बोलताना त्यागी म्हणाले की, सुरक्षा कर्मचारी सैन्यदलात तैनात करण्यात येतात. ज्यावेळी अग्निवीर योजना आली तेव्हा मोठ्या वर्गामध्ये असंतोष निर्माण झाला होता. त्यांच्या कुटुंबीयांनीही निवडणुकीत याचा विरोध केला आहे. त्यामुळे यावर नव्या पद्धतीने चर्चा करण्याची गरज आहे, असे त्यागी म्हणाले. 

याचबरोबर नितीशकुमार यांनी ज्या मागणीवरून एनडीएची साथ सोडली होती, तीच मागणी पुन्हा जदयूने रेटली आहे. आम्ही बऱ्याच काळापासून मागणी करत आहोत की बिहारला विशेष राज्याचा दर्जा द्या, जर बिहारमधून लोकांचे स्थलांतर रोखायचे असेल तर हे करणे गरजेचे आहे. आम्ही एनडीएमध्ये एक ताकदवर भागीदार आहोत, असा सौम्य इशाराही त्यागी यांनी दिला आहे.  

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारJanta Dal Unitedजनता दल युनायटेडNarendra Modiनरेंद्र मोदीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकाल